लग्नाचे स्वप्न दाखवून भोळ्याभाबड्या तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा यवतमाळच्या घाटंजी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. लुटेरी दुल्हन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्य आरोपी सिमरन पाटीलसह तिच्या आई, भाऊ आणि दोन साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने नाशिकच्या एका तरुण शेतकऱ्याची २ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
नेमकं काय घडलं?
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बानगाव येथील अविनाश चांगदेव कवडे या तरुण शेतकऱ्याला लग्नासाठी मुलीचा शोध होता. ऑनलाईन माध्यमातून मध्यस्थांमार्फत त्यांचा संपर्क घाटंजी तालुक्यातील चोरंबा येथील सिमरन गौतम पाटील हिच्याशी झाला. घरची परिस्थिती बेताची असल्याचे भासवून, लग्नाचा सर्व खर्च मुलाकडच्यांनी करावा, अशी अट या टोळीने सुरुवातीलाच घातली होती.
ठरल्याप्रमाणे १० फेब्रुवारी २०२६ रोजी अविनाश कवडे चोरंबा येथे पोहोचले. तिथे गेल्यावर लग्नाचे बोलणे निश्चित होण्यापूर्वीच आरोपींनी मोठ्या रकमेची मागणी करत दबाव टाकला. या टोळीने फसवणुकीच्या उद्देशाने कवडे यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपये उकळले. पैसे हातात पडताच सिमरन, तिची आई आशा पाटील आणि भाऊ करण पाटील यांनी पोहे आणायला जातो असा बहाणा केला. यानंतर त्यांनी स्कुटीवरून धूम ठोकली. त्यांच्यापाठोपाठ इतर दोन साथीदारही तिथून सटकले. काही वेळातच सर्वांचे मोबाईल बंद झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे कवडे यांच्या लक्षात आले.
गुन्हा दाखल
कवडे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी घाटंजी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार केशव ठाकरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मुख्य आरोपी सिमरन पाटील, तिची आई आशा पाटील, भाऊ करण पाटील (सर्व रा. चोरंबा) आणि त्यांचे सहकारी सुनील राठोड व माणिक पवार (रा. नंदपूर मोहा, ता. पुसद) यांना अटक केली आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास सुरु
विशेष म्हणजे, मुख्य आरोपी सिमरन पाटील हिचा गुन्हेगारी इतिहास धक्कादायक आहे. काही महिन्यांपूर्वी एका शेतकऱ्याला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करून त्याची दुचाकी हिसकावून नेली होती. या प्रकरणात ती आणि तिचा भाऊ आरोपी होते. या अपमानामुळे संबंधित शेतकऱ्याने १४ जून २०२५ रोजी आत्महत्या केली होती. त्या गुन्ह्यात सिमरन नुकतीच कारागृहातून जामिनावर बाहेर आली होती. बाहेर येताच तिने पुन्हा फसवणुकीचा नवा डाव मांडला. या टोळीने महाराष्ट्रसह इतर राज्यांतही अशाच प्रकारे कोणाची फसवणूक केली आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



