या आठवडाअखेरीस किंवा पुढच्या आठवड्याच्यासुरुवातीला बांगलादेशात लोकनियुक्त सरकार सत्ता हातीघेऊ शकते. अवामी लीगला निवडणुकीत सहभागीहोण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळेविश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह कायम राहील. तरीहीलोकशाहीच्या निकषावर ही निवडणूक काही अंशी नि:पक्षम्हणता येईल, कारण पाकिस्तानप्रमाणे बांगलादेशचे सैन्यनिवडणुकीच्या मैदानात उतरलेले नाही किंवा त्यांनीकोणत्याही उमेदवाराचे समर्थनही केलेले नाही. यूपीए-२ च्या काळात भारत आणि बांगलादेश यांनीसीमा प्रश्न, विशेषतः सीमेच्या दोन्ही बाजूला असलेल्यावस्त्यांचा मुद्दा सोडवण्यासाठी करार केला होता. तेव्हाभाजपमध्ये कोणीही या कराराला उघडपणे विरोध केलानव्हता. तत्कालीन अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी तर त्याचेसमर्थन केले होते. तरीही पक्षाने संसदेत त्यात अडथळेआणले होते. ते त्यावेळच्या पक्षांतर्गत सत्तासंघर्षाचे फळहोते. तेव्हा बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी अहमदाबादलाजाऊन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होतीआणि त्यांचे समर्थन मागितले होते. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जवळपास एका वर्षाने, ६ जून२०१५ रोजी भारत-बांगलादेश भू-सीमा कराराला मंजुरीदेण्यात आली. याचसोबत दोन्ही देशांनी सागरी सीमाहीनिश्चित करून ती स्वीकारली. यासाठी ममता बॅनर्जीयांच्याशी चर्चा करून त्यांचे मन वळवावे लागले. आसामआणि त्रिपुरातील भावनाही शांत कराव्या लागल्या. अशाप्रकारे बांगलादेश हा एकमेव असा मोठा शेजारी देश बनला,ज्याच्याशी भारताने सर्व सीमा विवाद सोडवले आहेत.बांगलादेशसोबतचा सीमा करार हा मोदी सरकारच्या १२वर्षांच्या कार्यकाळातील सर्वात मोठी धोरणात्मक उपलब्धी मानली जाते. हे विशेषतः महत्त्वाचे आहे कारण हा करारअशा वेळी झाला जेव्हा शेजारील देशांशी संबंध तणावपूर्णहोते. अनेक अर्थांनीही मोदींच्या मोठ्या यशांपैकी एकयश मानले जाऊ शकते. असे असूनही विशेषतः पूर्वेकडील राज्यांमध्ये भाजपचे राजकारण दीर्घकाळापासून अवैध बांगलादेशी स्थलांतरितांच्या मुद्द्यावर केंद्रित राहिले आहे.प. बंगालच्या दोन विधानसभा निवडणुका व लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा खूप तापला होता, आज आपण इतिहासाच्या अशाच एका वळणावर उभे आहोत. फरक इतकाच आहे की, २०१४ च्या तुलनेत आज धोरणात्मक प्रभाव आणि शक्यता खूप मोठ्या आहेत. बांगलादेशातील निवडणुका प. बंगाल आणि आसामच्या निवडणुकांच्या काही महिने आधी होत आहेत. ही एकप्रकारे चांगली संधी आहे. कारण सध्या ‘घुसखोर’ हीघोषणा खूप तीव्र झालेली नाही. मात्र, पंतप्रधानांनी राज्यसभेतील भाषणात त्याचा उल्लेख नक्कीच केला आहे.पण सोशल मीडिया आणि अनेक टीव्ही चॅनेलवर बांगलादेशबद्दल नकारात्मक गोष्टी बोलल्या जात आहेत.बांगलादेशातील निवडणुका पश्चिम बंगाल आणिआसामच्या निवडणुकांनंतर होत नसल्यामुळे, सरकारकडेपरिस्थिती सामान्य करण्याची आणि संतुलनाकडेपरतण्याची संधी आहे. मात्र, शेख हसीना यांच्याकाळासारखे संबंध पुन्हा प्रस्थापित होणे आता कठीणदिसते. ही वेळ ढाकामध्ये भारताच्या पसंतीच्या नेत्यालानाकारण्याची किंवा मुहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारनेपरराष्ट्र धोरणात केलेल्या मोठ्या बदलांबद्दल नाराजी व्यक्तकरण्याची नाही. युनूस गेल्या दीड वर्षापासून पाकिस्तानलाखुश करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी त्यांनीअनेक प्रक्षोभक पावले उचलली आहेत. उदाहरणार्थ,भारताला चिडवण्यासाठी पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनाबोलावण्यात आले. त्यांच्या सरकारने मोठी शस्त्रे खरेदीकरण्याबाबत चर्चा केली आणि भारताच्या ईशान्येकडीलराज्यांबाबतही भडकाऊ विधाने केली गेली. त्यांनी शेखहसीना यांना भारतात आश्रय देणे हे ‘करार मोडणारे’ पाऊलअसल्याचे म्हटले. पण बांगलादेशच्या दृष्टीने हे दूरदृष्टीचाअभाव दर्शवणारे आणि भारताला उकसवणारे आहे. जमेचीबाजू ही की, युनूस यांना एका आठवड्याच्या आत निवडूनआलेल्या सरकारकडे सत्ता सोपवावी लागेल. खालिदाझिया यांच्या अंत्यसंस्काराला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकरयांना पाठवून आम्ही एक व्यावहारिक पाऊल उचलले.त्यांनी त्यांचे चिरंजीव आणि बांगलादेश नॅशनल पार्टीचे(बीएनपी) अध्यक्ष तारिक रहमान यांचीही भेट घेतली.आतापर्यंत रहमान एक समजूतदार नेते म्हणून समोर आले आहेत. वास्तव हे आहे की, निवडणूक कोण जिंकेल किंवा कोणाला स्पष्ट बहुमत मिळेल की नाही, हे कोणालाहीमाहीत नाही. आतापर्यंतच्या जनमत चाचण्यांमध्ये तारिकरहमान आणि बीएनपीला आघाडी मिळताना दिसत आहे. ‘प्रोथोम आलो’ या प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या सर्वेक्षणांनुसार, ८३टक्के बांगलादेशी बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा मानतात,७७ टक्के लोकांचे म्हणणे आहे की व्यवसायासाठीवातावरण चांगले नाही आणि ३५ टक्के लोक देशाच्याआर्थिक स्थितीबाबत निराश आहेत. इस्लामीकरण किंवा कट्टर राष्ट्रवाद म्हणजेचभारत-विरोधाकडे तेथील लोकांचा फारसा कल दिसतनाही. सामान्य जनतेचा कल भारताच्या विरोधात नक्कीचआहे, विशेषतः हसीना यांच्या मुद्द्यावरून, पण सर्वातमहत्त्वाची गोष्ट म्हणजे ५४ टक्के लोकांना आशा आहे कीनवीन सरकार सामाजिक-धार्मिक सहिष्णुता पुन्हा प्रस्थापितकरेल. ‘पीपल्स इलेक्शन सर्व्हे’नुसार ४७ टक्के लोकतारिक रहमान यांना पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितात, तरकेवळ २२.५ टक्के लोक जमात-ए-इस्लामीच्या शफीकुररहमान यांना पसंती देतात. यावरून जमातला मिळणाऱ्यासमर्थनाची पातळी स्पष्ट होते. युनूस यांच्यासह काहीशक्तींना त्रिशंकू संसद हवी असेल जेणेकरून जमातलासामील करून सरकार स्थापन करता येईल. या निवडणुकाआपल्याला बांगलादेशसोबतचे संबंध नव्याने सुरूकरण्याची संधी देत आहेत. बंगाल आणि आसामच्यानिवडणुका पाहता हे एक आव्हानही आहे. अशापरिस्थितीत आपण भारताच्या पूर्वेला धोरणात्मक स्थिरतापरत आणण्याचे प्रयत्न करणार का? याचा अर्थ असा होईलकी या राज्यांमधील निवडणूक प्रचारादरम्यानबांगलादेशविरोधी भाषा मवाळ ठेवली जावी. अथवा मगआपण आपल्या पूर्वेला एक ‘बंगाली भाषिक पाकिस्तान’तयार होऊ देण्यास तयार आहोत का? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) निवडणुकीत कट्टरपंथी आवाजांनाकमी महत्त्व मिळते...निवडणूक प्रचारात बीएनपी किंवा जमातयांपैकी कोणीही पाकिस्तानबद्दल भाष्यकेलेले नाही. जमात भारतासोबत मैत्रीपूर्णसंबंधांबद्दल बोलत आहे, तर बीएनपी सर्वांशीपरस्पर आदरावर आधारित संबंधांची अपेक्षाकरत आहे. हे सकारात्मक संकेत आहेत.कट्टरतावाद्यांची स्वीकारार्हता कमी होत आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! सोलापूरजवळील टिकेकरवाडी यार्डाचा कायापालट; गाड्या धावणार आता अधिक वेगाने आणि सुरक्षित!
गुन्हा
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

सासवड पोलिसांची मोठी कारवाई! #punenews #BreakingNews #SaswadPolice #PoliceAction #CrimeNews #Mokka
⚠️ धक्कादायक दुर्घटना! बंजी जंपिंगसारख्या थरारक खेळात निष्काळजीपणाची मोठी किंमत मोजावी लागली. #news
पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
देश विदेश
- अमेरिका-इराण शांतता करार: इराणकडून तुर्की, इराक आणि इजिप्तशी चर्चा; पंतप्रधान मोदींनी केले स्वागत
- ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय! १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी; ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल
- इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!























Subscribe to my channel



