अलीकडेच मी माझ्या एका स्तंभात लिहिले होते कीलोकसभेत अल्पमतात असूनही भाजप देशास एकपक्षीयव्यवस्थेकडे नेत आहे. पण याची दुसरी बाजूही आहे. हेदुसऱ्या पक्षाच्या उभारणीच्या शक्यतेचा मार्गही बनवू शकते.अट ही आहे की, हा पक्ष त्या प्रादेशिक पक्षांचे उरलेसुरलेमतदान आपल्या पारड्यात ओढून घेईल, ज्यांना भाजपमिळवण्याचा प्रयत्न करत आहे. विडंबना अशी आहे की, भाजपचे यश काँग्रेसलात्याच्यासाठी एकमेव अखिल भारतीय आव्हान म्हणून समोरयेण्याची आपली जिद्द मजबूत करण्याची संधी देऊ शकते.मला माहीत आहे की या गृहितकावर बरीच शंका घेतलीजाईल, उलट काँग्रेसबद्दल निराश झालेले लोक याचीटिंगलही उडवू शकतात. पण भाजपला ठाऊक आहे कीत्याच्याविरुद्धचे एकमेव मोठे आव्हान काँग्रेसच आहे.पक्षाच्या निवडणूक भाषणांमध्ये सर्वाधिक हल्ला काँग्रेसआणि गांधी कुटुंबावरच केला जातो. हे सत्र त्याराज्यांमध्येही सुरू राहिले, ज्यांमध्ये काँग्रेस शून्य आहे.उदाहरणार्थ, आंध्र प्रदेशमध्ये वारंवार सांगितले गेले कीकाँग्रेसने राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कारटाकला होता, तर 2024 मध्ये तिथे काँग्रेसला अवघी 2.74टक्के मते मिळाली होती. ओडिशामध्ये प्रश्न विचारण्यातआला की काय ‘शहजादे’ 2014 ची कथा पुन्हा घडवणारआहेत? झारखंडमध्ये एका काँग्रेस मंत्र्याच्या घरकामकरणाऱ्याच्या घरातून जप्त केलेल्या रोकडचा दाखला देतप्रश्न विचारण्यात आले. बिहारमध्येही काँग्रेसच्या‘तुष्टीकरण’ राजकारणावर वारंवार हल्ले केले गेले.बंगालमध्ये काँग्रेसला तृणमूलचा सहकारी घोषित करतम्हटले गेले की हे दोन्ही पक्ष महिलांना 33% आरक्षणाच्यामार्गात अडथळा आणत आहेत. कुठे नगरपालिकेचीनिवडणूक होत असेल आणि काँग्रेसचे तिथे कोणतेही नामोनिशान नसेल तरीही तुम्ही भाजपला काँग्रेसवर हल्ला करताना पाहाल. संसदेच्या मान्सून अधिवेशनात यागृहितकाची सर्वात मोठी परीक्षा ही असेल की भाजप दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यात यशस्वी होतो की नाहीआणि संसदेचा आकार वाढवण्यासाठी तसेच मतदारसंघांचे नवीन सीमांकन करण्यासाठी संविधान संशोधन घडवून आणण्यात, महिला आरक्षण विधेयक पास करून घेण्यात यशस्वी होतो की नाही. 240 जागांपासून सुरू करून दोन-तृतीयांश बहुमतासाठी 362 किंवा त्याहून वरचाआकडा जमवणे राजकीय चमत्कारच ठरेल. पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला उत्तर प्रदेश आणिपंजाबमध्ये आणि शेवटी गुजरातमध्ये निवडणुका आहेत. त्यानंतरच्या वर्षी कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये निवडणुका होतील. मी केवळ त्या राज्यांची गणना करत आहे, ज्यांचे लोकसभेत 10 पेक्षा जास्तखासदार आहेत. यापैकी बहुतांश राज्यांमध्ये काँग्रेसचभाजपची मुख्य प्रतिस्पर्धी असेल. त्यामुळे अपेक्षा हीचआहे की भाजपचा काँग्रेसविरोधी आवाज आणखी तीव्रहोईल. पण भाजप 2029 आणि त्यानंतरच्या काळाचाहीविचार करत आहे आणि तो कोणाला आपला भावीप्रतिस्पर्धी म्हणून पाहत आहे? ज्या प्रादेशिक पक्षांनी त्यांना240 वर रोखले होते त्यापैकी समाजवादी पक्षाला सोडूनबहुतांचा सफाया केला गेला आहे. द्रमुक आपलीविचारसरणी टिकवून आहे, पण तामिळनाडूमध्ये भाजपचेकोणतेही बळ नाही. आंध्रमध्ये तेलुगू देसम पक्षाने भक्कमआघाडी बनवली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी जगनमोहन रेड्डीयांचा पक्ष भाजपशी मुकाबला करणारा नाही. इंडिया आघाडीचे इतके सारे घटक पक्ष जेव्हा घायाळझाले आहेत तेव्हा काँग्रेससाठी भविष्य नवीन आव्हानहीआहे आणि नवीन संधीही. ती भाजपची एकमेव किंवाजवळची एकमेव प्रतिस्पर्धी म्हणून धाडसी उडी मारू शकतेकाय? काँग्रेसचे 21 टक्के मते तर पक्की दिसतात. भाजपला2024 मध्ये जवळपास 37 टक्के मते मिळाली. काँग्रेसने जर21 टक्क्यांवरून 5 टक्के जास्त मतेही आणली तरभाजपसाठी खेळ बिघडवू शकते. तुम्ही हे गृहीत धरूनचाललात की या अतिरिक्त मतांपैकी बहुतांश मतेभाजपपासून तुटून येतील. काँग्रेसने जर 30-32 टक्के मतेमिळवली तर भाजप 200 जागांच्या आकडेवारी संकुचितहोईल. तेव्हा त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाहीआघाडीचे रूप बदलेल. साहजिकच हे केवळ सैद्धांतिकविषय आहेत, पण भाजपलाही याची जाणीव आहे. ज्याअर्थी आपण सैद्धांतिक चर्चा करत आहोत, त्याअर्थीशैक्षणिक स्रोतांचा दाखला देणे उचित ठरेल. जॉनहॉपकिन्स युनिव्हर्सिटी प्रेसद्वारे प्रकाशित ‘जर्नल ऑफडेमॉक्रसी’मधील जुलै 2026 मध्ये प्रकाशित एडगर सारआणि पेलिन अयान मुसिल यांच्या संशोधनावर नजर टाका.याचं शीर्षक भारतातील या प्रचलित धारणेच्या उलट आहेकी सत्तेत बसलेल्या पक्षाला पराभूत करण्याचा एकमेव मार्गआघाडीच आहे. संशोधन निबंधाच्या लेखकांचे म्हणणेआहे की विद्वान आणि रणनीतिकारांमध्ये झालेली हीसहमती भ्रमित करणारी आहे की प्रबळ सत्ताधारी पक्षांनानिवडणूकपूर्व बनवलेले पक्षच सत्तेवरून खाली खेचूशकतात. याचे पुरावे आहेत दोन आश्चर्यकारक सत्तास्थित्यंतरे - एक, हंगेरीमध्ये, ज्यामध्ये एकाच पक्षाने ‘तिस्जापक्ष’ ने व्हिक्टर ओरबानच्या फिदेस्झ पक्षाला सत्तेतून बाहेरहाकलले होते; दुसरे, 2024 मध्ये तुर्कियेमध्ये रिपब्लिकनपीपुल्स पार्टीच्या (सीएचपी) दणदणीत विजय. हंगेरीमध्येपीटर माग्यार यांनी नवीन पक्ष उभा केला आणि ओरबानलाभ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर घेरले. माग्यारसुद्धा ओरबानइतकेचकट्टर दक्षिणपंथी आहेत. तुर्कियेमध्ये सीएचपीने स्वतःलानव्या रूपात सामावून घेतले आणि व्यापक विरोधीमतदारांना आपल्या बाजूने सामावून घेतले. हा व्यापकविरोधी मतदार प्रत्येक लोकशाहीमध्ये अस्तित्वात आहे,भारतातही आहे. विरोधक ही मते एकत्र करण्यासाठीबहुपक्षीय आघाड्यांची स्थापना करत आले आहेत. काँग्रेसहा प्रयत्न स्वबळावर करण्याची हिंमत करू शकते काय? आपण श्रीलंका आणि नेपाळमध्ये पाहिले की,शक्तिशाली पक्षालाही कशा प्रकारे सत्तेवरून बेदखल केलेजाऊ शकते. काँग्रेस स्वतःला नवीन अवतारात उभारूशकते? डावे-उजवे हा द्वंद्व कामी येणार नाही. कारणजनकल्याण, वितरणवादी अर्थनीती, सार्वजनिक क्षेत्र,सबसिडी इत्यादी मुद्द्यांवर भाजप काँग्रेसपेक्षा जास्त डाव्याविचारसरणीचा कल प्रदर्शित करते. काँग्रेसला नवीन विचारआणि अजेंडा आणावा लागेल. काँग्रेस या सर्व प्रकरणांनाकशी तोंड देईल? बदललेल्या जगाच्या पार्श्वभूमीवरकाँग्रेसची परराष्ट्र धोरण, आणि अर्थनीती काय असेल? तीम्हणते की मोदी आर्थिक वाढीची जी आकडेवारी देतआहेत, ती खोटी आहे तर काँग्रेस भारताच्या आर्थिकवाढीचा दर 8 टक्क्यांवर कसा पोहोचवेल? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) आगामी विधानसभा निवडणुकांतहीसरळ सामना आहे...पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब आणिगुजरातमध्ये निवडणुका आहेत. त्यानंतरच्या वर्षीकर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणिछत्तीसगडमध्ये निवडणुका होतील. यापैकीबहुतांश राज्यांमध्ये काँग्रेसच भाजपची मुख्यप्रतिस्पर्धी असेल. त्यामुळे भाजपचाकाँग्रेसविरोधी आवाज आणखी तीव्र होईल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
महाराष्ट्र
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!


























Subscribe to my channel


