पाकिस्तान सध्या अत्यंत गंभीर संकटांनी घेरलेलाआहे. देशाची आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमडलीआहे. राजकीय अस्थिरता कायम आहे.बलुचिस्तानमध्ये बंडखोरी वाढत आहे. खैबरपख्तूनख्वामध्ये ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान''चे(टीटीपी) हल्ले वाढले आहेत, तर पाकव्याप्तकाश्मीरमध्येही लोकांचा असंतोष समोर येऊ लागलाआहे. मग पाकिस्तान आता फुटण्याच्या किंवा तुकडेहोण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे का? पाकिस्तानपुढील सर्वात मोठे खरे आव्हान त्याच्यासंघराज्य व्यवस्थेचे आहे. हा देश अनेक भाषा, वांशिकगट व प्रादेशिक अस्मितांनी मिळून बनला आहे. एवढ्या विविधतेने नटलेल्या समाजाला एका धाग्यात बांधण्याचे काम तिथल्या लोकशाही संस्थांपेक्षा सैन्यानेच जास्तकेले आहे. परंतु कोणत्याही देशाची एकतेसाठी जनतेचा विश्वास आणि राजकीय संमती आवश्यक असते.आज बलुचिस्तानमधील नागरिक आपल्या राजकीय हक्कांची मागणी करत आहेत. खैबर पख्तूनख्वा भाग दहशतवाद व लष्करी कारवायांमुळे अशांत आहे. सिंध प्रांतात वेळोवेळी प्रादेशिक अस्मितेचा प्रश्न वर डोकेकाढत असतो. दुसरीकडे मुहाजिर समाजही राजकीयप्रतिनिधित्वाबाबत असंतुष्ट आहे. आता पीओकेमध्येहीआर्थिक मुद्द्यांवरून सुरू झालेले जनआंदोलनशासनव्यवस्थेवर आणि इस्लामाबादच्या नियंत्रणावरथेट प्रश्न उपस्थित करू लागले आहे. यापैकी कोणताहीएक मुद्दा पाकिस्तानच्या अखंडतेला लगेचच धोकानिर्माण करू शकत नाही. पण संघराज्यीय रचनेत गंभीरभेगा पडल्याचे ते स्पष्ट संकेत असतात. असे असूनहीपाकिस्तान आजवर कसा काय टिकून आहे? याचेसर्वात मोठे कारण त्याची अंतर्गत ताकद नसून त्याचे‘रणनीतिक महत्त्व'' हे आहे. पाकिस्तानचे भौगोलिकस्थान त्याला दक्षिण आशिया, मध्य आशिया, पश्चिमआशिया व आखाती देशांमधील एक महत्त्वाचा दुवाबनवते. त्याच्याकडे अणुवस्त्रे आहेत. सीमा अत्यंतसंवेदनशील क्षेत्रांशी जोडलेल्या आहेत. याचकारणामुळे जगातील महासत्तांना पाकिस्तानचा पूर्णविनाश किंवा पतन परवडणारे नाही. शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेने पाकिस्तानला आपलामित्र बनवले होते. अफगाण युद्ध आणि त्यानंतरदहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढ्यातहीपाकिस्तानची उपयोगिता कायम राहिली. आर्थिकसंकटात सापडलेला असतानाही आयएमएफसहअनेकआंतरराष्ट्रीय संस्थांनी त्याला वारंवार आर्थिक मदतकेली. पाकिस्तानला आतापर्यंत आयएमएफकडूनअनेक आर्थिक मदत पॅकेजेस मिळाली आहेत. हे निर्णयकेवळ आर्थिक नव्हते, तर त्यामागे भू-राजकीयकारणेही होती. आज चीन हा पाकिस्तानचा सर्वात मोठारणनीतिक भागीदार आहे. ‘चीन-पाकिस्तान आर्थिककॉरिडोअर'' हा केवळ एक आर्थिक प्रकल्प नसूनचीनच्या दीर्घकालीन रणनीतीचा भाग आहे. बाहेरीलगुंतवणूक एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेला तात्पुरताआधार देऊ शकते; त्या देशाची राष्ट्रीय एकता निर्माणकरू शकत नाही, हेही तितकेच सत्य आहे. अमेरिकेच्यागरजा आता बदलल्या आहेत. तरीही पाकिस्तान पूर्णपणेअस्थिर व्हावा असे अमेरिकेला वाटत नाही.अणुवस्त्रांची सुरक्षा, दहशतवाद व स्थिरता यांबाबतअमेरिकेला चिंता आहे. दुसरीकडे सौदी अरेबिया आणियूएईसारख्या आखाती देशांसाठीही पाकिस्तान एकमहत्त्वाचा सुरक्षा भागीदार राहिला आहे. वेगवेगळ्याकारणांमुळे अनेक देशांना पाकिस्तानमध्ये रस आहे. परंतु बाहेरील मदत ही पाकिस्तानच्या अंतर्गतसमस्यांवरचा कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाही.पाकिस्तानचे नेतृत्व नेहमीच आपल्या अंतर्गत अपयशांचेकायदे आणि दोष बाहेरील देशांवर—विशेषतः भारतावरढकलण्याचा प्रयत्न करते. यामुळे तिथल्या देशांतर्गतराजकारणात काही काळासाठी फायदा मिळू शकतो;परंतु प्रशासन, अर्थव्यवस्था आणि जनतेच्या मूळसमस्या सुटू शकत नाहीत. भारताच्या दृष्टीने सर्वातमहत्त्वाचे हे आहे की, त्याने पाकिस्तानच्याकमकुवतपणावर खूप उड्या मारू नयेत आणि त्यालाकमीही लेखू नये. एक अस्थिर पाकिस्तान भारतासाठीहीनवीन आव्हाने उभी करू शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) लष्कर आणि परदेशी मदतीच्या जोरावरचालण्याऐवजी पाकिस्तान नागरिकांच्याविश्वासावर उभा असलेला देश बनूशकेल का? याचे उत्तर मिळत नाहीतोपर्यंत त्याची अंतर्गत कमजोरी वरणनीतिक उपयोगिता—या दोन्ही गोष्टीकायम राहतील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- मुंबई: तुमची समाजाला गरज आहे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रुग्णालयात जाऊन अण्णा हजारेंची भेट, तब्येतीची केली विचारपूस
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
महाराष्ट्र
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- मुंबई: तुमची समाजाला गरज आहे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रुग्णालयात जाऊन अण्णा हजारेंची भेट, तब्येतीची केली विचारपूस
- बीड: चोरीसाठी थेट १९०० किमीचा प्रवास! बीडच्या आष्टी पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई, हरियाणामधील कुख्यात जनावरे चोरांची टोळी जेरबंद!
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
गुन्हा
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा
- गोवा: देशातील ड्रग्ज नेटवर्कचा समूळ नायनाट करणार; गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा, तीन वर्षांचा रोडमॅप जाहीर
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
























Subscribe to my channel



