महाराष्ट्र: सध्या महाराष्ट्रभरातील वीज ग्राहकांना महावितरणकडून (MSEDCL) एक धक्कादायक व्हॉट्सॲप मेसेज प्राप्त होत आहे. ज्या ग्राहकांच्या घरी अद्याप 'स्मार्ट मीटर' बसवण्यात आलेले नाहीत, अशा ग्राहकांना हा मेसेज पाठवला जात आहे. यामध्ये "पुढील ४८ तासांच्या आत तुमचे सध्याचे मीटर बदलून त्याऐवजी स्मार्ट मीटर बसवण्यात येईल," अशी पूर्वसूचना देण्यात आली आहे. या मेसेजमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मेसेजमध्ये नक्की काय म्हटले आहे?
महावितरणने पाठवलेल्या मेसेजमध्ये स्पष्ट केले आहे की, १७ ऑगस्ट २०२१ रोजी भारत सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ही प्रक्रिया राबवली जात आहे. मेसेज मिळाल्यापासून ४८ तासांनंतर महावितरणचे अधिकृत प्रतिनिधी ग्राहकांच्या घरी येऊन जुने मीटर काढून तिथे नवीन स्मार्ट मीटर बसवतील. ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
स्मार्ट मीटरचे फायदे (महावितरणचा दावा):
१. मानवी हस्तक्षेपाशिवाय अचूक बिलिंग होईल.
२. मोबाईल ॲपद्वारे ग्राहक स्वतःच्या वीज वापरावर आणि बिलावर लक्ष ठेवू शकतील.
३. घरगुती ग्राहकांना 'सोलर अवर' (Solar Hours) मध्ये प्रति युनिट ८५ पैशांची सवलत मिळेल.
ग्राहकांचा विरोध का?
या मेसेजमुळे राज्यातील अनेक भागांतून संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कुठेही बळजबरीने स्मार्ट मीटर बसवले जाणार नाहीत, असे आश्वासन दिले होते. मात्र, आता अचानक '४८ तासांच्या' अल्टिमेटममुळे हे आश्वासन पाळले जात नसल्याचा आरोप ग्राहक संघटनांनी केला आहे. याव्यतिरिक्त, अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिल भरमसाठ आल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.
महत्त्वाची टीप:
महावितरणने स्पष्ट केले आहे की, जर एखाद्या ग्राहकाचे मीटर आधीच बदलले गेले असेल किंवा बदलण्याची प्रक्रिया सुरू असेल, तर त्यांनी हा मेसेज दुर्लक्षित करावा. मात्र, सक्तीच्या या प्रक्रियेमुळे पुन्हा एकदा 'स्मार्ट मीटर' विरुद्ध ग्राहक असा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहर
- मुंबई: अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता तुकाराम मुंढेंच्या रडारवर!
- पुणे: बारामतीच्या प्रकाशवैभवाचा जगभर डंका! काशीविश्वेश्वर पुलाच्या 'कॅनोपी ऑफ लाइट्स' प्रकल्पाला मानाचा आंतरराष्ट्रीय 'लाईट जस्टिस अवॉर्ड २०२६' जाहीर!
- पुणे: दहीहंडी वाहतूक अलर्ट; शहरात मोठे वाहतूक बदल आणि निर्बंध लागू, प्रशासनाकडून पर्यायी मार्गांची घोषणा!
- पुणे: हो, आमच्याकडून चुका झाल्या, आवाज आणि स्पर्धा वाढली, आता नियमांचे पालन करू गणेशोत्सवापूर्वी पुणे साऊंड व्यावसायिकांची मोठी कबुली!
महाराष्ट्र
- मुंबई: अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता तुकाराम मुंढेंच्या रडारवर!
- पुणे: बारामतीच्या प्रकाशवैभवाचा जगभर डंका! काशीविश्वेश्वर पुलाच्या 'कॅनोपी ऑफ लाइट्स' प्रकल्पाला मानाचा आंतरराष्ट्रीय 'लाईट जस्टिस अवॉर्ड २०२६' जाहीर!
- सिंधुदुर्ग: दोडामार्गात 'ओंकार' हत्तीचे प्रचंड तांडव! शेती आणि बागायतीचे मोठे नुकसान, ग्रामीण भागात भीतीचे वातावरण!
- चिपळूण: महसूल विभागात खळबळ! जमिनीच्या फेरफार नोंदीसाठी १० हजारांची लाच घेताना मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
गुन्हा
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
- सांगली: पलूसमध्ये घरगुती वादातून पती-पत्नीचे टोकाचे पाऊल; विषारी औषध प्राशन करून दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला



























Subscribe to my channel




