या आठवडाअखेरीस किंवा पुढच्या आठवड्याच्यासुरुवातीला बांगलादेशात लोकनियुक्त सरकार सत्ता हातीघेऊ शकते. अवामी लीगला निवडणुकीत सहभागीहोण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळेविश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह कायम राहील. तरीहीलोकशाहीच्या निकषावर ही निवडणूक काही अंशी नि:पक्षम्हणता येईल, कारण पाकिस्तानप्रमाणे बांगलादेशचे सैन्यनिवडणुकीच्या मैदानात उतरलेले नाही किंवा त्यांनीकोणत्याही उमेदवाराचे समर्थनही केलेले नाही. यूपीए-२ च्या काळात भारत आणि बांगलादेश यांनीसीमा प्रश्न, विशेषतः सीमेच्या दोन्ही बाजूला असलेल्यावस्त्यांचा मुद्दा सोडवण्यासाठी करार केला होता. तेव्हाभाजपमध्ये कोणीही या कराराला उघडपणे विरोध केलानव्हता. तत्कालीन अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी तर त्याचेसमर्थन केले होते. तरीही पक्षाने संसदेत त्यात अडथळेआणले होते. ते त्यावेळच्या पक्षांतर्गत सत्तासंघर्षाचे फळहोते. तेव्हा बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी अहमदाबादलाजाऊन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होतीआणि त्यांचे समर्थन मागितले होते. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जवळपास एका वर्षाने, ६ जून२०१५ रोजी भारत-बांगलादेश भू-सीमा कराराला मंजुरीदेण्यात आली. याचसोबत दोन्ही देशांनी सागरी सीमाहीनिश्चित करून ती स्वीकारली. यासाठी ममता बॅनर्जीयांच्याशी चर्चा करून त्यांचे मन वळवावे लागले. आसामआणि त्रिपुरातील भावनाही शांत कराव्या लागल्या. अशाप्रकारे बांगलादेश हा एकमेव असा मोठा शेजारी देश बनला,ज्याच्याशी भारताने सर्व सीमा विवाद सोडवले आहेत.बांगलादेशसोबतचा सीमा करार हा मोदी सरकारच्या १२वर्षांच्या कार्यकाळातील सर्वात मोठी धोरणात्मक उपलब्धी मानली जाते. हे विशेषतः महत्त्वाचे आहे कारण हा करारअशा वेळी झाला जेव्हा शेजारील देशांशी संबंध तणावपूर्णहोते. अनेक अर्थांनीही मोदींच्या मोठ्या यशांपैकी एकयश मानले जाऊ शकते. असे असूनही विशेषतः पूर्वेकडील राज्यांमध्ये भाजपचे राजकारण दीर्घकाळापासून अवैध बांगलादेशी स्थलांतरितांच्या मुद्द्यावर केंद्रित राहिले आहे.प. बंगालच्या दोन विधानसभा निवडणुका व लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा खूप तापला होता, आज आपण इतिहासाच्या अशाच एका वळणावर उभे आहोत. फरक इतकाच आहे की, २०१४ च्या तुलनेत आज धोरणात्मक प्रभाव आणि शक्यता खूप मोठ्या आहेत. बांगलादेशातील निवडणुका प. बंगाल आणि आसामच्या निवडणुकांच्या काही महिने आधी होत आहेत. ही एकप्रकारे चांगली संधी आहे. कारण सध्या ‘घुसखोर’ हीघोषणा खूप तीव्र झालेली नाही. मात्र, पंतप्रधानांनी राज्यसभेतील भाषणात त्याचा उल्लेख नक्कीच केला आहे.पण सोशल मीडिया आणि अनेक टीव्ही चॅनेलवर बांगलादेशबद्दल नकारात्मक गोष्टी बोलल्या जात आहेत.बांगलादेशातील निवडणुका पश्चिम बंगाल आणिआसामच्या निवडणुकांनंतर होत नसल्यामुळे, सरकारकडेपरिस्थिती सामान्य करण्याची आणि संतुलनाकडेपरतण्याची संधी आहे. मात्र, शेख हसीना यांच्याकाळासारखे संबंध पुन्हा प्रस्थापित होणे आता कठीणदिसते. ही वेळ ढाकामध्ये भारताच्या पसंतीच्या नेत्यालानाकारण्याची किंवा मुहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारनेपरराष्ट्र धोरणात केलेल्या मोठ्या बदलांबद्दल नाराजी व्यक्तकरण्याची नाही. युनूस गेल्या दीड वर्षापासून पाकिस्तानलाखुश करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी त्यांनीअनेक प्रक्षोभक पावले उचलली आहेत. उदाहरणार्थ,भारताला चिडवण्यासाठी पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनाबोलावण्यात आले. त्यांच्या सरकारने मोठी शस्त्रे खरेदीकरण्याबाबत चर्चा केली आणि भारताच्या ईशान्येकडीलराज्यांबाबतही भडकाऊ विधाने केली गेली. त्यांनी शेखहसीना यांना भारतात आश्रय देणे हे ‘करार मोडणारे’ पाऊलअसल्याचे म्हटले. पण बांगलादेशच्या दृष्टीने हे दूरदृष्टीचाअभाव दर्शवणारे आणि भारताला उकसवणारे आहे. जमेचीबाजू ही की, युनूस यांना एका आठवड्याच्या आत निवडूनआलेल्या सरकारकडे सत्ता सोपवावी लागेल. खालिदाझिया यांच्या अंत्यसंस्काराला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकरयांना पाठवून आम्ही एक व्यावहारिक पाऊल उचलले.त्यांनी त्यांचे चिरंजीव आणि बांगलादेश नॅशनल पार्टीचे(बीएनपी) अध्यक्ष तारिक रहमान यांचीही भेट घेतली.आतापर्यंत रहमान एक समजूतदार नेते म्हणून समोर आले आहेत. वास्तव हे आहे की, निवडणूक कोण जिंकेल किंवा कोणाला स्पष्ट बहुमत मिळेल की नाही, हे कोणालाहीमाहीत नाही. आतापर्यंतच्या जनमत चाचण्यांमध्ये तारिकरहमान आणि बीएनपीला आघाडी मिळताना दिसत आहे. ‘प्रोथोम आलो’ या प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या सर्वेक्षणांनुसार, ८३टक्के बांगलादेशी बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा मानतात,७७ टक्के लोकांचे म्हणणे आहे की व्यवसायासाठीवातावरण चांगले नाही आणि ३५ टक्के लोक देशाच्याआर्थिक स्थितीबाबत निराश आहेत. इस्लामीकरण किंवा कट्टर राष्ट्रवाद म्हणजेचभारत-विरोधाकडे तेथील लोकांचा फारसा कल दिसतनाही. सामान्य जनतेचा कल भारताच्या विरोधात नक्कीचआहे, विशेषतः हसीना यांच्या मुद्द्यावरून, पण सर्वातमहत्त्वाची गोष्ट म्हणजे ५४ टक्के लोकांना आशा आहे कीनवीन सरकार सामाजिक-धार्मिक सहिष्णुता पुन्हा प्रस्थापितकरेल. ‘पीपल्स इलेक्शन सर्व्हे’नुसार ४७ टक्के लोकतारिक रहमान यांना पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितात, तरकेवळ २२.५ टक्के लोक जमात-ए-इस्लामीच्या शफीकुररहमान यांना पसंती देतात. यावरून जमातला मिळणाऱ्यासमर्थनाची पातळी स्पष्ट होते. युनूस यांच्यासह काहीशक्तींना त्रिशंकू संसद हवी असेल जेणेकरून जमातलासामील करून सरकार स्थापन करता येईल. या निवडणुकाआपल्याला बांगलादेशसोबतचे संबंध नव्याने सुरूकरण्याची संधी देत आहेत. बंगाल आणि आसामच्यानिवडणुका पाहता हे एक आव्हानही आहे. अशापरिस्थितीत आपण भारताच्या पूर्वेला धोरणात्मक स्थिरतापरत आणण्याचे प्रयत्न करणार का? याचा अर्थ असा होईलकी या राज्यांमधील निवडणूक प्रचारादरम्यानबांगलादेशविरोधी भाषा मवाळ ठेवली जावी. अथवा मगआपण आपल्या पूर्वेला एक ‘बंगाली भाषिक पाकिस्तान’तयार होऊ देण्यास तयार आहोत का? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) निवडणुकीत कट्टरपंथी आवाजांनाकमी महत्त्व मिळते...निवडणूक प्रचारात बीएनपी किंवा जमातयांपैकी कोणीही पाकिस्तानबद्दल भाष्यकेलेले नाही. जमात भारतासोबत मैत्रीपूर्णसंबंधांबद्दल बोलत आहे, तर बीएनपी सर्वांशीपरस्पर आदरावर आधारित संबंधांची अपेक्षाकरत आहे. हे सकारात्मक संकेत आहेत.कट्टरतावाद्यांची स्वीकारार्हता कमी होत आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
- दौंडमध्ये हॉटेल ओएसिसमध्ये राडा! सहजापूर फाट्यावर तुफान हाणामारी; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्र
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- सांगलीत काळाचा घाला! जत तालुक्यात भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू; मुसळधार पावसाने घातला धुमाकूळ
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
गुन्हा
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel




