सत्तेचा सर्वांत धोकादायक गैरवापर गुन्हेगार व्यवस्थेचाफायदा घेतात तेव्हा होत नाही. पण व्यवस्थे संबंधित लोकच सिस्टमचा आपल्या फायद्यासाठी कसा वापर करायचा हे शिकतात तेव्हा जास्त गैरवापर होतो. हाच मुद्दा सामान्य महिलांसाठी ट्विशा शर्मा यांसारखी प्रकरणे अधिक अस्वस्थ करणारी बनवतो. आता हे केवळ एक प्रकरण एक कुटुंब किंवा न्यायालयीन लढाई राहिलेली नाही. ही मोठ्या आणि अस्वस्थ करणाऱ्या सार्वजनिक चर्चेचा भाग बनली आहे. कायदेशीर व्यवस्थेला अत्यंत चांगल्या प्रकारे ओळखणारे लोक कधी कधी तिचा शस्त्र म्हणून वापरही करू शकतात का? महिलांसाठी मजबूत कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी भारताने अनेक दशकांपर्यंत संघर्ष केला आहे. हे संरक्षण आवश्यकही होते. पिढ्यान पिढ्या महिलांना गप्प बसवले गेले. दुर्लक्षित केले गेले. गोंधळात टाकले गेले. आर्थिक बंधनांत ठेवले गेले आणि सामाजिकदृष्ट्या लज्जित केले गेले.पण याच काळात लोकांच्या मनात हळूहळू दुसरी भीतीही घर करू लागली - ती म्हणजे कायदा आणि व्यवस्था यांचाच वापर महिलांवर दबाव आणण्यासाठी, त्यांना घाबरवण्यासाठी, कथानक नियंत्रित करण्यासाठी आणि त्यांची प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी होऊ शकतो. ट्विशा शर्मा प्रकरण आपल्याला अशाच कठीण प्रश्नांसमोर उभे करते. गिरिबाला सिंह आणि समर्थ सिंहयांसारखे आरोपी कायद्याबाबत अनभिज्ञ सामान्य व्यक्ती नसतात तेव्हा काय होते, त्यातही संपर्क असलेले, कायद्याचे सखोल ज्ञान असलेले किंवा संस्थात्मक नेटवर्क असलेले लोक असतात. अटकपूर्व जामीन लवकर मंजूर होतो, कथान के वेगाने पसरू लागतात आणि लढाई न्यायालयातून बाहेर पडून सामाजिक दबाव, कानगोष्टी, निवडक माहिती गळती, पुराव्यांमध्ये हस्तक्षेप आणि सार्वजनिक चारित्र्यहननापर्यंत पोहोचताना दिसते? तेव्हा काय होते? खरा प्रश्न हा आहेअशा महिलांसाठी भयावह असमतोल निर्माण होऊ शकतो का? आधीच मानसिक आघात, भीती,सामाजिक कलंक आणि भावनिक थकव्याशी झुंज देत असतात. मी हे केवळ एक भाष्यकार म्हणून लिहितनाही, तर मी स्वतःही अशाच त्रासदायक परिस्थितीतून गेले आहे. कायदेशीरदृष्ट्या मजबूत संपर्क असलेल्या आरोपीला अटकपूर्व जामीन मिळाल्यावर काय वाटते, हेमी अनुभवले आहे. किंवा एखादी व्यक्ती आपले कायदेशीर ज्ञान आणि पोहोच वापरून पद्धतशीरपणे प्रतिष्ठा नष्ट करण्याचा प्रयत्न करते, तेव्हाची वेदना मीपाहिली आहे. कायद्यातील त्रुटी, विलंब, संरक्षण आणि शांततेचा फायदा कसा घ्यायचा हे ज्यांना चांगले माहितीअसते, तेच जेव्हा त्याचा शस्त्र म्हणून वापर करतात,तेव्हा ही लढाई किती विषम असू शकते हे समजते.बहुतेक महिलांसाठी न्यायालयांचे वातावरण आधीचभीतीदायक असते. त्यात प्रभावशाली लोकांचे नेटवर्क,सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि कथानकनियंत्रित करण्याची क्षमता जोडली गेली, तर संपूर्णप्रक्रिया शिक्षेसारखी वाटू लागते. ही शिक्षा केवळकायदेशीर राहत नाही, तर मानसिक, आर्थिक,सामाजिक आणि अत्यंत वैयक्तिक बनते. अशापरिस्थिती अधिक धोकादायक बनवणाऱ्या गोष्टीअनेकदा अदृश्य स्वरूपात समोर येतात. कागदोपत्रीमोठे उल्लंघन दिसत नाही. पण काही पद्धती स्पष्टपणेजाणवतात - मुद्दाम विलंब करणे, प्रतिष्ठेबाबतकानगोष्टी पसरवणे, प्रक्रियांच्या माध्यमातून घाबरवणे,निराश करणे आणि प्रभावाचा वापर करणे. हळूहळूमहिलेला असे वाटू लागते की ती स्वतःचे अस्तित्ववाचवण्याची लढाई लढत आहे. ट्विशा शर्मा प्रकरणयासाठी महत्त्वाचे ठरते. कारण ते देशात वाढत असलेलीएक चिंता समोर आणते. ही चिंता केवळ गुन्हा किंवाआरोपांबाबत नाही, तर कायद्यापुढील असमानतेबाबतहीआहे. या प्रकरणातील शोकांतिका अशी की आजच्यातरुण महिला आता फक्त होणारा पती चांगला माणूसआहे का,? मला कशा प्रकारच्या कुटुंबात दिले जातआहे? मी सुरक्षित राहील का. हेही विचारू लागल्याआहेत. कारण बरे -वाईट झाल्यास समाज कोणावरविश्वास ठेवेल ? ( हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. ) कायद्याचे ज्ञान व संस्थात्मक पोहोचअसलेल्यांची जबाबदारी अधिक मोठीअसते. लोकांना असे वाटू लागले कीव्यवस्था प्रभावशाली लोकांशी वेगळी,सामान्य लोकांशी वेगळी वागणूक देते,तर त्याच क्षणी न्यायव्यवस्थेवरीलविश्वास कमकुवत होऊ लागतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- भांडुपमध्ये बेस्ट बसचा भीषण थरार: रिव्हर्स घेताना पादचाऱ्याला चिरडले; अनेक वाहनांचे नुकसान, व्हिडिओ व्हायरल
- मुदत संपण्याआधीच घर सोडल्यास घरमालक तुमची 'सुरक्षा ठेव' जप्त करू शकतात का? जाणून घ्या काय आहेत कायदेशीर नियम
- आषाढी वारी २०२६: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे उत्साहात प्रस्थान; उद्या तुकोबांची पालखी पुण्यात दाखल होणार!
- मुंबई: एकतर्फी प्रेमातून मानसिक छळाचा आरोप; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- मुदत संपण्याआधीच घर सोडल्यास घरमालक तुमची 'सुरक्षा ठेव' जप्त करू शकतात का? जाणून घ्या काय आहेत कायदेशीर नियम
- आषाढी वारी २०२६: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे उत्साहात प्रस्थान; उद्या तुकोबांची पालखी पुण्यात दाखल होणार!
- मुंबई: एकतर्फी प्रेमातून मानसिक छळाचा आरोप; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
- आषाढी वारी २०२६: माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत 'हाय अलर्ट' आणि मर्यादित उपस्थिती
गुन्हा
- पश्चिम बंगाल: बारुईपूर १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा एन्काऊंटरमध्ये खात्मा.
- झारखंड हादरले! अनैतिक संबंधांतून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा केला भीषण खून; आरोपींना बेड्या
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- मोठी बातमी! पीएफ काढण्याचे नियम बदलले; आता पैसे काढताना 'हे' नियम पाळावे लागणार!
- "E20 पेट्रोलमुळे बिघडलेली एक तरी गाडी दाखवा!" नितीन गडकरींचे टीकाकारांना थेट आव्हान.
- राम मंदिरात मोठा घोटाळा; ट्रस्टच्या नावाने छापली बनावट पावती पुस्तके; भाविकांकडून उकळले बक्कळ पैसे!


























Subscribe to my channel


