
New Delhi : बांगलादेशमध्ये सरकारी नोकरीतील आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. सरकारी नोकरीतील आरक्षणाच्या विरोधात बांगलादेशातील शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या आरक्षणाच्या विरोधात झालेल्या हिंसाचारत आतापर्यंत ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५०० हून अधिक आंदोलनकर्ते जखमी झाले आहेत. आंदोलनकर्त्यांकडून बस आणि खासगी वाहनांची जाळपोळ सुरु आहे.
आरक्षणाच्या विरोधामुळे झालेल्या हिंसाचारात बांगलादेशात बस, ट्रेन आणि मेट्रो सेवा ठप्प झाली आहे. हिंसाचार रोखण्यासाठी सरकारने इंटरनेट बंद केलं आहे. कॉलेज, प्राथनास्थळे बंद करण्यात आली आहे. पूर्ण देशभरात हिंसाचार नियंत्रणात आणण्याासाठी मोठ्या प्रमाणात सैनिकांना रस्त्यावर उतरवण्यात आलं आहे.
|
|
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सरकारच्या नॅशनल टेलीव्हिजनवर देशाला संबोधित केलं. या निवेदनात पंतप्रधान हसीना यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. मात्र, पंतप्रधान हसीना यांच्या आवाहनानंतर आंदोलनकर्ते आणखी आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारी टेलिव्हिजनचं कार्यालयलाच आग लावली. या कार्यालयात अनेक पत्रकारांसहित १२०० कर्मचारी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने मोठ्या शिताफीने त्यांचा बचाव केला.
आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी रबरच्या गोळ्या आणि अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या. यात अनेक आंदोलकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. तेथील अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. ढाका आणि संपूर्ण देशातील बस सेवा बंद करण्यात आली आहे. ढाकाच्या गबटोली आणि सईदाबाद बस टर्मिनलवरील कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या बस न चालवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ढाका टाइम्सच्या रिपोर्टनुसार, त्याच्या एका पत्रकाराचा ढाका येथील हिंसाचाराचं वृत्तांकन करताना मृत्यू झाला आहे. आंदोलनकर्त्यांनी ढाकामध्ये कनाडा विद्यापीठात संकुलात आंदोलन केलं. यावेळी विद्यापीठाच्या छतावर ६० पोलीस कर्मचारी अकडले होते. त्यांचा हेलिकॉप्टरच्या मदतीने बचाव करण्यात आला आहे.
बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाला विरोध करत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. यामुळे देशातील अनेक भागात हिंसाचार सुर आहे. या हिंसाराच्या घटनेमुळे शाळा, महाविद्यालये, कार्यालय बंद ठेवण्यात आले आहेत. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावास सतर्क झाले आहे. दूतावासाने बांगलादेशातील भारतीयांसाठी अॅडव्हायझरी जारी केली आहे. भारतीयांनी अनावश्यक प्रवास करू नका, अशा सूचना देण्यात आल्या आहे. तसेच भारतीयांनी बांगलादेशात कोणताही प्रवास टाळावा, असे सल्लागार सूचनेत म्हटलं आहे. दूतावासाने हेल्पलाईन क्रमांकही जारी केला आहे.
बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या कुटुंबातील सदस्यांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देऊ नये, अशी मागणी केली जात आहे. मात्र पंतप्रधान शेख हसीना यांनी आरक्षण संपवण्यास स्पष्ट नकार दिलाय. त्यावरून या देशात आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



