
Maharashtra Bandh : हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जाणाऱ्या आणि त्याठिकाणावरून जेवण मागवणाऱ्यांसाठी खूपच महत्वाची बातमी आहे. हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने सोमवारी म्हणजे येत्या १४ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. सरकारच्या अन्यायकारक कर धोरणांविरुद्ध असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स म्हणजे आहार संघटनेने १४ जुलै २०२५ रोजी एल्कार पुकारला आहे. या संघटनेने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे सोमवारी राज्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद राहणार आहेत. यामुळे राज्याच्या महसुलावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
आहार संघटनेने महाराष्ट्र बंदच्या संदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक का दिली यामागचे कारण सांगितले आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, '१४ जुलै २०२५ रोजी राज्यव्यापी बंद! अन्यायकारक कराच्या विरोधात महाराष्ट्रातील परमिट रूम्स आणि बार बंद करणार आहेत. हॉस्पिटॅलिटी उद्योग आवाज उठवत आहे. सोमवार १४ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम्स आणि बार आपल्या उद्योगावर लादलेल्या अन्याय आणि प्रचंड कर वाढीच्या निषेधार्थ संपूर्ण बंद पाळतील.'
'दारूवरील व्हॅट दुप्पट, परवाना शुल्क १५ टक्केने वाढवले, उत्पादन शुल्कात तब्बल ६० टक्के वाढ केली. या राज्य सरकारच्या कठोर बदलांमुळे असंख्य लहान आणि मध्यम आस्थापनांचे अस्तित्व धोक्यात आले आहे ज्यामुळे हजारो नोकऱ्या आणि उपजीविका धोक्यात आली आहे. निष्पक्ष धोरणांची मागणी करण्यासाठी आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (AHAR) द्वारे या बंदची हाक देण्यात आली आहे. आम्ही सर्व उद्योग भागधारकांना एकत्र येऊन मजबूत उभे राहण्याचे आवाहन करतो. चला एक स्पष्ट संदेश देऊया - आता पुरे झाले!', असे देखील आहार संघटनेने सांगितले.
सरकारच्या करविषयी धोरणाविरोधात आहार संघटनेने बंद पुकारला आहे. ही आमच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे आहार संघटनेने सांगितले. आहार संघटनेच्या नेतृत्वाखआली २० हजाराहून अधिक हॉटेल रेस्टॉरंट मालकांनी सरकारच्या अन्यायकारक कर धोरणाचा विरोध करण्याचे ठरवले आहे. या बंदचा सर्वाधिक परिणाम मुंबी, पुणे, नाशिक, नागूपर, कोल्हापूरसह राज्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये होणार आहे. सोमवारी राज्यभरातील सर्व परमिट रूम, बार आणि हॉटेल-रेस्टॉरंट बंद राहणार आहेत. आहार संघटनेचा हा बंद शांततेत असणार आहे. पण जर सरकारने दखल घेतली नाही तर येत्या काळात हिंसक आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
दरम्यान, नागपूरमधील परमिट रूम असोसिएशनचे अध्यक्ष राजीव जयस्वाल यांनी सांगितले की, शासनाने मागील ३ वर्षांत वेगवेगळ्या पद्धतीने व्हॅट दहा टक्क्यांनी वाढवला. तसेच परमिट रूम नूतनीकरण फी १५ टक्केने वाढवली आणि एक्साईज ड्यूटी तब्बल १५० टक्क्यांनी वाढवली आहे. त्यामुळे परमिट रूम वाढवलेले व्हॅट कमी करण्यात यावी अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सरकारला महसूल वाढवायचा असेल तर आमच्याशी चर्चा करावी. चर्चा केल्यास यावर तोडगा काढला असता तर आम्हीही महसूल वाढवण्याचे अनेक पर्याय सुचवले असते. पण सरकारने घेतलेला निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप राजीव जयस्वाल यांनी केला. वाढीव दहा टक्के व्हॅट लावल्यामुळे परमिट रूम असोसिएशनच्या वतीने नाराजी व्यक्त करत १४ तारखेला एक दिवस परमिट रूम बंद ठेवत निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे.
शहर
- नांदेड: पतीचा जीव वाचवण्यासाठी मानवी ढाल बनणाऱ्या शूर पोलिसासमोर खासदार हरसिमरत कौर बादल नतमस्तक; हल्ल्यात पोलिसाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- मुंबई: कंपन्या बंद झाल्याचा केवळ आभास, त्यातील ७६ टक्के कंपन्या.. शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आकडेवारीसह जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: १ हजार ३१७ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, वाहनमालकांना १५ दिवसांची मुदत
महाराष्ट्र
- भंडारा: 'त्या' पीडित बालिकेच्या शिक्षणासाठी जिल्हा प्रशासन घेणार पुढाकार; पालकमंत्र्यांनी घेतली कुटुंबीयांची भेट
- हिंगोली: स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनापासून अभिजीत दिपके यांच्या 'स्कूल ठीक करो' अभियानाची हाक; ग्रामीण शाळांच्या सुधारणेसाठी आंदोलनाची घोषणा
- जालना: रेशीम धागा जगाला जोडणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते राज्यातील पहिल्या रेशीम कोष बाजारपेठेचे लोकार्पण, पहिल्याच लिलावात ९६१ रुपयांचा विक्रमी दर
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दिल्ली उच्च न्यायालय आणि विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रशासनाची यंत्रणा सतर्क
- नांदेड: पतीचा जीव वाचवण्यासाठी मानवी ढाल बनणाऱ्या शूर पोलिसासमोर खासदार हरसिमरत कौर बादल नतमस्तक; हल्ल्यात पोलिसाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
- नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींचे देशाला आवाहन; फाळणीच्या वेदनांची आठवण करत 'विकसित भारत'चे लक्ष्य
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण



























Subscribe to my channel



