सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटला आता महागाईचा मोठा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपयाची विक्रमी घसरण झाली आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या खर्चामुळे आघाडीच्या FMCG (Fast Moving Consumer Goods) कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमतीत २ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. यामुळे केंद्र सरकारने गेल्या वर्षी जीएसटी कपातीद्वारे दिलेला दिलासा आता पूर्णपणे संपुष्टात आल्याचे चित्र आहे.
आगामी काळात दर आणखी वाढणार
सध्या सर्वच कंपन्यांनी दैनंदिन वस्तूंच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे सर्वच उत्पादन हे वाढीव किंमतीने नवीन बाजारात आणले आहे. यात डिटर्जंट सेगमेंटमध्ये सर्फ एक्सेल, रिन, निम आणि डोमेक्स यांसारख्या ब्रँड्सच्या किंमती वधारल्या आहेत. याशिवाय रोजच्या वापराचे साबण, शॅम्पू आणि हेअर डायसाठी आता जास्त पैसे मोजावे लागतील.
त्यासोबतच टाटा टी (Tata Tea) च्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी काळात हे दर आणखी वाढण्याचे संकेत आहेत. टाटा कंझ्युमरचे एमडी सुनील डिसूझा यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. तसेच ओट्स, चॉकलेट्स, नूडल्स आणि नाश्त्याच्या धान्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. डाबर इंडियाने आपल्या वाटिका हेअर ऑईल आणि रिअल ज्यूसच्या किंमतीतही २ टक्क्यांची वाढ केली आहे.
कोणकोणत्या वस्तू महाग?
- डिटर्जंट: सर्फ एक्सेल (Surf Excel), रिन (Rin), विम (Vim) आणि डोमेक्स (Domex)
- साबण: रोजच्या वापराचे विविध ब्रँड्सचे अंघोळीचे साबण
- चहा: टाटा टी (Tata Tea) च्या दरात वाढ झाली आहे.
- नाश्त्याचे पदार्थ: ओट्स (Oats), नाश्त्याची धान्ये (Cereals) आणि नूडल्स.
- इतर: चॉकलेट्स, बिस्किटे आणि रिअल ज्यूस (Real Juice).
- केसांचे तेल: डाबर वाटिका हेअर ऑईल आणि इतर ब्रँड्सची तेले.
- इतर: शॅम्पू, हेअर डाय आणि टूथपेस्ट.
दरवाढीची ३ प्रमुख कारणे
गेल्या ३० जानेवारी रोजी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ९२.०२ या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला. यामुळे कच्च्या मालाची आयात करणे कंपन्यांसाठी अत्यंत महाग झाले आहे. त्यासोबतच सध्या कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत आहे. साबण आणि डिटर्जंट तयार करण्यासाठी आवश्यक असलेले सल्फर, पॅराफिन आणि खोबरेल तेल यांसारख्या घटकांचे दर थेट कच्च्या तेलावर अवलंबून असतात. हा आयात खर्च वाढल्याने कंपन्यांनी हा भार ग्राहकांवर टाकला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कंपन्यांनी स्वतःचा नफा कमी करून किमती स्थिर ठेवल्या होत्या. मात्र, उत्पादन खर्च हा आवाक्याबाहेर गेला आहे. त्यामुळे आता कंपन्यांना दरवाढ करणे अनिवार्य झाले आहे.
[embedded content]
शहर
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
महाराष्ट्र
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!


























Subscribe to my channel


