अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचं विमान मुंबईवरून बारामतीला निघालं होतं. बारामतीच्या धावपट्टीवर उतर असताना विमानाचं नियंत्रण सुटलं आणि हे विमान थेट जमिनिला धडकलं, विमान जमिनिला धडकल्यानंतर घटनास्थळी मोठा स्फोट झाला आणि विमानाला आग लागली. या दुर्घटनेमध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघातावर काही जणांकडून वारंवार शंका उपस्थित करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या अपघातावर शंका उपस्थित केली आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील या अपघातावर शंका उपस्थिती केली होती. विमान हवेत अचानक तिरकं कसं झालं? मी काही त्यातला तज्ज्ञ नाही, पण काहीतरी प्रॉब्लेम असावा असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील या अपघातावर शंका उपस्थित केली होती, विमानात बॉम्ब होता का? अशी शंका येते असं म्हणत अपघाताची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली, अमोल मिटकरी यांनी देखील या विमान अपघातावर शंका उपस्थित केली आहे. दरम्यान आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भातील प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना त्यांनी मोठा खुलासा केला आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
पहिली गोष्ट अशी आहे की, अजितदादांचा जो काही दुर्दैवी अपघात झाला आहे, त्यामुळे सर्वच लोक शॉकमध्ये आहेत. कोणाचं दु:ख कमी आहे, आणि कोणाचं दु:ख जास्त आहे असं म्हणता येणार नाही, आणि मला वाटतं त्यांच्या कुटुंबाइतकं दु:ख कोणाला असूही शकत नाही, पण या अपघातामुळे सर्वजण दु:खी आहेत. हा जो अपघात घडला आहे, त्याची डीजीसीए मार्फत चौकशी सुरू आहे. आपण सीआयडी चौकशी सुरू केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्हाला विनंती आली की, याची सीबीय चौकशी करा. शेवटी आपल्याला सर्व सत्य कळालचं पाहिजे. चौकशी सगळ्या गोष्टींची सुरू आहे. त्यामुळे आता चौकशीमधून काय समोर येतय त्याची वाट पाहिली पाहिजे.
कुणाच्या मनात शंका असू नये असं म्हणणारा मी नाही, मात्र शंका योग्य ऑथेरिटीकडे व्यक्त केली पाहिजे. डीजीसीएकडे शंकेचं पत्र द्यावं किंवा आमच्याकडे द्यावं, आम्ही ते डीजीसीएला देऊ. प्रत्येक शंकांचं उत्तर मिळालं पाहिजे, चौकशीची मागणी करणं चुकीचं नाही, केंद्र आणि डीजीसीएला यात लपवण्यासारखं काही नाही असं मला वाटतं. व्हिसीआर कंपनीच्या विमातून देशभरातली जवळपास सर्वच नेते प्रवास करतात. दादांचा अपघात झाला त्या विमानात मी स्वत: 4 ते 5 वेळा प्रवास केला आहे. अजितदादांचा अपमान होईल किंवा परिवाराला त्रास होईल अशा पद्धतीने कुणी वागू नये, असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
शहर
- मुंबई: वसई-विरारच्या पूरसमस्येवर मोठा निर्णय; महापौरांचा ₹१०० कोटींचा पूरनियंत्रण आराखडा
- मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार: हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'; शेतीकामांसाठी शेतकऱ्यांना महत्त्वाच्या सूचना"
- नाशिक: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट, पेईंग गेस्टमध्ये तरुणीची हत्या; प्रियकराला अटक
- चित्रकूटमध्ये अनुभवा थरार! 'तुलसी वॉटरफॉल'वर उभारला उत्तर प्रदेशातील पहिला भव्य 'स्कायवॉक ब्रिज
महाराष्ट्र
- सातारा हादरले: दहिवडीत आरोग्य समिती सभापती सुरेंद्र मोरे यांच्या घरी घरफोडी; ११ तोळे सोने, चांदी आणि रोख रकमेवर चोरट्यांचा डल्ला
- मुंबई: वसई-विरारच्या पूरसमस्येवर मोठा निर्णय; महापौरांचा ₹१०० कोटींचा पूरनियंत्रण आराखडा
- मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार: हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'; शेतीकामांसाठी शेतकऱ्यांना महत्त्वाच्या सूचना"
- नाशिक: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट, पेईंग गेस्टमध्ये तरुणीची हत्या; प्रियकराला अटक
गुन्हा
- मध्य प्रदेश: लग्नाला वर्षही पूर्ण नव्हते; चहाच्या वादातून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा
- मुंबईत घर खरेदी महागणार! मालमत्ता नोंदणी शुल्कात ३० हजारांवरून ५० हजारांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात महायुती सरकार
- जळगाव: विवाहितेचे अपहरण करून अत्याचाराचा आरोप; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- "छत्रपती संभाजीनगर हादरले: विवाहित शिक्षिकेवर पोलीस उपनिरीक्षकाकडून लैंगिक अत्याचार; प्रेमाचे जाळे विणून केली मारहाण"
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- मध्य प्रदेश: लग्नाला वर्षही पूर्ण नव्हते; चहाच्या वादातून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा
- टाकाऊतून टिकाऊ: बहराइचच्या महिला कैद्यांनी गव्हाच्या पेंढ्यांपासून साधली प्रगती; 'ओडीओपी' योजनेमुळे मिळाली हक्काची कमाई"
- नवी दिल्ली: डोंगरावरून ढकलून ऐतिहासिक तोफा चोरल्या; वारसा सुरक्षेवर गंभीर प्रश्न
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!

























Subscribe to my channel

