
Maharashtra Bandh : हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जाणाऱ्या आणि त्याठिकाणावरून जेवण मागवणाऱ्यांसाठी खूपच महत्वाची बातमी आहे. हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने सोमवारी म्हणजे येत्या १४ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. सरकारच्या अन्यायकारक कर धोरणांविरुद्ध असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स म्हणजे आहार संघटनेने १४ जुलै २०२५ रोजी एल्कार पुकारला आहे. या संघटनेने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे सोमवारी राज्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद राहणार आहेत. यामुळे राज्याच्या महसुलावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
आहार संघटनेने महाराष्ट्र बंदच्या संदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक का दिली यामागचे कारण सांगितले आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, '१४ जुलै २०२५ रोजी राज्यव्यापी बंद! अन्यायकारक कराच्या विरोधात महाराष्ट्रातील परमिट रूम्स आणि बार बंद करणार आहेत. हॉस्पिटॅलिटी उद्योग आवाज उठवत आहे. सोमवार १४ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम्स आणि बार आपल्या उद्योगावर लादलेल्या अन्याय आणि प्रचंड कर वाढीच्या निषेधार्थ संपूर्ण बंद पाळतील.'
'दारूवरील व्हॅट दुप्पट, परवाना शुल्क १५ टक्केने वाढवले, उत्पादन शुल्कात तब्बल ६० टक्के वाढ केली. या राज्य सरकारच्या कठोर बदलांमुळे असंख्य लहान आणि मध्यम आस्थापनांचे अस्तित्व धोक्यात आले आहे ज्यामुळे हजारो नोकऱ्या आणि उपजीविका धोक्यात आली आहे. निष्पक्ष धोरणांची मागणी करण्यासाठी आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (AHAR) द्वारे या बंदची हाक देण्यात आली आहे. आम्ही सर्व उद्योग भागधारकांना एकत्र येऊन मजबूत उभे राहण्याचे आवाहन करतो. चला एक स्पष्ट संदेश देऊया - आता पुरे झाले!', असे देखील आहार संघटनेने सांगितले.
सरकारच्या करविषयी धोरणाविरोधात आहार संघटनेने बंद पुकारला आहे. ही आमच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे आहार संघटनेने सांगितले. आहार संघटनेच्या नेतृत्वाखआली २० हजाराहून अधिक हॉटेल रेस्टॉरंट मालकांनी सरकारच्या अन्यायकारक कर धोरणाचा विरोध करण्याचे ठरवले आहे. या बंदचा सर्वाधिक परिणाम मुंबी, पुणे, नाशिक, नागूपर, कोल्हापूरसह राज्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये होणार आहे. सोमवारी राज्यभरातील सर्व परमिट रूम, बार आणि हॉटेल-रेस्टॉरंट बंद राहणार आहेत. आहार संघटनेचा हा बंद शांततेत असणार आहे. पण जर सरकारने दखल घेतली नाही तर येत्या काळात हिंसक आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
दरम्यान, नागपूरमधील परमिट रूम असोसिएशनचे अध्यक्ष राजीव जयस्वाल यांनी सांगितले की, शासनाने मागील ३ वर्षांत वेगवेगळ्या पद्धतीने व्हॅट दहा टक्क्यांनी वाढवला. तसेच परमिट रूम नूतनीकरण फी १५ टक्केने वाढवली आणि एक्साईज ड्यूटी तब्बल १५० टक्क्यांनी वाढवली आहे. त्यामुळे परमिट रूम वाढवलेले व्हॅट कमी करण्यात यावी अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सरकारला महसूल वाढवायचा असेल तर आमच्याशी चर्चा करावी. चर्चा केल्यास यावर तोडगा काढला असता तर आम्हीही महसूल वाढवण्याचे अनेक पर्याय सुचवले असते. पण सरकारने घेतलेला निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप राजीव जयस्वाल यांनी केला. वाढीव दहा टक्के व्हॅट लावल्यामुळे परमिट रूम असोसिएशनच्या वतीने नाराजी व्यक्त करत १४ तारखेला एक दिवस परमिट रूम बंद ठेवत निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे.
शहर
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
महाराष्ट्र
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- कोल्हापूर: स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- जालना: माझ्यामधी वळवळ करू नका.. मराठा आरक्षण मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचे छगन भुजबळांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लबोल!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड


























Subscribe to my channel




