Tragedy at Marine Drive: 19-Year-Old Mulund Youth Dies in Bike Crash After Birthday Celebration; Parents’ Worst Fears Come True

मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; वाढदिवसाचा आनंद विरला, मुलुंडच्या १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

Tragedy at Marine Drive: 19-Year-Old Mulund Youth Dies in Bike Crash After Birthday Celebration; Parents’ Worst Fears Come Trueमुंबई: मित्रांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या एका १९ वर्षीय तरुणाचा मरीन ड्राईव्हवर झालेल्या भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. कृष्णा देसाई असे या मृत तरुणाचे नाव असून तो मुलुंडचा रहिवासी होता. या अपघातामुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नेमकी घटना काय?
कृष्णा रविवारी संध्याकाळी आपल्या मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने त्याचे आई-वडील काळजीत होते. त्यांनी कृष्णाच्या मोबाईलवर सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फोन बंद येत होता. रात्रभर पालकांच्या डोळ्याला डोळा लागला नाही. सोमवारी सकाळी पोलिसांकडून अपघाताची बातमी मिळाल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

वडिलांनी हट्टाने घेतली होती बाईक:
मिळालेली माहिती अशी की, कृष्णा हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. त्याने आपल्या वडिलांकडे 'केटीएम' (KTM) बाईक घेण्यासाठी हट्ट धरला होता. मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी वडिलांनी त्याला बाईक घेऊन दिली होती. मुलगा बाईक घेऊन जास्त दूर जाऊ नये म्हणून वडील नेहमी टाकीत पेट्रोल कमी ठेवत असत. रविवारीही त्यांनी पेट्रोलसाठी फक्त २०० रुपये दिले होते, मात्र तरीही कृष्णा मुंबईच्या दुसऱ्या टोकाला मरीन ड्राईव्हपर्यंत पोहोचला.

अपघाताचा तपशील:
पहाटे साडेपाचच्या सुमारास मरीन ड्राईव्ह परिसरात कृष्णाच्या बाईकचा अपघात झाला. या अपघातात कृष्णासोबत कफ परेड येथील रहिवासी असलेली चांदणी नावाची तरुणीही होती. या भीषण धडकेत कृष्णाचा मृत्यू झाला, तर तिथे मॉर्निंग वॉकसाठी आलेले किशोर लामणे या ज्येष्ठ नागरिकाचाही या अपघातात दुर्दैवी अंत झाला. लामणे हे गिरगावचे रहिवासी होते आणि गेली अनेक वर्षे तिथे व्यायामासाठी येत असत.

पोलीस तपास:
मरीन ड्राईव्ह पोलिसांनी याप्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा आणि चांदणी यांची ओळख कशी झाली आणि रात्रभर कृष्णा कुठे होता, याचा तपास पोलीस करत आहेत. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा शेवट अशा प्रकारे मृत्यूत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



इतर

पुणे : भारतात तोंडाच्या आरोग्याकडे अजूनही अनेकदा दुर्लक्ष केले जाते. अनेक जण दातदुखी किंवा गंभीर त्रास होईपर्यंत उपचार पुढे ढकलतात. मात्र, दंततज्ज्ञांच्या मते ही सवय भविष्यात अधिक महाग ठरू शकते. पुण्यातील दंतचिकित्सक डॉ. प्रेयस गायकवाड यांनी सांगितले की, किडलेले दात, हिरड्यांचे संसर्ग, दातांच्या रचनेतील समस्या अशा अनेक तक्रारी हळूहळू वाढत जातात. योग्य वेळी तपासणी आणि उपचार झाले तर हे प्रश्न सहज, कमी वेळात आणि कमी खर्चात सोडवता येतात. “रुग्ण योग्य वेळी आले तर उपचार सोपे, जलद आणि कमी खर्चिक होतात. उशीर केल्यास समस्या अधिक गुंतागुंतीच्या होतात,” असे डॉ. गायकवाड म्हणाले. आधुनिक दंतसेवांमध्ये आता प्रौढांसह मुलांसाठीही सर्वसमावेशक उपचार उपलब्ध आहेत. यामध्ये नियमित तपासणी, दातांची स्वच्छता, रूट कॅनल, दात सरळ करणे, दात बसवणे तसेच आपत्कालीन उपचारांचा समावेश आहे. तसेच, अनेक क्लिनिकमध्ये आता ईएमआय (EMI) आधारित पेमेंट पर्यायही उपलब्ध होत आहेत. त्यामुळे मोठ्या उपचारांचा आर्थिक भार एकदम न पडता हप्त्यांमध्ये उपचार घेणे शक्य होत आहे. विशेषतः कुटुंबांमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील सदस्यांच्या दंतउपचारांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरत आहे. तज्ज्ञांच्या मते, तोंडाचे आरोग्य हे केवळ दातांपुरते मर्यादित नसून त्याचा परिणाम आहार, बोलणे आणि शरीराच्या एकूण आरोग्यावरही होतो. त्यामुळे नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. डॉक्टर सल्ला साठी सम्पर्क - डॉ. गायकवाड डेंटल क्लिनिक, साईधाम सोसायटी, शॉप नं. २, धानोरी पोलीस चौकीच्या शेजारी, धानोरी, पुणे, महाराष्ट्र – ४११०१५ एकंदरीत संदेश स्पष्ट आहे — दंतउपचार पुढे ढकलू नका. वेळेवर घेतलेली काळजी आरोग्य सुरक्षित ठेवतेच, शिवाय भविष्यातील मानसिक आणि आर्थिक ताणही कमी करते.

In India, oral health is still frequently neglected.

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *