पुणे: नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने आठवीच्या इतिहास विषयातील पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा गौरवशाली विस्तारक्षेत्र दर्शवणारा नकाशा हटविल्याच्या चुकीच्या व अन्यायकारक निर्णयाविरोधात आता महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसं जातीभेद, धर्मभेद राजकीय मतभेद , गटतट विसरून मराठी बाण्यासाठी एकवटले असून शिवछत्रपतींच्या स्वराज्यातील श्रीमंत भोसले घराणे, श्रीमंत राजे शिर्के घराणे, सुभेदार मालुसरे घराणे आदी राजघराणे व सरदार वंशज घराण्यांसह अन्य मराठे शूरवीर सरदार घराणे, वीर मावळ्यांच्या घराण्याचे प्रमुख वंशज प्रतिनिधी, गडदुर्ग संवर्धक, इतिहास प्रेमी व शिव- शंभुभक्तांनी नुकतीच पुणे येथे दि. ५ मे २०२६ रोजी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे प्रमुख वंशज मान्यवरांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीईआरटीने तात्काळ चुक दुरुस्त करावी अन्यथा मराठे मुंबई, दिल्ली पर्यंत आंदोलना माध्यमातून धडकतील असा कडक इशारा राज्य व केंद्र सरकारला दिला आहे.
नागपूरचे राजे रघुजीराजे भोसले यांचे वंशज श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली एनसीईआरटी (NCERT) ने पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटविल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात कायदेशीर आव्हान देण्यात आले असून, सदर जनहित याचिका (PIL) इतिहासप्रेमी व वंशजांनी दाखल केली आहे. पत्रकार परिषदेत शंभुपत्नी महाराणी येसुबाईंचे वडील स्वराज्य निष्ठावंत श्रीमंत पिलाजीराव राजे शिर्के यांचे वंशज शंभुसेना प्रमुख श्रीमंत दिपकराजे शिर्के, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरेंचे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे आदींसह अन्य वंशज घराणी, गडदुर्ग संवर्धक , इतिहासप्रेमी, शिव-शंभुसैनिक व शिव- शंभुभक्त उपस्थित होते. यावेळी बोलताना वंशजांनी आक्रमक पवित्रा घेत केलेल्या चुकीबद्दल रोष व्यक्त केला.
याचिकाकर्ते राजे मुधोजी महाराज भोसले ( नागपूर ) , शंभुसेना प्रमुख दिपकराजे शिर्के ( पुणे ), शिवाजीराजे जाधव ( सिंदखेडराजा ) , ऋषिकेश निकम पाटील (छत्रपती संभाजीनगर) , रघुजीराजे आंग्रे (अलीबाग ) , रविंद्र पडवळ ( पुणे ) , कुणाल मालुसरे ( पुणे ) , राम नारायण मराठा पानीपत ( हरीयाणा ) , शरद मोडे ( बीड ) , अर्थव मारणे ( पुणे ) आदी असून याचिकेत मुख्य मुद्दे मांडत इतिहास विद्रुपीकरण कसे केले, याचिकेत सविस्तर नमूद करण्यात आले आहे की, मराठा साम्राज्याने अठराव्या शतकात भारताच्या मोठ्या भूभागावर अधिपत्य गाजवले होते. मात्र, एनसीईआरटीने ( NCERT ) नवीन बदलांमध्ये हा ऐतिहासिक नकाशा वगळून नवीन पिढीला खऱ्या इतिहासापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
एनसीईआरटीने थेट मराठा अस्मितेवरच घाला घातल्याने, मराठा साम्राज्य हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून ते अटकेपार पसरलेले राष्ट्रव्यापी मराठा साम्राज्य होते. असा नकाशा हटवणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शौर्य परंपरेचा , कार्य कर्तृत्वाचा, पराक्रमी वारशाचा , महाराष्ट्रातील व भारतातील आठरापगड जातीचा अपमान असल्याची भावना याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करून NCERT ला सुधारित पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा समाविष्ट करण्याचे आदेश द्यावेत, अशी मुख्य मागणी करण्यात आली आहे.
आपल्या पूर्वजांनी रक्ताचे पाणी करून हे रयतेचे स्वराज्य आणि मराठा साम्राज्य उभे केले. जगाला हेवा वाटेल असा आपला इतिहास आहे. पुस्तक, ग्रंथ, चित्रपट, सिरियल, मालिका, महानाट्य, नाटकाच्या माध्यमातून जर कोण इतिहास पुसण्याचा, चुकीचा दाखविण्याचा , तो कमी लेखण्याचा प्रयत्न करत असेल, तर महाराष्ट्रासह भारत देशातील, जगातील मराठा समाज व आम्ही वंशज मावळे गप्प बसणार नाही. भावी पिढीला शुद्ध आणि सत्य इतिहास मिळावा, यासाठीच आम्ही हा न्यायालयीन लढा पुकारला असल्याचे मत पत्रकार परिषदे दरम्यान श्रीमंत राजे मुधोजी भोसले, श्रीमंत दिपकराजे शिर्के, कुणाल मालुसरे व अन्य वंशजांनी व इतिहास प्रेमींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सदर याचिकेवर लवकरच मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. या लढ्याला शिव-शंभू प्रेमी आणि इतिहासकारांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. अनेक विविध मुद्याच्या आधारवर २६६ पानांची जनहित याचिका (PIL) मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पुणे येथील पत्रकार भवनात पत्रकार परिषदे प्रसंगी नागपूरचे महाराज राजे मुधोजी महाराज भोंसले, माजी सैनिक अधिकारी दिपकराजे शिर्के साहेब, सुभेदार कुणाल मालुसरे, रविंद्र पडवळ , ऋषिकेश निकम पाटील, चंद्रकांत ढेंबरे व इतर शिवप्रेमी, इतिहास प्रेमी संघटना, समर्थक मान्यवर उपस्थित होते.
शहर
- पुणे जिल्ह्यात पावसाचे थैमान! एक्सप्रेसवेवर भीषण दरड कोसळली, दोन्ही हायवे बंद; इंद्रायणीला पूर, आळंदीत दुकानांमध्ये शिरले पाणी
- मुंबईत मोठी दुर्घटना! मानखुर्दमध्ये तीन मजली चाळीचा भाग कोसळला; ४ लहान मुलांसह एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू
- पुणेकरांना मोठा दिलासा! खडकवासला धरणसाखळीतील जलसाठ्यात २४ तासांत लक्षणीय वाढ; पावसाचा जोर कायम
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!
महाराष्ट्र
- पुणे जिल्ह्यात पावसाचे थैमान! एक्सप्रेसवेवर भीषण दरड कोसळली, दोन्ही हायवे बंद; इंद्रायणीला पूर, आळंदीत दुकानांमध्ये शिरले पाणी
- मुंबईत मोठी दुर्घटना! मानखुर्दमध्ये तीन मजली चाळीचा भाग कोसळला; ४ लहान मुलांसह एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू
- पुणेकरांना मोठा दिलासा! खडकवासला धरणसाखळीतील जलसाठ्यात २४ तासांत लक्षणीय वाढ; पावसाचा जोर कायम
- कुर्ल्यातील दुर्घटना ठरली राजकीय आखाडा! झाड कोसळून वृद्धाच्या मृत्यूवर मुंबईच्या महापौर रितू तावडेंचा संताप; म्हणाल्या, 'ठाकरे गटाचा २५ वर्षांचा हिशेब काढू!'
गुन्हा
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
- भ्रष्टाचाराचा कुबेर! देवळाली कॅन्टोन्मेंटचे माजी सीईओ अजय कुमार यांच्यावर सीबीआयचा गुन्हा; १० वर्षांत ५२ हजारांची संपत्ती झाली थेट पाऊणेसहा कोटी!
- "जे लग्न कधी होणारच नाहीये, त्यासाठी आधार कशाला?" केतन अगरवाल हत्या प्रकरणात आरोपी सियाचे खळबळजनक व्हॉट्सॲप चॅट व्हायरल!
- उत्तर प्रदेश: पतीची हत्या करून मृतदेह बाथरुमच्या फरशीखाली गाडला; ४५ दिवस मृतदेहावरच आंघोळ केली!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- बाप रे, भामट्यांचा नवा कारनामा! चालती ई-रिक्षा ब्लूटूथने बंद करून थेट पैशांची मागणी; सायबर गुंडांचा नवा हायटेक स्कॅम उघड!
- इराणमध्ये युद्धाच्या छायेत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला सुरुवात! तेहरानमध्ये लाखो जनसमुदाय रस्त्यावर, डोनाल्ड ट्रम्प विरोधात संतापाचा उद्रेक!
- म्हैसूर दसऱ्याच्या 'जंबो सवारी'चा मानकरी; प्रसिद्ध 'अभिमन्यू' हत्तीचा सुळा तुटला! वन विभागाकडून उपचार सुरू
- E20 इथेनॉल मिश्रित इंधन वाहनांसाठी सुरक्षित, पण मायलेजवर होणार किंचित परिणाम; टोयोटा, बजाज, टीव्हीएस आणि सुझुकीचे मोठे स्पष्टीकरण!


























Subscribe to my channel



