
BJP Leader post for Salman Khan : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी (१२ ऑक्टोबरला) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. बाबा सिद्दीकी (Baba Siddique Shot Dead) यांच्या हत्येची जबाबदारी बिष्णोई गँगने घेतली आहे. फेसबुकवर एक पोस्ट शेअर करून त्यांनी याची जबाबदारी घेतली. यानंतर सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट्सच्या बाहेरील सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. याच दरम्यान, भाजपा नेते हरनाथ सिंह यादव यांनी सलमान खानने माफी मागावी, असं म्हटलं आहे.
हरनाथ सिंह यादव हे भाजपाचे माजी राज्यसभा खासदार आहेत. हरनाथ सिंह यांनी एक्सवर एक पोस्ट करून सलमान खानला बिश्नोई समाजाची माफी मागण्याचा सल्ला दिला आहे.
“प्रिय, सलमान खान..
बिश्नोई समाज ज्याला देव मानतो, त्या काळवीटाची तुम्ही शिकार केली आणि तुम्ही त्याला शिजवून खाल्लं. त्यामुळे बिष्णोई समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि मागच्या बऱ्याच वर्षांपासून तुमच्याबद्दल त्यांच्या मनात नाराजी आहे. माणसाकडून चुका होतात, तुम्ही मोठे अभिनेते आहात, देशात मोठ्या संख्येने लोक तुमच्यावर प्रेम करतात. त्यामुळे तुम्ही बिष्णोई समाजाच्या भावनांचा आदर करून तुमच्याकडून झालेल्या मोठ्या चुकीबद्दल बिश्नोई समाजाची माफी मागावी, असा माझा तुम्हाला प्रामाणिक सल्ला आहे,” अशी पोस्ट हरनाथ सिंह यादव यांनी केली आहे.
|
|
हरनाथ सिंह यादव यांच्या पोस्टवर लोक विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. काही लोकांनी हरनाथ सिंह यांनी दिलेला सल्ला योग्य असल्याचं म्हटलं आहे. काहींनी सलमानवर टीका केली आहे.
सलमानवर काळवीटांची शिकार केल्याचा आरोप
सलमान खानने एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजस्थानमध्ये १९९८ साली दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप झाला होता. यासंदर्भात त्याच्याविरोधात खटला दाखल झाला आणि अनेक वर्षांच्या सुनावणीनंतर त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तेव्हापासून बिश्नोई गँग सलमान खान जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे.
काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या घरावर झाला गोळीबार
एप्रिल २०२४ मध्ये सलमान खानच्या मुंबईतील घरावर गोळीबार करण्यात आला होता, त्याला सतत ई-मेलद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या येतात. त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसचीही रेकी करण्यात आली होती. गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये झालेल्या गोळीबारानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. सलमानची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे.
शहर
- पुणे: दहीहंडी उत्सवात कर्णकर्कश लाऊडस्पीकर आणि डीजेचा दणदणाट रोखण्यात पोलीस पूर्णपणे अपयशी; पुणेकरांचा संतप्त आरोप
- मुंबई: गणेशोत्सवापूर्वीच देशभक्तीचा उत्साह; सीमेवरील जवानांसाठी ठाणे-डोंबिवलीतून दिवाळी फराळ पाठवण्याची जय्यत तयारी सुरू
- नाशिक: ठक्कर बाजार बसस्थानकात मोठी दुर्घटना; त्र्यंबकेश्वरला जाताना गर्दीत धक्का लागल्याने बसखाली आल्याने १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू
- मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील वादग्रस्त वक्तव्यावरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
महाराष्ट्र
- पुणे: दहीहंडी उत्सवात कर्णकर्कश लाऊडस्पीकर आणि डीजेचा दणदणाट रोखण्यात पोलीस पूर्णपणे अपयशी; पुणेकरांचा संतप्त आरोप
- मुंबई: गणेशोत्सवापूर्वीच देशभक्तीचा उत्साह; सीमेवरील जवानांसाठी ठाणे-डोंबिवलीतून दिवाळी फराळ पाठवण्याची जय्यत तयारी सुरू
- गोवा: २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेची मोठी तयारी; २१ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत
- मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील वादग्रस्त वक्तव्यावरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला



























Subscribe to my channel




