INDA vs SLA : भारत उपांत्य फेरीसाठी सज्ज, श्रीलंकेविरुद्ध भिडणार, कोण पोहचणार फायनलमध्ये?

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीची सांगता 20 फेब्रुवारीला होणार आहे. तसेच 21 फेब्रुवारीपासून सुपर 8 फेरीचा थरार रंगणार आहे.सुपर 8 मधील अव्वल 4 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना 21 फेब्रुवारीपासून एकसेएक सामने पाहायला मिळण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2026 स्पर्धेत उपांत्य फेरीतील सामने खेळवण्यात येणार आहेत. एकाच दिवशी उपांत्य फेरीतील सामने खेळवण्यात येणार आहेत. सेमी फायनलमधील पहिल्या सामन्यात इंडिया ए वूमन्स टीमसमोर श्रीलंका ए महिला संघाचं आव्हान असणार आहे. उभयसंघात अंतिम फेरीत पोहचण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने भारत ए विरुद्ध श्रीलंका ए महिला संघातील उपांत्य फेरीतील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना कधी?

इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना शुक्रवारी 20 फेब्रुवारीला होणार आहे.

इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना कुठे?

इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना बँकॉक टेर्डथाई क्रिकेट ग्राउंड इथे होणार आहे.

इंडिया विरुद्ध श्रीलंका सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंडिया विरुद्ध श्रीलंका सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर सोनी लिव्ह एपद्वारे मॅच मोबाईलवर लाईव्ह पाहायला मिळेल.

भारत आणि श्रीलंकेची कामगिरी

इंडिया ए टीमची राधा यादव हीच्या नेतृत्वात पराभवाने सुरुवात झाली. भारतासोबत साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात उलटफेरचा सामना करावा लागला. यूएईने भारतावर मात केली. मात्र त्यानंतर महिला ब्रिगेडने पाकिस्तान आणि नेपाळला पराभूत करत उपांत्य फेरीत धडक दिली.

तर श्रीलंकेलाही भारताप्रमाणे पहिल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. बांग्लादेश ए टीमने श्रीलंकेवर विजय मिळवला. मात्र त्यानंतर श्रीलंका ए टीमने मलेशिया आणि थायलंडवर विजय मिळवला.  श्रीलंकेने यासह उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं. त्यामुळे आता भारत-श्रीलंकेपैकी कोण फायलनलमध्ये पोहचणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

इंडिया ए टीमची महिला ब्रिगेड उपांत्य फेरीसाठी सज्ज

तर उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे इथून पाकिस्तान आणि तिथून भारताचा विजय झाला तर क्रिकेट चाहत्यांना रविवारी 22 फेब्रुवारीला महाअंतिम सामना पाहायला मिळू शकतो.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *