मुंबई महानगरपालिकेतून वितरित करण्यात आलेल्या २३७ बोगस जन्मप्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिकेने ही प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. पण तरीही अजूनही ती प्रमाणपत्रे अनधिकृत बांगलादेशी घुसखोरांच्या ताब्यात कशी? असा संतप्त सवाल रितू तावडे यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई न झाल्यास थेट सभागृहात प्रस्ताव आणण्याचा इशारा महापौरांनी दिला आहे.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना मुंबईतील फेरीवाल्यांवर कशाप्रकारे कारवाई केली जाणार आहे अशा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. मुंबईतील फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक फेरीवाल्याची आता कठोरपणे तपासणी केली जाणार आहे, असे रितू तावडे यांनी म्हटले.
त्यांच्याविरुद्ध सभागृहात प्रस्ताव आणावा लागेल
आतापर्यंत २३७ बोगस जन्मप्रमाणपत्र मुंबई महापालिकेने दिले आहे. हे जन्मप्रमाणपत्र त्यांनी रद्द केले आहेत. पण जे ओरिजनल जन्मप्रमाणपत्र अनधिकृत बांग्लादेशींकडे आहेत, ते अजून त्यांच्याकडून घेण्यात आलेले नाही. जर मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही, तर त्यांच्याविरुद्ध सभागृहात प्रस्ताव आणावा लागेल. बांग्लादेशींना सांभाळण्याचे काम जर मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून होत असेल, तर आम्हाला कडक कारवाई करावी लागेल, असा कडक इशारा रितू तावडे यांनी दिला.
मुंबईतील फेरीवाल्यांवर कशाप्रकारे कारवाई होणार?
तसेच मुंबईत जे कोणी फेरीवाले, फुटपाथवर बसतात, त्या सर्वांचे जन्मप्रमाणपत्र आम्ही चेक करणार आहोत. ती मोहीम आम्ही जोरदार हातात घेणार आहोत. त्यामुळे जे कोणी फेरीवाले आहेत त्यांचे जन्मप्रमाणपत्र कठोर पद्धतीने चेक केले जाणार आहेत. यावर कोणतीही माफी केली जाणार नाही, असे रितू तावडे यांनी सांगितले.
कारण हा देशद्रोहाचा प्रकार आहे. तसेच ज्या कोणत्या बांग्लादेशींना सांभाळण्याचे काम अधिकारी करत असतील त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. हे करत असताना आम्ही प्रत्येक फेरीवाल्याचे जन्मप्रमाणपत्र, आधार कार्ड हे चेक केले जाईल, असेही रितू तावडे म्हणाल्या.
दरम्यान रितू तावडे यांनी मुंबईच्या महापौर म्हणून नुकताच पदभार स्वीकारला. महापौरपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी रितू तावडे यांनी पहिली कारवाई कोणावर करणार याची माहिती दिली होती. मी महापौर म्हणून नाही तर सेवक म्हणून काम करणार आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगते की जरी मी महापौर झाली तरी मुंबईची सेवक म्हणून काम करणार आहे. पदभार स्वीकारल्यानंतर मुंबईतील बेकायदेशीर बांगलादेशी फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्याला माझे प्राधान्य असेल, अशी माहिती रितू तावडे यांना दिली होती. त्यानुसार आता त्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे.
[embedded content]
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




