
Amravati News : अमरावती खासदार कार्यालय कुलूप तोड प्रकरण आता चांगलंच तापल्याचं दिसत आहे. याप्रकरणी 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यात काँग्रेस नेत्या आणिआमदार यशोमती ठाकूर यांच्यासह नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचाही समावेश आहे. दरम्यान, काँग्रेसनं ताब्यात घेतलेलं अमरावती खासदार कार्यालय आता जिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा सील करण्यात आलं आहे. आता पुन्हा कार्यालय सील केल्यानं नव्यानं वाद पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना, आमचा खासदार मागासवर्गीय आहे म्हणून त्यांना अशी वागवणूक दिल्या जात असल्याचा खळबळजनक आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. शिवाय या कट-कारस्थानमागे भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे आणि आमदार रवी राणा यांचा हात असल्याचाही आरोप त्यांनी केलाय.
आमचा खासदार मागासवर्गीय,म्हणून ही वागवणूक
लोकसभा निवडणुकीचा निकाल हा 4 जूनला लागला. त्यानंतर खासदार कार्यालय संबंधित पत्र संबंधित विभागाला देण्यात आले होते. मात्र असे असताना देखील त्यात वारंवार दिरंगाई होताना दिसत होती. त्यानंतर याबाबत पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना देखील याबद्दल विनंती करण्यात आली. मात्र, जिल्ह्यातले इतर प्रश्न ज्याप्रमाणे सोडवू शकत नाही, त्याचप्रमाणे त्यांनी हा ही प्रश्न सोडवला नाही. एखादा समजदार पालकमंत्री असता तर त्यानी वेळीच हा प्रश्न मार्गी लावून हा विषय संपवला असता.
|
|
मात्र, असे न होता त्यांनी अतिशय खालच्या पद्धतीने वागणूक आम्हाला दिली. आमचा खासदार हा एक मागासवर्गीय समाजाचा आहे. म्हणून मीटिंगमध्ये देखील त्यांना तिसऱ्या ठिकाणी बसवतात. आल्यावर त्यांना खुर्चीही मिळत नाही. खासदार बळवंत वानखडे यांना उभं राहावं लागतं. अतिशय अपमानास्पद वागणूक त्यांना दिली जाते. शिवाय या कट-कारस्थानमागे आमदार रवी राणा आणि अनिल बोंडे हे या मागचे सूत्रधार आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
तर त्यालाही उत्तर दिलेच पाहिजे- यशोमती ठाकूर
अमरावतीतील खासदार कार्यालय हे नवनिर्वाचित खासदारांना देण्यात यावं, असा 2015 मध्ये निर्णय झाला होता. यासंबंधीत जी काही नियमावली काढली होती त्यानुसार वर्धा आणि अमरावती येथील दोन खासदारांसाठी राखीव आहे. मात्,र अद्याप तरी असे झालेले नाही. परिणामी, वारंवार निवेदन आणि तक्रारी करून देखील आम्हाला न्याय मिळत नसेल तर लोकशाहीमध्ये आंदोलनाचा अधिकार सर्वांना आहे. कालचे जे पाऊल होते ते आम्ही उचलले आणि न्याय मागितला. त्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल केले त्याची आम्हाला परवा नाही.
मात्र केवळ सर्वधर्म समभाव या विचारांची, काँग्रेसची लोक त्या ठिकाणी बसली नाही पाहिजे या विचारतून हे कृत्य झाले आहे. मात्र या गोष्टीला आम्ही घाबरत नाही. आज राज्यात तुमची सत्ता आहे. उद्या आमची सत्ता येईल. इथून पुढे पण भरपूर काम करायची आहे. मात्र या कामात जर अशा पद्धतीने अडथळे निर्माण केले जात असतील तर त्यालाही उत्तर दिलेच पाहिजे. असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
शहर
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
महाराष्ट्र
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू


























Subscribe to my channel




