रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व विक्रम मोडले आहेत. बॉलिवूडमधील उल्लेखनीय चित्रपटांपैकी हा एक ठरला आहे. या चित्रपटाच्या यशावर अनेक सेलिब्रिटींनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना हा चित्रपट दमदार वाटला, तर काहींनी त्यात हिंसक दृश्यांचा भरणा असल्याचं म्हटलंय. आता अभिनेता अभिषेक बच्चनने या चित्रपटावर मोकळी प्रतिक्रिया दिली आहे. “भारतीय चित्रपटसृष्टी ही जगातील सर्वांत मोठी चित्रपटसृष्टी आहे. आपले आकडे इतके मोठे आहेत की, अरे आपण आपला स्क्विड गेम कधी तयार बनवणार असा विचार करणंच चुकीचं ठरेल. आपण धुरंधर बनवला आहे आणि त्याच्या कमाईच्या आकड्यांकडे एकदा पहा”, असं तो म्हणाला.
“धुरंधरच्या तिकिटांच्या विक्रीचा आकडाच पहा. हा कोणत्याही चित्रपटाला किंवा शोला सहज मागे टाकेल. त्यामुळे हा आकड्यांचा विषय आहे. कोरियन ड्रामा आणि चित्रपटांविषयी इतकं बोललं जातं, पण त्यांची व्ह्युअरशिप काय आहे, त्यांचे आकडे काय आहेत? भारतीय ज्या संख्येने चित्रपट पहायला जातात, त्या तुलनेत ते सर्व फिकं पडेल. त्यामुळे आपल्याकडे आकडे आधीपासूनच आहेत. त्यामुळे फॅड बनण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे आकडे मिळवण्याचा प्रयत्न करत आहात? मला वाटत नाही की आपण फॅड बनू इच्छितो”, असं तो पुढे म्हणाला.
याआधी आमिर खानने ‘धुरंधर’च्या आकड्यांबद्दल वेगळी प्रतिक्रिया दिली होती. जर का हा चित्रपट 15000 थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला असता तर याहून कित्येक पटींनी अधिक कमाई झाली असली, असं मत अभिनेता आमिर खानने नोंदवलं होतं. “या चित्रपटाने 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. तुम्हीच विचार करा, जर हा चित्रपट 5000 स्क्रीन्सऐवजी 15000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला असला, तर काय झालं असतं? कमाईचा आकडा आणखी जास्त असता. मी हेच सांगायचा प्रयत्न करतोय की खरा बदल तेव्हाच घडून येईल, जेव्हा स्क्रीन्सची संख्या वाढेल. कारण आपल्या देशात असे बरेच जिल्हे आहेत, जिथे सिंगल स्क्रीनसुद्धा नाही”, असं तो म्हणाला होता.
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये रणवीरसोबतच संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि राकेश बेदी यांच्याही भूमिका आहेत.
शहर
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
- बीड हादरले! महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतातील वीज तारेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
महाराष्ट्र
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
- बीड हादरले! महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतातील वीज तारेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

