या आठवडाअखेरीस किंवा पुढच्या आठवड्याच्यासुरुवातीला बांगलादेशात लोकनियुक्त सरकार सत्ता हातीघेऊ शकते. अवामी लीगला निवडणुकीत सहभागीहोण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळेविश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह कायम राहील. तरीहीलोकशाहीच्या निकषावर ही निवडणूक काही अंशी नि:पक्षम्हणता येईल, कारण पाकिस्तानप्रमाणे बांगलादेशचे सैन्यनिवडणुकीच्या मैदानात उतरलेले नाही किंवा त्यांनीकोणत्याही उमेदवाराचे समर्थनही केलेले नाही. यूपीए-२ च्या काळात भारत आणि बांगलादेश यांनीसीमा प्रश्न, विशेषतः सीमेच्या दोन्ही बाजूला असलेल्यावस्त्यांचा मुद्दा सोडवण्यासाठी करार केला होता. तेव्हाभाजपमध्ये कोणीही या कराराला उघडपणे विरोध केलानव्हता. तत्कालीन अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी तर त्याचेसमर्थन केले होते. तरीही पक्षाने संसदेत त्यात अडथळेआणले होते. ते त्यावेळच्या पक्षांतर्गत सत्तासंघर्षाचे फळहोते. तेव्हा बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी अहमदाबादलाजाऊन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होतीआणि त्यांचे समर्थन मागितले होते. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जवळपास एका वर्षाने, ६ जून२०१५ रोजी भारत-बांगलादेश भू-सीमा कराराला मंजुरीदेण्यात आली. याचसोबत दोन्ही देशांनी सागरी सीमाहीनिश्चित करून ती स्वीकारली. यासाठी ममता बॅनर्जीयांच्याशी चर्चा करून त्यांचे मन वळवावे लागले. आसामआणि त्रिपुरातील भावनाही शांत कराव्या लागल्या. अशाप्रकारे बांगलादेश हा एकमेव असा मोठा शेजारी देश बनला,ज्याच्याशी भारताने सर्व सीमा विवाद सोडवले आहेत.बांगलादेशसोबतचा सीमा करार हा मोदी सरकारच्या १२वर्षांच्या कार्यकाळातील सर्वात मोठी धोरणात्मक उपलब्धी मानली जाते. हे विशेषतः महत्त्वाचे आहे कारण हा करारअशा वेळी झाला जेव्हा शेजारील देशांशी संबंध तणावपूर्णहोते. अनेक अर्थांनीही मोदींच्या मोठ्या यशांपैकी एकयश मानले जाऊ शकते. असे असूनही विशेषतः पूर्वेकडील राज्यांमध्ये भाजपचे राजकारण दीर्घकाळापासून अवैध बांगलादेशी स्थलांतरितांच्या मुद्द्यावर केंद्रित राहिले आहे.प. बंगालच्या दोन विधानसभा निवडणुका व लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा खूप तापला होता, आज आपण इतिहासाच्या अशाच एका वळणावर उभे आहोत. फरक इतकाच आहे की, २०१४ च्या तुलनेत आज धोरणात्मक प्रभाव आणि शक्यता खूप मोठ्या आहेत. बांगलादेशातील निवडणुका प. बंगाल आणि आसामच्या निवडणुकांच्या काही महिने आधी होत आहेत. ही एकप्रकारे चांगली संधी आहे. कारण सध्या ‘घुसखोर’ हीघोषणा खूप तीव्र झालेली नाही. मात्र, पंतप्रधानांनी राज्यसभेतील भाषणात त्याचा उल्लेख नक्कीच केला आहे.पण सोशल मीडिया आणि अनेक टीव्ही चॅनेलवर बांगलादेशबद्दल नकारात्मक गोष्टी बोलल्या जात आहेत.बांगलादेशातील निवडणुका पश्चिम बंगाल आणिआसामच्या निवडणुकांनंतर होत नसल्यामुळे, सरकारकडेपरिस्थिती सामान्य करण्याची आणि संतुलनाकडेपरतण्याची संधी आहे. मात्र, शेख हसीना यांच्याकाळासारखे संबंध पुन्हा प्रस्थापित होणे आता कठीणदिसते. ही वेळ ढाकामध्ये भारताच्या पसंतीच्या नेत्यालानाकारण्याची किंवा मुहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारनेपरराष्ट्र धोरणात केलेल्या मोठ्या बदलांबद्दल नाराजी व्यक्तकरण्याची नाही. युनूस गेल्या दीड वर्षापासून पाकिस्तानलाखुश करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी त्यांनीअनेक प्रक्षोभक पावले उचलली आहेत. उदाहरणार्थ,भारताला चिडवण्यासाठी पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनाबोलावण्यात आले. त्यांच्या सरकारने मोठी शस्त्रे खरेदीकरण्याबाबत चर्चा केली आणि भारताच्या ईशान्येकडीलराज्यांबाबतही भडकाऊ विधाने केली गेली. त्यांनी शेखहसीना यांना भारतात आश्रय देणे हे ‘करार मोडणारे’ पाऊलअसल्याचे म्हटले. पण बांगलादेशच्या दृष्टीने हे दूरदृष्टीचाअभाव दर्शवणारे आणि भारताला उकसवणारे आहे. जमेचीबाजू ही की, युनूस यांना एका आठवड्याच्या आत निवडूनआलेल्या सरकारकडे सत्ता सोपवावी लागेल. खालिदाझिया यांच्या अंत्यसंस्काराला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकरयांना पाठवून आम्ही एक व्यावहारिक पाऊल उचलले.त्यांनी त्यांचे चिरंजीव आणि बांगलादेश नॅशनल पार्टीचे(बीएनपी) अध्यक्ष तारिक रहमान यांचीही भेट घेतली.आतापर्यंत रहमान एक समजूतदार नेते म्हणून समोर आले आहेत. वास्तव हे आहे की, निवडणूक कोण जिंकेल किंवा कोणाला स्पष्ट बहुमत मिळेल की नाही, हे कोणालाहीमाहीत नाही. आतापर्यंतच्या जनमत चाचण्यांमध्ये तारिकरहमान आणि बीएनपीला आघाडी मिळताना दिसत आहे. ‘प्रोथोम आलो’ या प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या सर्वेक्षणांनुसार, ८३टक्के बांगलादेशी बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा मानतात,७७ टक्के लोकांचे म्हणणे आहे की व्यवसायासाठीवातावरण चांगले नाही आणि ३५ टक्के लोक देशाच्याआर्थिक स्थितीबाबत निराश आहेत. इस्लामीकरण किंवा कट्टर राष्ट्रवाद म्हणजेचभारत-विरोधाकडे तेथील लोकांचा फारसा कल दिसतनाही. सामान्य जनतेचा कल भारताच्या विरोधात नक्कीचआहे, विशेषतः हसीना यांच्या मुद्द्यावरून, पण सर्वातमहत्त्वाची गोष्ट म्हणजे ५४ टक्के लोकांना आशा आहे कीनवीन सरकार सामाजिक-धार्मिक सहिष्णुता पुन्हा प्रस्थापितकरेल. ‘पीपल्स इलेक्शन सर्व्हे’नुसार ४७ टक्के लोकतारिक रहमान यांना पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितात, तरकेवळ २२.५ टक्के लोक जमात-ए-इस्लामीच्या शफीकुररहमान यांना पसंती देतात. यावरून जमातला मिळणाऱ्यासमर्थनाची पातळी स्पष्ट होते. युनूस यांच्यासह काहीशक्तींना त्रिशंकू संसद हवी असेल जेणेकरून जमातलासामील करून सरकार स्थापन करता येईल. या निवडणुकाआपल्याला बांगलादेशसोबतचे संबंध नव्याने सुरूकरण्याची संधी देत आहेत. बंगाल आणि आसामच्यानिवडणुका पाहता हे एक आव्हानही आहे. अशापरिस्थितीत आपण भारताच्या पूर्वेला धोरणात्मक स्थिरतापरत आणण्याचे प्रयत्न करणार का? याचा अर्थ असा होईलकी या राज्यांमधील निवडणूक प्रचारादरम्यानबांगलादेशविरोधी भाषा मवाळ ठेवली जावी. अथवा मगआपण आपल्या पूर्वेला एक ‘बंगाली भाषिक पाकिस्तान’तयार होऊ देण्यास तयार आहोत का? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) निवडणुकीत कट्टरपंथी आवाजांनाकमी महत्त्व मिळते...निवडणूक प्रचारात बीएनपी किंवा जमातयांपैकी कोणीही पाकिस्तानबद्दल भाष्यकेलेले नाही. जमात भारतासोबत मैत्रीपूर्णसंबंधांबद्दल बोलत आहे, तर बीएनपी सर्वांशीपरस्पर आदरावर आधारित संबंधांची अपेक्षाकरत आहे. हे सकारात्मक संकेत आहेत.कट्टरतावाद्यांची स्वीकारार्हता कमी होत आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे जिल्ह्यात निसर्गाचा कोप! चांदोली बुद्रुकमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाड पडून शेतकऱ्याचा मृत्यू!
- सांगली एसटी डेपोतील लज्जास्पद प्रकार; महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या क्लर्कचे निलंबन, गुन्हा दाखल!
- एसबीआय आरडी की पोस्ट ऑफिस आरडी? गुंतवणुकीसाठी काय जास्त फायदेशीर आहे? जाणून घ्या सविस्तर तुलना.
- दिल्लीत भीषण आगीचा थरार: मालवीय नगरमधील हॉटेलला लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांच्या इमारतीवरून उड्या!
महाराष्ट्र
- पुणे जिल्ह्यात निसर्गाचा कोप! चांदोली बुद्रुकमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाड पडून शेतकऱ्याचा मृत्यू!
- सांगली एसटी डेपोतील लज्जास्पद प्रकार; महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या क्लर्कचे निलंबन, गुन्हा दाखल!
- एसबीआय आरडी की पोस्ट ऑफिस आरडी? गुंतवणुकीसाठी काय जास्त फायदेशीर आहे? जाणून घ्या सविस्तर तुलना.
- दिल्लीत भीषण आगीचा थरार: मालवीय नगरमधील हॉटेलला लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांच्या इमारतीवरून उड्या!
गुन्हा
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
राजकीय
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
इतर
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.
- उत्तराखंडमध्ये पर्यटनाचा थरार! नोएडाचा इंजिनिअर आणि रामनगरची तरुणी ट्रॅकिंगदरम्यान बेपत्ता; शोधमोहीम सुरू.
























Subscribe to my channel



