नवनीत गुर्जर यांचा कॉलम:सूर्य आग ओकत असतानाच पुढाऱ्यांचे नाटक‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎सध्या देशभरात उष्णतेची लाट आहे...आणि नाटकही.‎ उष्णता अशी की बहुतेक राज्यांत तापमान चाळीस‎अंशांच्या वर आहे. कूलर पूर्णपणे निष्प्रभ झाले आहेत.‎काही ठिकाणी एसीदेखील धापा टाकतोय.‎ सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. सायंकाळी सहानंतरही‎तापमान 39 अंशांच्या आसपास असते. रस्ते जवळपास‎ओस पडलेले आणि हवा तव्यापेक्षाही गरम.‎ सकाळीच असे वाटते की दिवसाची सुरुवात थेट‎दुपारपासून झाली आहे. दुपारचे तर तोंड पाहण्याचीही‎हिंमत राहत नाही. सायंकाळही आता सुखद उरलेली‎नाही. कारण कडक उन्हामुळे तिच्या चेहऱ्यावरून‎आल्हाददायकपणा, पक्ष्यांचा किलबिलाट, मावळत्या‎सूर्याची लाली गायब झाली आहे. सायंकाळी ऊन तडाखा‎देण्यासाठी येते. जास्त चपराक खाल्ल्या तर दुसऱ्या‎दिवशी उष्माघात विळखा घालतो. मग डॉक्टरांच्या दारात‎भटकत राहा! अँटिबायोटिक्सची उष्णता वेगळीच सहन‎करा!‎ नाटकाचा भाग पाहायचा तर त्यासाठी नेते आणि‎मंत्र्यांमध्ये स्पर्धा लागलेली दिसते.‎ पंतप्रधानांनी काटकसरीचे आवाहन केल्यापासून सर्व नेते‎मोठ्या उत्साहाने दिखावा करण्यात व्यग्र झाले आहेत.‎कुणी सायकलवरून जातोय, कुणी मोटरसायकलवरून.‎पण मागे गाड्यांच्या ताफ्यात मात्र काही घट झालेली‎नाही. फोटो किंवा सेल्फी घेताना त्या गाड्यांचे ताफे‎लपवले जातात.‎ इंधनाचे दर चार वेळा वाढले, तरी या नेत्यांनी आणि‎मंत्र्यांनी आपल्या मोठ्या ताफ्याचा मोह अद्याप सोडलेला ‎‎नाही. सामान्य माणसाचेही तसेच झाले आहे. त्याने‎आपली दिनचर्याच अशी बनवली आहे की कार किंवा ‎‎दुचाकीशिवाय कामच चालत नाही. घराजवळ चार‎दुकाने सोडून भाजी किंवा किराणा आणायलाही कार‎लागते. कारशिवाय सर्व काही निरुपयोगी वाटू लागले‎आहे. शेतकरीदेखील आता शेतात मोटरसाकलवरून‎जात आहे. तो मागे का राहील? सायकलसाठी तर आता‎कुठे जागाच उरलेली नाही. अशा वेळी मंत्री‎सायकलवरून जाण्याचा दिखावा का करत आहेत, हे‎समजत नाही.‎ किमान व्यावहारिकता तरी ठेवा. प्रॅक्टिकल बना. तुम्ही‎मंत्री आहात. एका गाडीतून जा.‎ मोठ्या अभिमानाने सांगितले जाते की आम्ही ईव्ही‎घेतली आहे. तुमच्याकडे गाडी बदलण्याइतका पैसा आहे.‎पण दाखवायचे आहे त्या सामान्य माणसाकडे लगेच कार‎बदलून ईव्ही घेण्याइतका पैसा आहे का?‎ 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात 80 कोटी‎लोकांना मोफत धान्य वाटले जात आहे, तिथे किती लोक‎ईव्ही खरेदी करू शकतात?‎ इंधन संकटाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎आणि पुढे आणखी वाढणार आहे. काही दिवसांपूर्वी‎गुजरातमधून बातमी आली होती की तेथील सर्व पेट्रोल‎पंपांवर टंचाई निर्माण झाली आहे. आता मध्यप्रदेश आणि‎छत्तीसगडमधील काही भागांतही पेट्रोल- डिझेलसाठी‎संघर्ष सुरू आहे. कुणाला हवे तितक्या प्रमाणात ते मिळत‎नाही, तर कुणाला मिळतच नाही. पण वाहनांच्या शर्यतीत‎काहीही घट झालेली नाही. गर्दी तशीच आहे. वाहतूक‎कोंडी तशीच आहे. या दिशेने कुणालाच लक्ष द्यायचे‎नाही. खरे तर संसाधनांचा पूर इतका वाढला आहे की‎त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कुणालाच दिसत नाही. किंवा‎असे म्हणता येईल की माणूस स्वतःही या संसाधनांच्या‎वापरातून/गैरवापरातून बाहेर पडू इच्छित नाही. भौतिक‎साधने आणि संसाधनांची सवयच तशी असते!‎ मग करायचे तरी काय?‎ प्रश्न किंमतीचा नाही, तर उपलब्धतेचा आहे! पुरवठ्याचा‎आहे!‎ त्यात हे होर्मुजवाले भाऊही मान्य करायला तयार नाहीत.‎एक नरम पडतो तर दुसरा संतापतो. दुसरा झुकतो तर‎पहिला डोळे वटारतो. त्यात इस्रायलचे नेतान्याहू दोन्ही‎बाजूंनी, दोन्ही हातांनी आगीत तेल ओतण्याचे काम करत‎आहेत. इराण आणि अमेरिकेचा विचार केला तर त्यांना‎याची काहीही पर्वा नाही. ते संपूर्ण जगाला महागड्या‎दरात तेल विकत आहेत. तेल वाहत आहे, कमाई वाढत‎आहे. जगभरातील हाहाकाराशी त्यांना काहीही देणेघेणे‎नाही.‎ पूर्वीही नव्हते. आताही नाही.‎ दोघांमध्ये समझोता घडवून आणण्याचा ठेकेदार बनून‎फिरणारा पाकिस्तानदेखील तोंडघशी पडला आहे.‎ वाटाघाटी घडवणे आता त्याच्याही आवाक्याबाहेर गेले‎आहे.‎ मुद्दा किंमतीचा नाही...‎संसाधनांचा पूर इतका वाढला आहे की‎त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कुणालाच‎सुचत नाही. माणूस स्वतःही या‎संसाधनांच्या वापरातून/गैरवापरातून‎बाहेर पडू इच्छित नाही. प्रश्न किंमतीचा‎नाही, तर उपलब्धतेचा आहे! पुरवठ्याचा‎आहे!‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *