
Devendra Fadnavis on Maratha Andolan : जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला. त्यामुळे या लाठीहल्ल्यात अनेक आंदोलक जखमी झाले. तसेच काही पोलीसही जखमी झाले. त्यानंतर शिंदे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागत दोषींवर कारवाई करणार असल्याची ग्वाही दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासाठी बैठक झाली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद झाली.
या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीला खासदार उदयनराजे भोसले होते. तसेच माजी खासदार संभाजीराजे देखील फोनवर होते. यावेळी राज्यातील परिस्थितीवर चर्चा झाली. मागण्यांच्या संदर्भात ही चर्चा झाली'.
'जालन्यात जे काही झालं ते दुर्दैवी होतं. त्याचं समर्थन होऊ शकत नाही. मी मुख्यमंत्री असताना अनेक आंदोलने झाली, पण बळाचा वापर झाला नाही. या लाठीहल्ला प्रकरणात ज्यांना त्रास झाला, त्यांची माफी मागतो. दोषींवर कारवाई होणार, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
|
|
'या प्रकरणाचं राजकारण योग्य नाही. काही पक्ष तसेच करत आहेत. लाठीचार्ज करण्यासाठी आदेश एसपी, डीएसपी यांच्या स्तरावर होतो. मावळ येथे काही झालं, त्याला तेव्हाचे मुख्यमंत्री जबाबदार होते का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
'लोकांना यातील राजकारण दिसतं. मराठा आरक्षण २०१८ साली आलं. उच्च न्यायालयाने मान्य देखील केलं. आमचं सरकार असताना देखील सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी आणली नव्हती. मात्र सरकार बदलल्या नंतर हे झालं. उद्धव ठाकरे म्हणतात वटहुकूम काढा, मग त्यांनी का केलं नाही. आमच्या काळात ओबीसीप्रमाणे सगळ्या सुविधा मराठा समाजाला मिळाल्या, असे ते म्हणाले.
'अनेक योजना सुरू केल्या. विद्यार्थ्यांना रहिवाशी भत्ता सुरू केला, यूपीएससी आणि एमपीएससी च्या शिक्षणासाठी सोय केली. परदेशी शिष्यवृती योजना सुरू केली. सर्व निर्णय महायुतीच्या काळातच झाले. आम्ही मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवण्याचं काम केलं. आज पुळका आल्यासारखे वागत आहेत, त्यांनी घालवण्याचं काम केलं, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अजित पवारांची मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया
अजित पवार यावेळी म्हणाले, ' मी दोन दिवस आजारी होतो, त्यामुळे बाहेर पडू शकलो नाही. जालन्यात जे झाले ते व्हायला नको होतं, ही सगळ्यांचीच मागणी आहे. काही लोक त्याची राजकीय पोळी भाजत आहेत'.
'अनेक समाज आरक्षणाची मागणी करतात, पण तो कायद्याच्या कसोटीत बसायला हवा. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं. कोणत्या कारणाने टिकलं नाही, याचा अभ्यास गरजेचा आहे, असे ते म्हणाले.
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!


























Subscribe to my channel


