नुकतीच एक घटना घडली. अभिनेत्री तृषा हीतमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या स्वातंत्र्यदिनसोहळ्यात दिसली. त्यानंतर मोठे वादळ उठले. तृषा तिथेएका प्रमुख जागी बसली होती. विजय यांच्या कुटुंबाशीसंवाद साधत होती. मग काय, राजकीय टोलेबाजी,सोशल मीडियावर तर्कवितर्क व साहजिकच त्यांच्यानात्याबद्दलच्या चर्चांचा पूर येणे अटळ होते. पण या सगळ्यात सर्वात आधी एकच प्रश्न विचारलापाहिजे : दरवेळी अशा कुठल्याही कथेत स्त्रीच आरोपीका ठरते? ‘दुसरी स्त्री’ ही आपल्या समाजातील सर्वातजुनी आणि कायम राहिलेली एक खलनायिका आहे. तीपुरुषाला भुलवते, घर मोडते, प्रचंड महत्त्वाकांक्षी आहेआणि अधिकार नाही तिथे ती घुसखोरी करते; याचनजरेने तिच्याकडे पाहिले जाते. तिने काय परिधान केलेआहे, ती कुठे बसली आहे, तिने कोणाला नमस्कार केलाआणि ती किती आपुलकीने हसली—या प्रत्येक गोष्टीचेबारकाईने परीक्षण केले जाते. तर दुसरीकडे या कथेच्याकेंद्रस्थानी असलेला पुरुष मात्र अगदी ‘निष्क्रिय''दाखवला जातो; जणू काही त्याच्या सभोवतालच्या गोष्टीआपोआपच घडत आहेत! हा कोणाच्या वैयक्तिकआयुष्याचा बचाव नाही. विजय आणि तृषा यांच्या खाजगीआयुष्यातील सत्य शोधणे हे आपले काम नाही. पणसार्वजनिक चर्चा किती सहजतेने सर्व नैतिक जबाबदारीस्त्रीवर ढकलतात आणि पुरुषाच्या भूमिकेकडे पूर्णपणेदुर्लक्ष करतात, यावर हे भाष्य नक्कीच आहे. एखाद्याशक्तिशाली पदावर असलेला पुरुष एखाद्या स्त्रीलाआमंत्रित करतो, तिला सोहळ्यात सहभागी करून घेतो.तिच्याशी मैत्री करतो किंवा संवाद ठेवतो, तर तो त्याचास्वतःचा निर्णय असतो. त्यांच्यात कोणतेही नाते असेल,तर या कथानकात पुरुष काही असहाय पात्राच्या भूमिकेतनाही. तो एक सज्ञान व्यक्ती आहे. पण पुरुषसत्ताकव्यवस्था स्त्रियांनाच एकमेकांविरुद्ध उभे करणे सोपे मानतआली आहे. कदाचित म्हणूनच आजची महत्त्वाकांक्षीस्त्री आपल्याला अस्वस्थ करते. आकर्षक स्त्री आपल्यामनात संशय निर्माण करते. आपल्याला आजही स्त्रिया यामर्यादेत राहणाऱ्या, लाजाळू, नैतिकतेची खात्री देणाऱ्यास्वरूपातच आवडतात. पण त्या सुंदर, यशस्वी, सत्तेच्याजवळ असतील तर आपण त्यांना दोषी ठरवण्यासाठीपुरावे शोधू लागतो. आपण पुरुषांच्या निर्णयांवर प्रखरतेनेप्रश्न का विचारत नाही? प्रभावशाली पुरुषांना त्यांच्यावैयक्तिक किंवा व्यावसायिक नात्यांमध्ये निष्पाप किंवा ‘पॅसिव्ह ’ दाखवणे हा केवळ लैंगिक भेदभाव नाही, तरअत्यंत हास्यास्पद प्रकार आहे. अनेक शतकांपासून स्त्रियापुरुषांच्या निर्णयांचे परिणाम भोगत आल्या आहेत.पत्नीकडून संसार टिकवण्याची अपेक्षा केली जाते,आईकडून कुटुंब एकत्र ठेवण्याची, मुलीकडून घराची‘प्रतिष्ठा’ जपण्याची आणि ‘दुसऱ्या स्त्रीकडून’ सर्वदोषांचे खापर स्वतःच्या डोक्यावर घेण्याची अपेक्षा केलीजाते. बहुधा आता ही पारंपरिक पटकथा बदलण्याची वेळआली आहे. या प्रकरणात स्त्रीवादी दृष्टिकोनाचा प्रश्नअत्यंत सरळ आणि सोपा आहे : पुरुषांच्या निर्णयांचीनैतिक जबाबदार स्त्रीला मानणे आपण कधी थांबवणार?आपण हे थांबवणार नाही, तोपर्यंत प्रत्येक तथाकथित‘दुसऱ्या स्त्रीला’ जनमताच्या न्यायालयात आरोपीच्यापिंजऱ्यात उभे केले जाईल—आणि पुरुष मात्र अत्यंतआरामात दोषांच्या चौकटीबाहेर निसटून जाईल! (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



