जेव्हा जेव्हा मी पाहुण्यांना मुंबईच्या अंधेरी-कुर्ला रोडवर घेऊन जातो, तेव्हा त्यांना सांगतो की 1940 ते 1980 च्या दशकापर्यंत हा परिसर बॉम्बेच्या (आताची मुंबई) सर्वात गजबजलेल्या चित्रपट निर्मिती केंद्रांपैकी एक होता. मोहन स्टुडिओमध्ये मुघल-ए-आझम, देवदास आणि बंदिनी यांसारख्या महान चित्रपटांचे शूटिंग झाले होते. मुघल-ए-आझमसाठी के. आसिफ यांनी येथे लाहोर किल्ल्याच्या धर्तीवर आयकॉनिक शीश महालचा सेट बनवला होता. सुमारे 150 फूट × 80 फूट × 35 फूट आकाराचा हा सेट तयार करण्यासाठी दोन वर्षे लागली, ज्यामध्ये फिरोजाबादच्या कारागिरांनी तयार केलेले बेल्जियम ग्लासचे हजारो तुकडे वापरले होते. 1950 च्या दशकाच्या शेवटी उभारलेल्या या सेटवर 15 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला होता, जी त्या काळी खूप मोठी रक्कम होती. पण जेव्हा मी त्यांना ही विडंबना सांगतो की त्या स्टुडिओमध्ये महिलांसाठी एक चांगला वॉशरूमदेखील नव्हता, तेव्हा ते माझ्याकडे संशयाने पाहतात आणि विचार करतात की हे कसे शक्य आहे. ते नेहमी विचारतात की, जे स्टुडिओ मॅनेजमेंट सेटवर इतका खर्च करू शकत होते, ते त्या अभिनेत्रींसाठी टॉयलेट का बांधू शकले नाहीत, ज्यांच्यामुळे चित्रपटगृहांमध्ये गर्दी उसळत असे. मग मी त्यांना सांगतो की अभिनेत्री वहिदा रहमान यांच्याबद्दल सर्च करा, ज्या सांगायच्या की त्या शूटिंगदरम्यान पाणी पिणे टाळायच्या. आशा पारेख यांनीही एकदा म्हटले होते की त्या सुदैवी होत्या, कारण दीर्घ शूटिंग शेड्युलदरम्यान सलग वॉशरूमला जाणे टाळूनही त्यांना कधी किडनीची समस्या उद्भवली नाही. रेणुका शहाणे यांनीही म्हटले होते की 1990 च्या दशकातही फिल्म सेटवर अनेक महिला पाणी पिणे टाळायच्या, कारण तिथले वॉशरूम अस्वच्छ आणि वापरण्यायोग्य नसायचे. सिनेसृष्टीची भव्यता आणि अभिनेत्रींच्या या अडचणींमधील विरोधाभास ऐकल्यानंतर पाहुणे विचारतात की, ‘काय आपण तो स्टुडिओ पाहू शकतो?’ दुर्दैवाने मी त्यांना त्या काळातील एक वीटही दाखवू शकत नाही. तो स्टुडिओ आता नाहीसा झाला असून त्या जागी निवासी इमारती उभ्या राहिल्या आहेत. मी हे सांगून विषय संपवतो की, ‘जेव्हा एखादा स्टुडिओ संपतो, तेव्हा त्यासोबत भारतीय सिनेमाचा एक संपूर्ण अध्याय संपतो आणि इतिहासाचा एक भागही विस्मरणात जातो.’ मंगळवारी माझ्यासोबत वेस्ट शिकागोहून आलेले पाहुणे होते. ते लगेच म्हणाले, ‘देवाचे आभार की इलिनॉयमध्ये दीर्घकाळापासून दुर्लक्षित राहिलेल्या 1913 मध्ये बांधलेल्या एका खोलीच्या शाळेची अखेर सुधारणा केली जात आहे. आता तिथे जिल्ह्याचे इन्स्ट्रक्शनल कोच बसतील, जे टीचिंग आणि लर्निंगमध्ये स्थानिक शाळांना मदत करतील.’ ही शाळा आता एक जिवंत एज्युकेशनल रिसोर्स बनेल, ज्यामुळे तरुण शिक्षकांना समजेल की एकेकाळी अमेरिकेत सामान्य असलेल्या एका खोलीच्या शाळा प्रत्यक्षात कशा दिसायच्या. एका एकरापेक्षाही कमी जागेत पसरलेली ही इमारत आता केवळ इतिहासाच्या पुस्तकांमध्ये नोंदलेली राहणार नाही, तर भावी शिक्षकांना शिक्षणाच्या विकासाबद्दल माहिती देत राहील.नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यात माझी भेट साऊथ एक्सटेन्शनच्या एका स्थानिक इतिहासकाराशी झाली. त्यांनी एक रंजक किस्सा सांगितला की त्यांच्या परिसराला हे नाव कसे पडले. त्यांच्या मते या वसाहतीला हे नाव पडले कारण कॅनॉट प्लेसच्या आसपास ब्रिटिशांनी वसवलेल्या नवी दिल्लीचा दक्षिणी एक्सटेन्शन (विस्तार) म्हणून तिचा विकास करण्यात आला होता. याला कोणताही अधिकृत पुरावा नसला, तरी अनेकांचे असे मानणे आहे की याचे नाव त्याच भौगोलिक क्षेत्रातून आले आहे, जिथे कधीकाळी ‘साऊथ-एंड रोड’ नावाचा रस्ता होता. नंतर त्या रस्त्याचे नाव बदलून पिलू मोदी रोड केल्यामुळे एक गुंतागुंतीचा ऐतिहासिक डिस्कनेक्ट निर्माण झाला. येणाऱ्या पिढ्या विचार करू शकतात की एखाद्या परिसराचे नाव ‘साऊथ एक्सटेन्शन’ का ठेवले असेल, जेव्हा जिथून त्याचा विस्तार सुरू झाला, त्याच्या आसपास मिळत्याजुळत्या नावाची कोणतीही जागा नाहीये. अशा वेळी या नावामागचा भौगोलिक तर्क कमी स्पष्ट होतो आणि जुने नकाशे, ऐतिहासिक रेकॉर्ड किंवा या विषयावर पुस्तके लिहिणाऱ्या इतिहासकारांशिवाय दिल्लीचा शहरी विकास समजून घेणे कठीण होऊन जाते. जेव्हा जुन्या इमारती पाडल्या जातात किंवा ऐतिहासिक नावे गायब होतात, तेव्हा आपण केवळ विटा, रस्ते किंवा लँडमार्कच गमावत नाही, तर आपली शहरे, संस्था आणि ओळखीच्या विकासाला उलगडणाऱ्या कथाही पुसून टाकतो. फंडा असा आहे की, इतिहास हे ओझे नाही, जे वाहावे लागेल. तो एक वारसा आहे, जो भावी पिढ्यांसाठी जतन करून ठेवला पाहिजे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
महाराष्ट्र
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
- बीड: लेकींच्या शिक्षणासाठी आईचा अनवाणी एल्गार; साडी नेसून धावली अन् अंबाजोगाईत जिंकली मॅरेथॉन!
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!


























Subscribe to my channel


