Odisha Train Accident: ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघात प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयने (CBI) मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी सीबीआयने तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक केली. या प्रकरणात ही पहिली अटकची कारवाई आहे. यामध्ये वरिष्ठ विभाग अभियंता अरुणकुमार मोहंता, वरिष्ठ विभाग अभियंता मोहम्मद अमीर खान आणि तंत्रज्ञ पप्पू कुमार अशी अटक करण्यात आलेल्या तिन्ही रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं आहेत.
अरुणकुमार मोहंता, मोहम्मद अमीर खान आणि पप्पू कुमार यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम 304 आणि 201 अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिन्ही कर्मचारी बालासोर जिल्ह्यात तैनात आहेत. आरोपी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पुराव्याशी छेडछाड करत असल्याचे सीबीआयला तपासात आढळून आले.अटक आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
2 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता बाहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्स्प्रेसने स्टेशनजवळ उभ्या असलेल्या मालगाडीला जोरदार धडक दिली. त्यानंतर बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसही त्याच्या कचाट्यात आली. या भीषण रेल्वे अपघातात 292 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर 1000 हून अधिक जण जखमी झाले होते. या भीषण रेल्वे अपघातानंतर रेल्वेने चौकशीसाठी समिती स्थापन केली होती. यासोबतच या संपूर्ण प्रकरणाचा तपास 6 जूनला सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या समितीला अपघाताचे मुख्य कारण 'चुकीचे सिग्नलिंग' असल्याचे आढळून आले आहे.
कमिशन ऑफ रेल्वे सेफ्टीने (CRS) रेल्वे बोर्डाला सादर केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, अपघाताच्या ठिकाणी असलेल्या बहानगा बाजार येथील स्टेशन मॅनेजरने S&T कर्मचार्यांना दोन समांतर ट्रॅक जोडणार्या स्विचच्या कामात अडथळे येत असल्याचे सांगितले असते तर दुरुस्ती करण्यात आली असती. नुकताच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बालासोर जिल्ह्यातील बहानगा मार्केट आणि त्याच्या आसपासच्या गावांच्या विकासासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!

























Subscribe to my channel


