कोल्हापूर: पावसाळी पर्यटनाचा प्लॅन बदला! कोल्हापूरच्या शाहूवाडीतील प्रसिद्ध पर्यटनस्थळे ३१ जुलैपर्यंत बंद.

कोल्हापूर: जिल्ह्यात मान्सूनने जोर धरला असून जुलैच्या पहिल्याच आठवड्यात अतिवृष्टी झाल्याने प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पावसाळ्यातील धोकादायक स्थिती आणि संभाव्य दरड कोसळण्याच्या घटना लक्षात घेता, कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील प्रमुख
पर्यटनस्थळांवर ३१ जुलैपर्यंत प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.

बंद असलेली प्रमुख ठिकाणे:

धबधबे: शाहूवाडी तालुक्यातील बर्की, मानोली, उखळू आणि केर्ले येथील प्रसिद्ध धबधब्यांवर पर्यटकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

 

धरण परिसर: मानोली आणि कांडवन धरण परिसरातील पर्यटनावरही बंदी घालण्यात आली आहे.

इतर स्थळे: आंबा घाट आणि पावनखिंड परिसर हे पावसाळी पर्यटनासाठी अत्यंत लोकप्रिय आहेत, परंतु सुरक्षिततेच्या कारणास्तव महसूल विभागाने या ठिकाणीही पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असून पर्यटकांनी या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *