
Mumbai : मार्च महिन्यात महाराष्ट्र अवकाळी पावसाने झोडपला होता. आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 30 मार्चपासून राज्यात पुन्हा पावसाचे सत्र सुरू होणार आहे. सोमवारी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट प्रदेशात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळपासून आभाळ ढगाळ राहून दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाची सुरूवात होऊ शकते, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
सोमवारी पावसाची हजेरी
मुंबई आणि ठाणे शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून उकाड्याची तीव्रता वाढली आहे. रविवारी राजधानीत हवामान स्थिर राहणार असून पावसाची शक्यता कमी आहे. मात्र, सोमवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपिटी पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. पश्चिम विदर्भात पावसाची जास्तीत जास्त शक्यता आहे, तर उर्वरित विदर्भातही हवामानात लक्षणीय बदल दिसून येण्याची शक्यता आहे.
मंगळवारी आणि पुढील पावसाचा अंदाज
31 मार्च रोजी सोमवारच्या तुलनेत पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. तरीही काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता राहील. 1 ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात पावसाचे नवे सत्र सुरू होईल. मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून दुपारनंतर पाऊस आणि गारपिटी पडण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी इशारा
उन्हाळ्यात सुरू झालेल्या या पावसामुळे हवामानात मोठे बदल झाले आहेत. मार्चमधील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजित करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने पिकांना सुरक्षित ठिकाणी ठेवून पावसापासून संरक्षण करण्याची सूचना कृषी विभागाने केली आहे.
तापमानाचा मागोवा
28 मार्चला राज्यात उष्ण वातावरणाची नोंद झाली. सोलापूरमध्ये कमाल तापमान 40.4°C, जळगाव व जेरुरमध्ये 39.5°C तर परभणीमध्येही 39.5°C इतके होते. रविवारी तापमानात थोडी घट होईल आणि सोमवारपासून पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नागरिकांसाठी सुरक्षा सूचना
पावसासह मेघगर्जना आणि विजेचा कडकडाट असल्याने नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी स्वतःची आणि पाळीव प्राण्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची सूचना आहे. झाडाखाली, टिन शेडखाली किंवा विद्युत खांबाजवळ राहणे धोकादायक ठरू शकते.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




