बॉलीवूडचा रैंचो परत येतोय! '३ आयडीयट्स' च्या प्रचंड लोकप्रिय चित्रपटाचा सिक्वेल बनणार असल्याची अधिकृत पुष्टी अभिनेता आमिर खान यांनी आज दिली आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शन करणार असलेल्या या सिक्वेलमध्ये रांचो, फरहान आणि राजू यांच्या आयुष्याची १० वर्षांनंतरची कहाणी दाखवली जाणार आहे.
आमिर खान यांनी अमर उजाला या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “राजकुमार हिरानी सध्या '३ आयडीयट्स २' वर काम करत आहेत. मी त्यांचे Narration ऐकले आहे. ते खूप चांगले आहे. स्क्रिप्टवर अजून थोडे काम बाकी आहे, पण कथा अतिशय सुंदर आहे. त्यात पहिल्या चित्रपटासारखाच ह्युमर आहे आणि एक अनोखी स्टोरी आहे. ही तेच तीन आयडीयट्सची कहाणी आहे, पण १० वर्षांनंतरची.”
आमिर यांनी फुन्सुख वांगडू अर्थात रांचोची भूमिका पुन्हा साकारण्याची तयारी दर्शवली आहे. ते म्हणाले, “ही अशी एक फिल्म आहे ज्यावर मी लवकरच काम करणार आहे. अभिजात आणि राजू यांनी ही कथा खूप चांगली लिहिली आहे. मीही ती करण्यासाठी उत्सुक आहे.”
मूळ कलाकारांची पुनरागमन
पहिल्या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारे आर. माधवन (फरहान) आणि शरमन जोशी (राजू) हे देखील सिक्वेलमध्ये परतणार असल्याचे संकेत मिळत आहेत. करीना कपूर खान यांच्या भूमिकेबद्दलही चर्चा सुरू आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन पुन्हा राजकुमार हिरानी करणार असून, स्क्रिप्ट अंतिम टप्प्यात आहे.
२००९ चा ब्लॉकबस्टर
'३ आयडीयट्स' हा २००९ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वकालीन यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. त्याने शिक्षण पद्धतीवर, दबावावर आणि जीवन जगण्याच्या मार्गावर टीका करत लाखो तरुणांच्या मनात घर केले. चित्रपटाने जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.
फॅन्स आता या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत.
कधी येणार?
शूटिंग लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे, मात्र रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही.
ही बातमी ऐकून 'आल इज वेल' म्हणत सर्व 'आयडीयट्स' फॅन्स आनंदात आहेत!
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




