मुंबई: आषाढी एकादशी यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो विठ्ठलभक्तांच्या आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यंदाही पूर्ण ताकदीने सज्ज झाले आहे. भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सुखकर व्हावा या उद्देशाने एसटी महामंडळाने राज्यभरातून तब्बल ५ हजार ५०० विशेष बसेस सोडण्याचे भव्य नियोजन केले आहे. या संदर्भातील महत्त्वाची माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
गावातून थेट पंढरपूर बससेवा आणि विशेष सवलती
मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले की, राज्यातील कोणत्याही गावातून जर ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केली, तर थेट त्या गावातून पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल. वारकऱ्यांनी यासाठी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी (Depot) संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या विशेष बस फेऱ्यांमध्येही शासनाच्या सर्व प्रवासी सवलती नेहमीप्रमाणे लागू राहतील:
-
७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक: 'अमृत ज्येष्ठ नागरिक योजना' अंतर्गत पूर्णपणे मोफत प्रवास.
-
महिला प्रवाशी: 'महिला सन्मान योजना' अंतर्गत तिकीट दरात ५० टक्के विशेष सवलत.
चार तात्पुरती बस स्थानके आणि कडक नियोजन
आषाढी वारीदरम्यान पंढरपूर येथे होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने शहरात चार तात्पुरती बस स्थानके उभारण्याचा निर्णय घेतला आहे:
१. चंद्रभागा बस स्थानक
२. भीमा बस स्थानक (देगाव)
३. विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक
४. पांडुरंग बस स्थानक (आयटीआय महाविद्यालय)
या तात्पुरत्या स्थानकांवर पिण्याचे शुद्ध पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष आणि मार्गदर्शन फलक अशा सर्व आवश्यक सुविधा पुरवल्या जाणार आहेत. तसेच, एकादशीच्या दिवशी परतीच्या प्रवासाची कोंडी टाळण्यासाठी ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने वाहतूक व्यवस्था सांभाळणार आहेत.
कर्मचाऱ्यांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था
"वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा" या भावनेने अहोरात्र रात्रंदिवस कर्तव्य बजावणारे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी आणि पर्यवेक्षक अशा सुमारे १३ हजार कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच्या खर्चाने चहा, नाश्ता आणि भोजनाची उत्तम व्यवस्था केली आहे. मागील वर्षी एसटीने ५,२०० बसेसद्वारे २१ लाख ९५ हजार भाविकांना सेवा दिली होती, यंदा ५,५०० बसेससह हे नियोजन अधिक सक्षम करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/
शहर
- मुंबई: मुख्यमंत्र्यांची धडाडीची कारवाई! मंत्री कार्यालयातील तब्बल ५५० नियमबाह्य कर्मचाऱ्यांना मूळ विभागात परत पाठवले, मंत्रालयात खळबळ!
- नाशिक: सरकारी डॉक्टरचा संतापजनक प्रताप; सुसाट लक्झरी कार दामटून इतर वाहनांना धडक आणि पादचाऱ्यांना उडवले!
- मुंबई: रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने कुर्ल्यात घरीच झाली प्रसूती, प्रसूतीनंतर महिलेला चादरीतून झोळी करून नेण्याची आली वेळ!
- पुणे: रविवारी यार्डमध्ये तब्बल ९ तासांचा मेगाब्लॉक; ७ गाड्या रद्द, मेन लाईनवरील वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल होणार!
महाराष्ट्र
- मुंबई: मुख्यमंत्र्यांची धडाडीची कारवाई! मंत्री कार्यालयातील तब्बल ५५० नियमबाह्य कर्मचाऱ्यांना मूळ विभागात परत पाठवले, मंत्रालयात खळबळ!
- नाशिक: सरकारी डॉक्टरचा संतापजनक प्रताप; सुसाट लक्झरी कार दामटून इतर वाहनांना धडक आणि पादचाऱ्यांना उडवले!
- अहिल्यानगर: महाराष्ट्रात अपघातांची मालिका सुरूच! अहिल्यानगर, भंडारा आणि नांदेडमधील भीषण अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू!
- मुंबई: रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने कुर्ल्यात घरीच झाली प्रसूती, प्रसूतीनंतर महिलेला चादरीतून झोळी करून नेण्याची आली वेळ!
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



