
Devendra Fadnavis on Maratha Andolan : जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला. त्यामुळे या लाठीहल्ल्यात अनेक आंदोलक जखमी झाले. तसेच काही पोलीसही जखमी झाले. त्यानंतर शिंदे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागत दोषींवर कारवाई करणार असल्याची ग्वाही दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासाठी बैठक झाली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद झाली.
या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीला खासदार उदयनराजे भोसले होते. तसेच माजी खासदार संभाजीराजे देखील फोनवर होते. यावेळी राज्यातील परिस्थितीवर चर्चा झाली. मागण्यांच्या संदर्भात ही चर्चा झाली'.
'जालन्यात जे काही झालं ते दुर्दैवी होतं. त्याचं समर्थन होऊ शकत नाही. मी मुख्यमंत्री असताना अनेक आंदोलने झाली, पण बळाचा वापर झाला नाही. या लाठीहल्ला प्रकरणात ज्यांना त्रास झाला, त्यांची माफी मागतो. दोषींवर कारवाई होणार, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
|
|
'या प्रकरणाचं राजकारण योग्य नाही. काही पक्ष तसेच करत आहेत. लाठीचार्ज करण्यासाठी आदेश एसपी, डीएसपी यांच्या स्तरावर होतो. मावळ येथे काही झालं, त्याला तेव्हाचे मुख्यमंत्री जबाबदार होते का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
'लोकांना यातील राजकारण दिसतं. मराठा आरक्षण २०१८ साली आलं. उच्च न्यायालयाने मान्य देखील केलं. आमचं सरकार असताना देखील सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी आणली नव्हती. मात्र सरकार बदलल्या नंतर हे झालं. उद्धव ठाकरे म्हणतात वटहुकूम काढा, मग त्यांनी का केलं नाही. आमच्या काळात ओबीसीप्रमाणे सगळ्या सुविधा मराठा समाजाला मिळाल्या, असे ते म्हणाले.
'अनेक योजना सुरू केल्या. विद्यार्थ्यांना रहिवाशी भत्ता सुरू केला, यूपीएससी आणि एमपीएससी च्या शिक्षणासाठी सोय केली. परदेशी शिष्यवृती योजना सुरू केली. सर्व निर्णय महायुतीच्या काळातच झाले. आम्ही मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवण्याचं काम केलं. आज पुळका आल्यासारखे वागत आहेत, त्यांनी घालवण्याचं काम केलं, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अजित पवारांची मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया
अजित पवार यावेळी म्हणाले, ' मी दोन दिवस आजारी होतो, त्यामुळे बाहेर पडू शकलो नाही. जालन्यात जे झाले ते व्हायला नको होतं, ही सगळ्यांचीच मागणी आहे. काही लोक त्याची राजकीय पोळी भाजत आहेत'.
'अनेक समाज आरक्षणाची मागणी करतात, पण तो कायद्याच्या कसोटीत बसायला हवा. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं. कोणत्या कारणाने टिकलं नाही, याचा अभ्यास गरजेचा आहे, असे ते म्हणाले.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.



























Subscribe to my channel



