आपल्या बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा त्यांच्या पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी यशच्या ‘टॉक्सिक’ आणि रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’ या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस टक्करविषयी आपलं मत मांडलं आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील तणावाशी त्याचा संबंध जोडून अजब पोस्ट लिहिली आहे. गेल्या बऱ्याच काळापासून ते ‘टॉक्सिक’ आणि ‘धुरंधर 2’ या चित्रपटांच्या होणाऱ्या टक्करबाबत सतत काही ना काही पोस्ट लिहित आहेत. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ आणि ‘केजीएफ’ फेम यशचा ‘टॉक्सिक’ हे दोन्ही चित्रपट येत्या 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत.
राम गोपाल वर्मा यांनी ‘टॉक्सिक’ आणि ‘धुरंधर 2’ या दोन्ही चित्रपटांच्या टक्करला थेट युद्धाशी जोडलं आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांदरम्यान त्यांनी असं ट्विट केलं की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांच्या मते या दोन्ही परिस्थितींमध्ये परिणाम विनाशकारी असू शकतात, परंतु या विनाशाचं स्वरुप वेगळं असेल. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं, ‘मी टॉक्सिक आणि धुरंधर 2 यांच्यातील संघर्षाची जितकी आतुरतेने वाट पाहत होतो, तितकीच अमेरिका-इराण संघर्षाचीही वाट पाहत होतो. एकात (युद्धात) लोकांचा जीव जाईल, तर दुसऱ्यात पैशांचं नुकसान होईल.’
राम गोपाल वर्मा यांची पोस्ट-
I was soooo waiting for #USAIRAN conflict as much as #Dhuroxic conflict 🔥 ..In one people will die , and in the other Monies will die
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) February 28, 2026
हे दोन्ही बिग बजेट चित्रपट असून दोन्हींवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे अर्थातच जेव्हा बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांची टक्कर होईल, तेव्हा कोणत्या तरी एका चित्रपटाचं मोठं नुकसान होणार आहे, किंवा दोन्हींचा नफा मर्यादित होईल. ‘धुरंधर 2’ हा रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाचा दुसरा भाग आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने 1000 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला होता. दुसरीकडे यशच्या ‘टॉक्सिक’ या चित्रपटात कियारा अडवाणी, तारा सुतारिया, अक्षय ओबेरॉय, रुक्मिणी वसंत, नयनतारा यांच्या भूमिका आहेत. 2026 या वर्षातील ही बॉक्स ऑफिसवरील मोठी टक्कर मानली जात आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



