
Mumbai : मार्च महिन्यात महाराष्ट्र अवकाळी पावसाने झोडपला होता. आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 30 मार्चपासून राज्यात पुन्हा पावसाचे सत्र सुरू होणार आहे. सोमवारी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट प्रदेशात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळपासून आभाळ ढगाळ राहून दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाची सुरूवात होऊ शकते, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
सोमवारी पावसाची हजेरी
मुंबई आणि ठाणे शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून उकाड्याची तीव्रता वाढली आहे. रविवारी राजधानीत हवामान स्थिर राहणार असून पावसाची शक्यता कमी आहे. मात्र, सोमवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपिटी पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. पश्चिम विदर्भात पावसाची जास्तीत जास्त शक्यता आहे, तर उर्वरित विदर्भातही हवामानात लक्षणीय बदल दिसून येण्याची शक्यता आहे.
मंगळवारी आणि पुढील पावसाचा अंदाज
31 मार्च रोजी सोमवारच्या तुलनेत पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. तरीही काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता राहील. 1 ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात पावसाचे नवे सत्र सुरू होईल. मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून दुपारनंतर पाऊस आणि गारपिटी पडण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी इशारा
उन्हाळ्यात सुरू झालेल्या या पावसामुळे हवामानात मोठे बदल झाले आहेत. मार्चमधील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजित करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने पिकांना सुरक्षित ठिकाणी ठेवून पावसापासून संरक्षण करण्याची सूचना कृषी विभागाने केली आहे.
तापमानाचा मागोवा
28 मार्चला राज्यात उष्ण वातावरणाची नोंद झाली. सोलापूरमध्ये कमाल तापमान 40.4°C, जळगाव व जेरुरमध्ये 39.5°C तर परभणीमध्येही 39.5°C इतके होते. रविवारी तापमानात थोडी घट होईल आणि सोमवारपासून पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नागरिकांसाठी सुरक्षा सूचना
पावसासह मेघगर्जना आणि विजेचा कडकडाट असल्याने नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी स्वतःची आणि पाळीव प्राण्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची सूचना आहे. झाडाखाली, टिन शेडखाली किंवा विद्युत खांबाजवळ राहणे धोकादायक ठरू शकते.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

