अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी, समीर सोनीImage Credit source: Instagram
अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या ‘बागवान’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. रवी चोपडा यांचा हा चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा कुटुंबच्या कुटुंब थिएटरकडे वळले होते. या चित्रपटात आईवडील आणि मुलांकडून त्यांना दिली जाणारी वागणूक याविषयीची कथा दाखवण्यात आली आहे. ज्या पालकांनी त्यांच्या मुलांसाठी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं, त्यांना आता मुलं ओझं समजू लागले आहेत, अशा आशयाची ही कथा होती. या चित्रपटाच्या शेवटी अमिताभ बच्चन यांनी मुलांविषयी जे भाषण दिलं, ते ऐकून आजही अनेकांचे डोळे पाणावतात. 2003 मध्ये आणि त्यानंतर काही वर्षांपर्यंत जरी या चित्रपटाला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं असलं तरी आता जवळपास दोन दशकांनंतर त्यावर टीका होऊ लागली आहे. हीच टीका पाहून बिग बींच्या ऑनस्क्रीन मुलाला दिलासा मिळाला आहे.
दोन दशकांनंतर ‘जेन झी’ वर्ग या चित्रपटाकडे समकालीन आणि आलोचनात्मक दृष्टीकोनातून पाहू लागलं आहे. या चित्रपटात अभिनेता समीर सोनीने अमिताभ आणि हेमा मालिनी यांच्या ऑनस्क्रीन मुलाची भूमिका साकारली होती. सोशल मीडियावर एका इन्फ्लुएन्सरने ‘बागबान’मधल्या काही दृश्यांवर टीका करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हाच व्हिडीओ समीरने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ही रील शेअर करताना समीरने व्यंगात्मक आणि बदलत्या काळाचं, बदलत्या विचारांचं कौतुक केलं आहे. ‘अखेर 20 वर्षांनंतर काहीसा दिलासा मिळाला आहे. मला नवीन पिढी खूप आवडतेय’, असं त्याने लिहिलं आहे.
संबंधित रीलमध्ये इन्फ्लुएन्सरने समीर सोनीच्या व्यक्तीरेखेचं समर्थन केलंय. “बागबानमधील हा माणूस खरंतर ‘ग्रीन फ्लॅग’सारखा आहे. पण त्याला खलनायकाच्या रुपात दाखवलं गेलंय. तो त्याच्या पत्नीचं ऐकतो, वेळेवर घरी येतो, वेळेवर कामाला निघून जातो, पत्नीला डिनरसाठी घेऊन जातो, लग्नाचा वाढदिवसही त्याच्या लक्षात असतो. इतकंच नव्हे तर हा मुलगा हुशारसुद्धा आहे. कारण तो त्याच्या वडिलांना प्रश्न विचारतो की तुमची कोणती एफडी, पीपीएफ नाही का? बँकेत काम करणाऱ्या वडिलांनी सेव्हिंग का केली नाही, हे विचारणं काही चुकीचं नाही”, असं यामध्ये म्हटलं गेलं आहे.
चित्रपटाच्या दुसऱ्या एका सीनमध्ये अमिताभ बच्चन रात्रीच्या वेळी टाइपराइटरवर टाइप करत बसतात. ज्या सुनेला दुसऱ्या दिवशी लवकर उठून कामावर जायचं असतं, तिला रात्री झोपताना टाइपराइटरच्या आवाजाचा त्रास होत असेल तर याच चुकीचं काय आहे? ते हे काम दिवसासुद्धा करू शकले असते. प्रत्येक गोष्टीच मुलं किंवा सुनाच चुकीच्या नसतात, असं त्यात म्हटलं गेलं आहे. या रीलवर नेटकरीसुद्धा बऱ्याच प्रतिक्रिया देत आहेत.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



