
New Delhi : बांगलादेशमध्ये सरकारी नोकरीतील आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. सरकारी नोकरीतील आरक्षणाच्या विरोधात बांगलादेशातील शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या आरक्षणाच्या विरोधात झालेल्या हिंसाचारत आतापर्यंत ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५०० हून अधिक आंदोलनकर्ते जखमी झाले आहेत. आंदोलनकर्त्यांकडून बस आणि खासगी वाहनांची जाळपोळ सुरु आहे.
आरक्षणाच्या विरोधामुळे झालेल्या हिंसाचारात बांगलादेशात बस, ट्रेन आणि मेट्रो सेवा ठप्प झाली आहे. हिंसाचार रोखण्यासाठी सरकारने इंटरनेट बंद केलं आहे. कॉलेज, प्राथनास्थळे बंद करण्यात आली आहे. पूर्ण देशभरात हिंसाचार नियंत्रणात आणण्याासाठी मोठ्या प्रमाणात सैनिकांना रस्त्यावर उतरवण्यात आलं आहे.
|
|
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सरकारच्या नॅशनल टेलीव्हिजनवर देशाला संबोधित केलं. या निवेदनात पंतप्रधान हसीना यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. मात्र, पंतप्रधान हसीना यांच्या आवाहनानंतर आंदोलनकर्ते आणखी आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारी टेलिव्हिजनचं कार्यालयलाच आग लावली. या कार्यालयात अनेक पत्रकारांसहित १२०० कर्मचारी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने मोठ्या शिताफीने त्यांचा बचाव केला.
आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी रबरच्या गोळ्या आणि अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या. यात अनेक आंदोलकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. तेथील अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. ढाका आणि संपूर्ण देशातील बस सेवा बंद करण्यात आली आहे. ढाकाच्या गबटोली आणि सईदाबाद बस टर्मिनलवरील कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या बस न चालवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ढाका टाइम्सच्या रिपोर्टनुसार, त्याच्या एका पत्रकाराचा ढाका येथील हिंसाचाराचं वृत्तांकन करताना मृत्यू झाला आहे. आंदोलनकर्त्यांनी ढाकामध्ये कनाडा विद्यापीठात संकुलात आंदोलन केलं. यावेळी विद्यापीठाच्या छतावर ६० पोलीस कर्मचारी अकडले होते. त्यांचा हेलिकॉप्टरच्या मदतीने बचाव करण्यात आला आहे.
बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाला विरोध करत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. यामुळे देशातील अनेक भागात हिंसाचार सुर आहे. या हिंसाराच्या घटनेमुळे शाळा, महाविद्यालये, कार्यालय बंद ठेवण्यात आले आहेत. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावास सतर्क झाले आहे. दूतावासाने बांगलादेशातील भारतीयांसाठी अॅडव्हायझरी जारी केली आहे. भारतीयांनी अनावश्यक प्रवास करू नका, अशा सूचना देण्यात आल्या आहे. तसेच भारतीयांनी बांगलादेशात कोणताही प्रवास टाळावा, असे सल्लागार सूचनेत म्हटलं आहे. दूतावासाने हेल्पलाईन क्रमांकही जारी केला आहे.
बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या कुटुंबातील सदस्यांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देऊ नये, अशी मागणी केली जात आहे. मात्र पंतप्रधान शेख हसीना यांनी आरक्षण संपवण्यास स्पष्ट नकार दिलाय. त्यावरून या देशात आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली





























Subscribe to my channel




