पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:देवाचे दर्शन घेत राहावे,‎त्याने डोळे सफल होतात‎

डोळ्यांतील अश्रू सुकलेला व्यक्ती भक्ती करू शकत नाही. काही‎दिवसांपूर्वी मला एक नेत्ररोगतज्ज्ञ भेटले आणि ते म्हणाले, अश्रू ही‎डोळ्यांची औषधी असते. पण वय वाढते, तसतसे डोळ्यांत कोरडेपणा‎येतो. जीवनातील काही अनुभव डोळ्यांतील अश्रूही सुकवून टाकतात.‎म्हणून वृद्ध लोकांनी डोळ्यांच्या बाबतीत अत्यंत सावध राहिले पाहिजे.‎ दोन कामे करा. एक तर काकभुशुंडीजींनी गरुडजींना सांगितले - निज प्रभु‎बदन निहारि निहारी, लोचन सुफल करउं उरगारी. गरुडजी, आपल्या‎प्रभूंचे मुख बघून-बघून मी डोळे सफल करतो. म्हणून देवाचे दर्शन घेत‎राहिले पाहिजे. त्याने डोळे सफल होतात. आणि दुसरी गोष्ट, वेळेवर‎नेत्रतज्ज्ञांना दाखवत राहिले पाहिजे म्हणजे डोळे स्वस्थ राहतात. प्रभूंची‎दर्शनेही डोळ्यांनी दोन प्रकारे होतात - एक बाहेर पाहणे, एक आत पाहणे.‎डोळ्यांचे हे वैशिष्ट्य आहे की, साधले गेले तर आपण आपल्या आतही‎डोळ्यांचा वापर बघण्यासाठी करू शकतो. बाहेरची दुनिया तर डोळे‎दाखवतेच.

This post was originally published on this site.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *