कामाख्या नारायण सिंह आणि अनुराग कश्यपImage Credit source: Instagram
‘द केरळ स्टोरी 2’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपने या चित्रपटाला प्रचारकी असल्याचं म्हणत ‘पूर्णपणे बकवास’ अशी टीका केली होती. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका सीनमध्ये एक मुस्लीम कुटुंब अभिनेत्रीला बळजबरीने गोमांस खायला देतात, त्यावर अनुरागने प्रतिक्रिया दिली होती. गोमांस तर दूर राहिलं पण कोणी अशाप्रकारे कोणाला खिचडीसुद्धा बळजबरीने खायला घालत नाही, असं तो म्हणाला होता. यावरून आता ‘द केरळ स्टोरी 2’चे दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंह यांनी अनुराग कश्यपला सडेतोड उत्तर दिलं आहे. कामाख्या यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी अनुरागला मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याची टीका केली आहे.
ते पुढे म्हणाले, “अनुराग कश्यपने म्हटलंय की कोणीच कोणाला अशाप्रकारे खिचडीसुद्धा देत नाही. मी पूर्णपणे सहमत आहे. कोणीच कोणाला अशाप्रकारे लाडूसुद्धा भरवू शकत नाही. परंतु दुर्दैवाने आपल्या समाजात आपल्याच निरागस मुलींचं धर्मांतर करण्यासाठी त्यांना बळजबरीने गोमांस खायला दिलं जातंय. हा एक गुन्हा आहे. समस्या अशी आहे की अनुराग कश्यप आता मानसिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. त्याला प्रत्येक गोष्टीशी समस्या आहे, ब्राह्मणांशी, नेटफ्लिक्सशी, फिल्म इंडस्ट्रीशी. एखाद्या माणसाला प्रत्येक गोष्टीशी समस्या कशी असू शकते?”
Dear Anurag sir,
मुद्दा ये नहीं है कि फिल्म में क्या दिखाया गया- खिचड़ी, बीफ या कुछ और।असल सवाल है consent और coercion।
किसी की मर्जी के खिलाफ तो खिचड़ी भी नहीं खिलाई जा सकती, तो अगर कोई फिल्म जबरन बदलाव या दबाव की बात उठाती है, तो उसे नफरत फैलाना कह देना intellectual… pic.twitter.com/1bIIaYyA7I
— Kamakhya Narayan Singh (@kamakhyanarayan) February 22, 2026
“अनुरागने एक चित्रपट बनवला होता, दॅट गर्ल इन यलो बूट्स.. ज्यामध्ये एका वडिलांचे लेकीसोबत अनैतिक संबंध दाखवले होते. हे एका सभ्य समाजाच्या विचारांच्या पलीकडचं आहे. परंतु अनुराग मानसिकदृष्ट्या कमकुवत झाले आहेत आणि समाजाने आता त्याच्याकडे गांभीर्याने पाहणं सोडून दिलं आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याचे चित्रपट फ्लॉप होत आहेत. मी देवाकडे प्रार्थना करतो की त्याला अक्कल द्यावी. द केरळ स्टोरी 2 हा चित्रपट तथ्यांवर आधारित आहे”, अशा शब्दांत त्यांनी उत्तर दिलं.
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, ‘प्रिय अनुराग सर, मुद्दा चित्रपटातील दृश्यांचा किंवा खिचडी, गोमांसचा नाहीये. तर खरा प्रश्न संमती आणि बळजबरीचा आहे. तुम्ही एखाद्याला त्यांच्या इच्छेविरुद्ध खिचडी खाण्यास भाग पाडू शकत नाही. त्यामुळे जर एखादा चित्रपट बळजबरीने धर्मांतर किंवा दबावाचा मुद्दा उपस्थित करत असेल, तर त्याविरोधात द्वेष पसरवणं हा बौद्धिक अप्रामाणिकपणा आहे. वादविवाद हा तथ्ये आणि आकडेवारीवर आधारित असावा.’
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



