अभिनेता राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरणात तिहार तुरुंगात कैद होता. बऱ्याच प्रयत्नांनंतर आणि इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून मिळालेल्या आर्थिक मदतीनंतर अखेर त्याला अंतरिम जामीन मंजूर झाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने मदत केलेल्या सेलिब्रिटींचे आभार मानले आहेत. राजपालने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित लोकांना धन्यवाद म्हटलंय. त्याचसोबत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो त्याच्या तुरुंगातील दिवसांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला आहे. इतकंच नव्हे तर राजपालने असंही म्हटलंय की जर या खटल्यात तो दोषी ठरत असेल तर तो पुन्हा तुरुंगात जायला तयार आहे.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत राजपालने तुरुंगात कसा वेळ घालवला, याविषयीचा खुलासा केला आहे. त्याने सांगितलं की तुरुंगात इतर कैद्यांना जे जेवण दिलं जात होतं, तेच त्याला मिळत होतं. आपली बाजू मांडताना राजपाल यादवने स्पष्ट केलं की, जर मी कोणाची फसवणूक केली असेल तर गेल्या दहा वर्षांत मला फिल्म इंडस्ट्रीत कामच मिळालं नसतं. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने चेक बाऊन्सबद्दल त्याने अधिक बोलणं टाळलं. या खटल्याबद्दल मुलाखतींमध्ये त्याच्याकडून जर काही चुकीचं बोललं गेलं, तर त्याला कायदेशीर समस्यांचा सामना करावा लागेल, असं तो म्हणाला.
या मुलाखतीत राजपाल पुढे म्हणाला की, तो जसा दिवस येतोय, तसं जगण्याचा प्रयत्न करतोय आणि एक नवीन सुरुवात करतोय. तुरुंगात त्याने इतर कैद्यांप्रमाणेच सर्व नियमांचं पालन केलं आणि न्यायालयाच्या नियमांचंही पालन करत राहणार असल्याचं त्याने सांगितलं. “जर न्यायालयाला मी चुकीचा वाटलो, तर मला पुन्हा तुरुंगात पाठवा, मी त्याचा आदर करेन. मला एका वर्षात कमीत कमी दहा चित्रपट मिळाले आहेत. तर मी फसवणूक करणारा असतो, तर कोणीही माझ्यासोबत काम का केलं असतं? इंडस्ट्रीला हे सिद्ध करण्याची गरजच नाही की ते माझ्यासोबत आहेत, कारण इंडस्ट्रीने कायम माझं समर्थन केलंय. मला पूर्ण विश्वास आहे की प्रत्येकजण माझ्यासोबत आहे. मला मिळालेल्या मदतीचा मी आदर करतो, परंतु मला सहानुभूती नकोय”, असं राजपाल म्हणाला.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

