जेव्हा जेव्हा मी पाहुण्यांना मुंबईच्या अंधेरी-कुर्ला रोडवर घेऊन जातो, तेव्हा त्यांना सांगतो की 1940 ते 1980 च्या दशकापर्यंत हा परिसर बॉम्बेच्या (आताची मुंबई) सर्वात गजबजलेल्या चित्रपट निर्मिती केंद्रांपैकी एक होता. मोहन स्टुडिओमध्ये मुघल-ए-आझम, देवदास आणि बंदिनी यांसारख्या महान चित्रपटांचे शूटिंग झाले होते. मुघल-ए-आझमसाठी के. आसिफ यांनी येथे लाहोर किल्ल्याच्या धर्तीवर आयकॉनिक शीश महालचा सेट बनवला होता. सुमारे 150 फूट × 80 फूट × 35 फूट आकाराचा हा सेट तयार करण्यासाठी दोन वर्षे लागली, ज्यामध्ये फिरोजाबादच्या कारागिरांनी तयार केलेले बेल्जियम ग्लासचे हजारो तुकडे वापरले होते. 1950 च्या दशकाच्या शेवटी उभारलेल्या या सेटवर 15 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला होता, जी त्या काळी खूप मोठी रक्कम होती. पण जेव्हा मी त्यांना ही विडंबना सांगतो की त्या स्टुडिओमध्ये महिलांसाठी एक चांगला वॉशरूमदेखील नव्हता, तेव्हा ते माझ्याकडे संशयाने पाहतात आणि विचार करतात की हे कसे शक्य आहे. ते नेहमी विचारतात की, जे स्टुडिओ मॅनेजमेंट सेटवर इतका खर्च करू शकत होते, ते त्या अभिनेत्रींसाठी टॉयलेट का बांधू शकले नाहीत, ज्यांच्यामुळे चित्रपटगृहांमध्ये गर्दी उसळत असे. मग मी त्यांना सांगतो की अभिनेत्री वहिदा रहमान यांच्याबद्दल सर्च करा, ज्या सांगायच्या की त्या शूटिंगदरम्यान पाणी पिणे टाळायच्या. आशा पारेख यांनीही एकदा म्हटले होते की त्या सुदैवी होत्या, कारण दीर्घ शूटिंग शेड्युलदरम्यान सलग वॉशरूमला जाणे टाळूनही त्यांना कधी किडनीची समस्या उद्भवली नाही. रेणुका शहाणे यांनीही म्हटले होते की 1990 च्या दशकातही फिल्म सेटवर अनेक महिला पाणी पिणे टाळायच्या, कारण तिथले वॉशरूम अस्वच्छ आणि वापरण्यायोग्य नसायचे. सिनेसृष्टीची भव्यता आणि अभिनेत्रींच्या या अडचणींमधील विरोधाभास ऐकल्यानंतर पाहुणे विचारतात की, ‘काय आपण तो स्टुडिओ पाहू शकतो?’ दुर्दैवाने मी त्यांना त्या काळातील एक वीटही दाखवू शकत नाही. तो स्टुडिओ आता नाहीसा झाला असून त्या जागी निवासी इमारती उभ्या राहिल्या आहेत. मी हे सांगून विषय संपवतो की, ‘जेव्हा एखादा स्टुडिओ संपतो, तेव्हा त्यासोबत भारतीय सिनेमाचा एक संपूर्ण अध्याय संपतो आणि इतिहासाचा एक भागही विस्मरणात जातो.’ मंगळवारी माझ्यासोबत वेस्ट शिकागोहून आलेले पाहुणे होते. ते लगेच म्हणाले, ‘देवाचे आभार की इलिनॉयमध्ये दीर्घकाळापासून दुर्लक्षित राहिलेल्या 1913 मध्ये बांधलेल्या एका खोलीच्या शाळेची अखेर सुधारणा केली जात आहे. आता तिथे जिल्ह्याचे इन्स्ट्रक्शनल कोच बसतील, जे टीचिंग आणि लर्निंगमध्ये स्थानिक शाळांना मदत करतील.’ ही शाळा आता एक जिवंत एज्युकेशनल रिसोर्स बनेल, ज्यामुळे तरुण शिक्षकांना समजेल की एकेकाळी अमेरिकेत सामान्य असलेल्या एका खोलीच्या शाळा प्रत्यक्षात कशा दिसायच्या. एका एकरापेक्षाही कमी जागेत पसरलेली ही इमारत आता केवळ इतिहासाच्या पुस्तकांमध्ये नोंदलेली राहणार नाही, तर भावी शिक्षकांना शिक्षणाच्या विकासाबद्दल माहिती देत राहील.नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यात माझी भेट साऊथ एक्सटेन्शनच्या एका स्थानिक इतिहासकाराशी झाली. त्यांनी एक रंजक किस्सा सांगितला की त्यांच्या परिसराला हे नाव कसे पडले. त्यांच्या मते या वसाहतीला हे नाव पडले कारण कॅनॉट प्लेसच्या आसपास ब्रिटिशांनी वसवलेल्या नवी दिल्लीचा दक्षिणी एक्सटेन्शन (विस्तार) म्हणून तिचा विकास करण्यात आला होता. याला कोणताही अधिकृत पुरावा नसला, तरी अनेकांचे असे मानणे आहे की याचे नाव त्याच भौगोलिक क्षेत्रातून आले आहे, जिथे कधीकाळी ‘साऊथ-एंड रोड’ नावाचा रस्ता होता. नंतर त्या रस्त्याचे नाव बदलून पिलू मोदी रोड केल्यामुळे एक गुंतागुंतीचा ऐतिहासिक डिस्कनेक्ट निर्माण झाला. येणाऱ्या पिढ्या विचार करू शकतात की एखाद्या परिसराचे नाव ‘साऊथ एक्सटेन्शन’ का ठेवले असेल, जेव्हा जिथून त्याचा विस्तार सुरू झाला, त्याच्या आसपास मिळत्याजुळत्या नावाची कोणतीही जागा नाहीये. अशा वेळी या नावामागचा भौगोलिक तर्क कमी स्पष्ट होतो आणि जुने नकाशे, ऐतिहासिक रेकॉर्ड किंवा या विषयावर पुस्तके लिहिणाऱ्या इतिहासकारांशिवाय दिल्लीचा शहरी विकास समजून घेणे कठीण होऊन जाते. जेव्हा जुन्या इमारती पाडल्या जातात किंवा ऐतिहासिक नावे गायब होतात, तेव्हा आपण केवळ विटा, रस्ते किंवा लँडमार्कच गमावत नाही, तर आपली शहरे, संस्था आणि ओळखीच्या विकासाला उलगडणाऱ्या कथाही पुसून टाकतो. फंडा असा आहे की, इतिहास हे ओझे नाही, जे वाहावे लागेल. तो एक वारसा आहे, जो भावी पिढ्यांसाठी जतन करून ठेवला पाहिजे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




