मुंबई: आषाढी एकादशी यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो विठ्ठलभक्तांच्या आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यंदाही पूर्ण ताकदीने सज्ज झाले आहे. भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सुखकर व्हावा या उद्देशाने एसटी महामंडळाने राज्यभरातून तब्बल ५ हजार ५०० विशेष बसेस सोडण्याचे भव्य नियोजन केले आहे. या संदर्भातील महत्त्वाची माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
गावातून थेट पंढरपूर बससेवा आणि विशेष सवलती
मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले की, राज्यातील कोणत्याही गावातून जर ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केली, तर थेट त्या गावातून पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल. वारकऱ्यांनी यासाठी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी (Depot) संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या विशेष बस फेऱ्यांमध्येही शासनाच्या सर्व प्रवासी सवलती नेहमीप्रमाणे लागू राहतील:
-
७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक: 'अमृत ज्येष्ठ नागरिक योजना' अंतर्गत पूर्णपणे मोफत प्रवास.
-
महिला प्रवाशी: 'महिला सन्मान योजना' अंतर्गत तिकीट दरात ५० टक्के विशेष सवलत.
चार तात्पुरती बस स्थानके आणि कडक नियोजन
आषाढी वारीदरम्यान पंढरपूर येथे होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने शहरात चार तात्पुरती बस स्थानके उभारण्याचा निर्णय घेतला आहे:
१. चंद्रभागा बस स्थानक
२. भीमा बस स्थानक (देगाव)
३. विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक
४. पांडुरंग बस स्थानक (आयटीआय महाविद्यालय)
या तात्पुरत्या स्थानकांवर पिण्याचे शुद्ध पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष आणि मार्गदर्शन फलक अशा सर्व आवश्यक सुविधा पुरवल्या जाणार आहेत. तसेच, एकादशीच्या दिवशी परतीच्या प्रवासाची कोंडी टाळण्यासाठी ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने वाहतूक व्यवस्था सांभाळणार आहेत.
कर्मचाऱ्यांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था
"वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा" या भावनेने अहोरात्र रात्रंदिवस कर्तव्य बजावणारे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी आणि पर्यवेक्षक अशा सुमारे १३ हजार कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच्या खर्चाने चहा, नाश्ता आणि भोजनाची उत्तम व्यवस्था केली आहे. मागील वर्षी एसटीने ५,२०० बसेसद्वारे २१ लाख ९५ हजार भाविकांना सेवा दिली होती, यंदा ५,५०० बसेससह हे नियोजन अधिक सक्षम करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/
शहर
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठा उलटफेर! पुढील चार आठवडे पावसाचं असमान वितरण आणि तूट राहण्याचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता वाढली!
- आजचे राशिभविष्य २१ ऑगस्ट २०२६: शुक्र देणार पैसा, लक्झरी आणि सुख-समृद्धी; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!
- पुणे: भावाला वाचवताना दोघांचा करुण अंत, पुण्याच्या दौंडमध्ये विजेचा शॉक लागून दोन चुलत भावांचा मृत्यू आई थोडक्यात बचावली!
महाराष्ट्र
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- नक्कीच पुढच्या जन्मी डॉक्टर बनेल... वैद्यकीय परीक्षेच्या तणावातून १९ वर्षीय सूरजचे टोकाचे पाऊल!
गुन्हा
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!




























Subscribe to my channel



