राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. राज्यात विरोधी पक्षनेत्याशिवाय सभागृह चालवणे हा लोकशाहीचा अपमान आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याला ही बाब शोभा देणारी नाही, अशा शब्दांत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला.
विरोधी पक्षनेता येऊ नये म्हणून कायदा बदलण्याचे काम सुरु
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका केली. राज्यात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतंय आणि राज्याच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही, याची फक्त महाराष्ट सरकारला नव्हे तर देशाच्या सरकारलाही याबद्दल लाज वाटली पाहिजे. विरोधी पक्षाशिवाय तुम्ही दोन्ही सभागृह चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून जिथे शक्य असेल तिथे ते विरोधी पक्षनेतेपद देण्याचे टाळत आहे. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत, पण तिथूनच त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. कारण विरोधी पक्षनेता नको. महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेता येऊ नये म्हणून कायदा बदलण्याचे काम सुरु आहे. याला निर्लज्जपणा म्हणतात, अशी टीका संजय राऊतांनी केली.
तुम्ही लोकशाहीपणाने सत्तेवर यायचं, लोकशाही मार्गाने मुख्यमंत्री व्हायचं, विधीमंडळ स्थापन करायचं आणि त्या लोकशाहीत विरोधी पक्षनेत्याला जे स्थान आहे ते टाळून बाकी सर्व उद्योग करायचे. लोकशाहीला कलंक लावण्याचे हे कृत्य आहे. विधानपरिषदेत आणि विधानसभेत जर विरोधी पक्षनेता दिला तर तो अनेक विषय घणाघातीपणे मांडेल, अनेक विषयांवर चर्चा घडवून आणेल आणि सरकारची कोंडी करले, या भीतीपोटी जर विरोधी पक्षनेता नेमायचा नाही, ही जर त्यांची भूमिका असेल तर हे सरकार एक नंबरचं डरपोक आहे, असा घणाघात संजय राऊतांनी केला.
राज्यात लोकशाहीची गळचेपी
विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यासाठी भास्कर जाधव यांचे नाव देऊन एक कालावधी लोटला आहे. भास्कर जाधव यांच्या नावावर महाविकासआघाडीने शिक्कामोर्तब केला आहे. पण भास्कर जाधव नको, हे तुम्ही ठरवणारे कोण? विधान परिषेदत काही निर्णय झाले आहेत, तिथेही त्या पद्धतीने विरोधी पक्षाला ते पद द्यायचे नाही, यासाठी कारस्थान केली जातात. महाराष्ट्राच्या ज्या मातीतून डॉ. आंबेडकरांनी संविधान निर्माण केले, त्या राज्यात लोकशाहीची गळचेपी होत असेल तर त्याची इतिहासात नोंद होईल हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर जी व्यक्ती बसलेली आहे, त्या व्यक्तीचे जे राजकीय व्यक्तीमत्त्व आहे ते पाहता ते हा निर्णय घेतील का हा पहिला प्रश्न आहे. जर निर्णय घेतला तर काय घेतील ही देखील शंका लोकांना आहे. जी व्यक्ती जमिनीचा कब्जा करण्यासाठी गावात जाऊन भानगडी करते, ती व्यक्ती विधानसभेची अध्यक्ष आहे. जी व्यक्ती विधानसभेच्या अध्यक्षेत बसून पक्षांतराबद्दल एकदम खोटा आणि भंपक निर्णय देते, त्या व्यक्तीबद्दल तुम्ही काय अपेक्षा करणार. त्यामुळे माझं तर कायम म्हणणं आहे की विधानसभेच्या अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणायला हवा. तुमच्याकडे बहुमत आहे, पण विधानसभा अध्यक्ष ज्यापद्धतीने वागतात त्याला लोकशाहीच्या भाषेत मनमानी आणि झुंडशाही म्हणायला हवं. अशा पद्धतीने विधानसभा किंवा विधीमंडळ चालवले जात नाही, अशा शब्दात संजय राऊतांनी सुनावले.
[embedded content]
शहर
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
- नाशिकमध्ये ५० ई-बसेसची प्रतीक्षा! केंद्र व राज्याकडून कराराचा मसुदा प्रलंबित; वर्षभरापासून बसेस वेटिंगवर
महाराष्ट्र
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- पुणेकर कुटुंबावर काळाचा घाला! कोल्हापुराजवळ भीषण अपघात; आईसह दोन निष्पाप चिमुकल्यांचा जागीच दुर्दैवी अंत
गुन्हा
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
- पुण्यात एसीबीचा मोठा दणका! बावधन पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक
- बिहार हादरलं! शिक्षकाच्या कृत्याविरोधात आवाज उठवणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला अमानुष छळवणूक; शाळेकडून बळजबरीने थामवला दाखला (TC)
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
विडियो गॅलेरी

देश विदेश
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम





















Subscribe to my channel



