
Khadakwasla : पावसाळा सुरू झाल्यानंतर नेहमीप्रमाणे वारजे ते कोंढवे कोपरे या सुमारे आठ किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक संथ होऊन वारंवार कोंडी होण्याचे प्रकार घडत आहेत. या ठिकाणी महापालिकेने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.
वारजे, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे कोपरेपर्यंतच्या रस्त्यावर १० ते १२ ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करताना छोटे पूल गायब झाल्याने येथे पाणी निचरा होण्यासाठी पर्याय उरला नाही.
त्यानंतर हा भाग महापालिकेत समावेश झाला आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यावर येथे वाहतूक यंत्रणा पोहचण्यासही वेळ लागतो. परिणामी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वारजे ते कोपरेपर्यंतच्या रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
पाणी साचण्याची ठिकाणे, कारणे व परिणाम
|
Tomato Rate Hike: कांद्यानंतर आता टोमॅटोही रडवणार, टोमॅटोच्या दरात दुपटीने वाढ ! |
१. वारजे गणपती माथा ते शिवणे शिंदे पूल महापालिकेने पावसाळी वाहिनी टाकली असूनही ठिकाणांवर परिसरातून वाहून आलेले पाणी येथे जमा होत आहे. असून पाण्याचा निचरा होण्यासाठीचा पूलही आता येथे नाही.
२. शिवणे-दुधाणे पेट्रोल पंप कॉक्रिटच्या रस्त्यावर खड्डा पडला आहे. त्यामुळे येथे साचणारे पाणी नागरिकांच्या अंगावर उडत आहे.
3. सारस्वत बैंक आणि बैंक ऑफ इंडिया मुख्य रस्ता व पादचारी मार्ग समपातळीत नसल्याने येथे खड्डा तयार झाला आहे. तसेच येथे साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था नाही परिणामी दोन ते चार दिवस येथे पाणी तसेच राहत आहे. याचा त्रास पादचारी व वाहनचालकाना होत आहे.
४. इंगळे कॉलनी, शाहू बँक- यापूर्वी अरुंद रस्ता असताना येथे पूल होता. रस्त्याच्या रुंदीकरणानंतर पूल काढण्यात आला. या ठिकाणी रस्त्याला वळण आहे. त्यामुळे पावसाचे पाणी अर्ध्या रस्त्यावर साचल्याने वारजेकडे जाणारी वाहतूक विरुद्ध बाजूने जाते. परिणामी कोंडी होते.
५. उत्तमनगर, बाजार समिती - समितीच्या भिंतीमुळे एनडीएतून बाहेर आलेले पावसाचे पाणी रस्त्यावर साचते. परिसरातील घरांमध्येही हे पाणी शिरते. रस्त्याजवळील पुलाची एक बाजू बंद असल्याने पाण्याचा निचरा नाही. त्यामुळे हे पाणी मुख्य रस्त्यावरून वाहते.
६. जलशुद्धीकरण केंद्र येथील रस्त्यावर दीड फुटापर्यंत पाणी साचते. रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. पाणी निचरा होण्याची व्यवस्था पुरेशी नाही. पूर्वी रस्ता अरुंद असताना येथे पूल होता. रस्ता रुंदीकरणनतर पूल गायब झाल्याने ही समस्या उदभवली आहे.
7. ७. कोंढवे धावडे पूल - जुन्या पुलाप्रमाणेच नवीन पूलही बांधण्यात आला. रस्त्यावरून दोन्ही बाजूने सुमारे अर्धा किलोमीटरवरून पावसाची पाणी वाहत येते. ते वाहून जाण्याची पुलावर व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे येथे दोन फुटांपेक्षा जास्त पाणी साचून दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प होते.
जलशुद्धीकरण केंद्रासमोर सेवालालनगर आणि गणपती मंदिरापासून पाणी वाहत येते. रस्त्यावर खड्डे झाल्याने गुडघ्यापर्यंत पाणी साठते. त्या पाण्यात मोठे वाहन मेले की लाट तयार होऊन ते पाणी या परिसरातील दुकानांत व घरांमध्ये शिरते. हे पाणी जाण्यासाठी ग्रामपंचायतीने वाहिनी केलेली नाही. त्यामुळे या परिसरापासून ते भीमनगरच्या ओढ्यापर्यंत पावसाळी वाहिनी टाकावी.
- सागर बारटक्के, ग्रामस्थ
रस्त्याचे रुंदीकरण करताना पाप्पी जाण्यासाठीची व्यवस्था पुढे कायम केलेली नाही. परिणामी पाणी साचते आणि त्यानंतर वाहतूक कोंडी होते. पाणी साचल्याची माहिती मिळताच आमच्या पातळीवर कार्यवाही केली जाते. जास्तीत जास्त ठिकाणी पावसाळी वाहिनी वसवण्यासाठी निधी अंदाजपत्रक केले आहे. तसेच काही ठिकाणी कामही सुरू केले आहे.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली





























Subscribe to my channel




