मुंबई: राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी मानला जाणारा 'धारावी पुनर्विकास प्रकल्प' (Dharavi Redevelopment Project) प्रत्यक्षात आणण्यासाठी मुंबईतील पर्यावरणाचा मोठा बळी दिला जात आहे. या प्रकल्पाच्या उत्खनन व बांधकामासाठी संपूर्ण धारावी परिसरात सुमारे आठ हजार (८,०००) झाडे बाधित होणार असल्याचा धक्कादायक प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणापुढे सादर करण्यात आला आहे. यातील पहिल्या टप्प्यासाठी १,६९३ झाडे बाधित होणार असून, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ८७१ झाडे तोडण्यास व ८२२ झाडांचे पुनर्रोपण (Transplantation) करण्यास वृक्ष प्राधिकरनाने अधिकृत मंजुरी दिली आहे.
पालघरच्या चहाडे गावात २२,९०४ नवीन झाडे लावणार: धारावीतील झाडे तोडल्यानंतर होणाऱ्या पर्यावरणाच्या नुकसानाची भरपाई म्हणून, विकासक कंपनीने पालघर जिल्ह्यातील 'चहाडे' (Chahade) गावातील ९० एकर जागेवर २२,९०४ स्थानिक प्रजातींची नवीन झाडे लावण्याचे हमीपत्र महापालिकेला दिले आहे. झाडे कापल्यानंतर १५ दिवसांच्या आत किमान ६ फूट उंचीची रोपे लावली जातील आणि त्यांची पुढील ७ वर्षे नियमित देखभाल करण्याची जबाबदारी कंपनीवर असेल. याशिवाय धारावीतील उपलब्ध मोकळ्या जागांमध्ये ३० हजार झाडे लावण्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
५० ते ८५ वर्षे वयाच्या २४ 'वारसा वृक्षांवर' कुऱ्हाड: या निर्णयात सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे ५० ते ८५ वर्षे वयाची २५ 'वारसा झाडे' (Heritage Trees) या प्रकल्पात बाधित होत आहेत. त्यापैकी २४ ऐतिहासिक व जुने वारसा वृक्ष थेट तोडण्यास परवानगी देण्यात आली आहे, तर अवघ्या एकाच वारसा वृक्षाचे स्थलांतर केले जाईल.
विरोधकांचा तीव्र आक्षेप - मुंबईकरांना काय फायदा? वृक्ष प्राधिकरणाच्या या निर्णयावर राजकीय व सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्यांनी या प्रस्तावाला जोरदार विरोध दर्शवला आहे. "मुंबईतील हजारो झाडे तोडून त्यांची भरपाई मुंबईपासून १०० किमी दूर असणाऱ्या पालघर जिल्ह्यात करून मुंबईकरांना काय फायदा होणार?" असा जळजळीत सवाल माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. विकासकामांच्या नावाखाली मुंबईतील उरलीसुरली हिरवळ नष्ट केली जात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे.
शहर
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- नागपूर: "काँग्रेस स्वतःचे वेगळे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करतेय" अमृता फडणवीसांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल!
- नागपूर: "मी दिलेला निर्णय टिकून राहणार; सिब्बलांचे मत म्हणजे न्यायालयाचे मत नाही" एका विधानामुळे कायदेशीर व राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
- पुणे: "राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या पक्षासोबत युती करू नये, हेच महाराष्ट्राच्या आणि माझ्या मनातील आहे" हर्षवर्धन सपकाळ यांचे स्पष्ट भाष्य!
महाराष्ट्र
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- रत्नागिरी: चिपळूणमधील दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू! मासेमारीसाठी गेलेले दोघे मित्र बुडाले, गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडले मृतदेह
- नागपूर: "काँग्रेस स्वतःचे वेगळे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करतेय" अमृता फडणवीसांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल!
गुन्हा
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल


























Subscribe to my channel




