मृत्यूबद्दल सर्वसाधारण कल्पना अशा आहेत की मृत्यू म्हणजे संपणे, सर्वकाही संपले, नष्ट होणे, आपण जीवनात नसणे, पृथ्वीवरील आपले अस्तित्व संपुष्टात येणे. एकंदरीत जगणे संपले अशा प्रकारचा विचार मृत्यूबद्दल सर्वश्रुत आहे. 'शरीरान्तर्गत सर्व क्रिया बंद पडणे म्हणजे मृत्यू' अशी ढोबळ व्याख्या करता येते. परंतु या ठिकाणी चिंतनाचा विषय हा आहे की एखाद्या व्यक्तीचा जेव्हां मृत्यू होतो त्यानंतरही त्याच्या आयुष्यभरातील जगण्याच्या पद्धतीनुसार पुढे किती दिवस त्याचे नाव, कृती ,कार्य स्मरणात राहते हे त्याच्या एकंदरीत " कसा जीवन जगला " यावर अवलंबून आहे. हजारो वर्ष पूर्वीच्या पौराणिक,ऐतिहासिक अशा अनेक व्यक्तिमत्वांबद्दल आपण आजही आदरयुक्त भावनेने, सन्मानपूर्वक त्यांच्या जीवनाची चर्चा करतो आणि त्यांचे आदर्श अंगीकारावेत असा आग्रह होतो. " मरावे परी कीर्ती रुपी उरावे " ही एक अत्यंत प्रसिद्ध आणि प्रेरणादायी मराठी उक्ती आहे, जी समर्थ रामदास स्वामींनी रचली आहे. याचा अर्थ असा की, मानवी शरीर नश्वर आहे (एक दिवस सर्वांनाच मृत्यू येणार आहे), परंतु माणसाने आपल्या चांगल्या कामांद्वारे आणि विचारांद्वारे जगात अशी कीर्ती (चांगले नाव आणि यश) मागे ठेवली पाहिजे, ज्यामुळे लोक त्याला मृत्यूनंतरही कायम लक्षात ठेवतील.या उक्तीचा गाभा अथवा नश्वरता म्हणजेच शरीर हे मातीचे आहे आणि ते अटळपणे नष्ट होणार आहे. अमरत्व: माणसाच्या चांगल्या कृती, परोपकार आणि विचार हे कधीही नष्ट होत नाहीत. ते त्याच्या मृत्यूनंतरही अमर राहतात. आयुष्य किती मोठे आहे यापेक्षा ते कसे जगले आणि इतरांच्या हृदयात आपण किती चांगल्या आठवणी निर्माण केल्या, याला अधिक महत्त्व आहे. मृत्यू म्हणजे: मृत्यू म्हणजे सर्व सजीवांमध्ये अखेरीस घडणारी जीवन प्रक्रियांची संपूर्ण समाप्ती. मानवी मृत्यू नेहमीच गूढ आणि अंधश्रद्धेच्या छायेत राहिला आहे, आणि त्याची नेमकी व्याख्या संस्कृती व कायदेशीर प्रणालींनुसार भिन्न असल्याने ती वादग्रस्त राहिली आहे. मृत्यूची व्याख्या अनेक शब्दकोश मृत्यूची व्याख्या “ जीवनाचा अंत किंवा समाप्ती ” किंवा “अस्तित्वात नसणे” अशी करतात. जीवनाची व्याख्या करणे मुळातच अत्यंत कठीण असल्यामुळे आणि प्रत्येकजण ज्ञात गोष्टींच्या संदर्भातच विचार करत असल्यामुळे मृत्यूची व्याख्या करण्यातील समस्या लगेचच स्पष्ट होतात. मृत्यूविषयी सकारात्मक विचार : मृत्यू हा जीवनचक्राचाच एक भाग आहे, हे स्वीकारून आणि मान्य करून तुम्ही हे करू शकता. जेव्हां तुम्ही मृत्यूविषयी सकारात्मक विचार करता, तेव्हां तुम्ही जगावर कोणत्या प्रकारचा प्रभाव सोडू इच्छिता, यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधू शकता. तुमचा वारसा काय असावा ? याचा तुम्ही विचार करू शकता. मृत्यू हे जगातील एकमेव शाश्वत आणि अटळ सत्य मानले जाते, जे जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला कधी ना कधी स्वीकारावे लागते. हे शरीराचे नश्वरत्व अधोरेखित करते आणि शरीर केवळ काही काळासाठी " भाड्याने घेतलेले घर " असल्यासारखे असते, असे सहज बोलले जाते. अटळ सत्य: मृत्यू ही अपवित्र नसून एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. शरीराची मर्यादा: आत्मा अमर मानला जातो, परंतु शरीर मरणधर्मा आहे. भीतीचे कारण: लोक मृत्यूला घाबरतात कारण त्यामुळे ते आपल्या आवडत्या गोष्टींचा शेवट मानतात. नवीन सुरुवात: काही दृष्टिकोनातून, मृत्यू हा अंत नसून एक नवीन प्रवास किंवा परिवर्तन आहे. वर्तमान क्षण: अंतिम सत्य मृत्यू नसून, वर्तमान क्षण हाच खरा सत्य आहे, ज्याला आपण सोडून देतो. थोडक्यात, मृत्यू अटळ असला तरी, ते आपल्याला आपले आयुष्य आनंदाने आणि अर्थपूर्ण जगण्यापासून रोखत नाही. मृत्यू आणि व्यक्तिमत्त्व : (Personality) यांचा संबंध आध्यात्मिक, मनोवैज्ञानिक आणि पौराणिक दृष्टिकोनातून अत्यंत सखोल मानला जातो. मृत्यू म्हणजे केवळ शरीर सोडणे नसून, एक दीर्घ प्रवास किंवा परिवर्तन मानले जाते, ज्यामध्ये व्यक्तीचे आयुष्यभराचे कर्म आणि व्यक्तिमत्त्व महत्त्वाची भूमिका बजावतात.या विषयातील मुख्य पैलू खालीलप्रमाणे आहेत. आध्यात्मिक दृष्टिकोन : (आत्म्याची अमरता): हिंदू धर्मासह अनेक आध्यात्मिक परंपरांनुसार, आत्मा अमर आहे. शरीर नश्वर आहे आणि मृत्यू म्हणजे आत्म्याने जुने वस्त्र बदलून नवीन शरीर धारण करणे होय. कर्म आणि मृत्यूनंतरचा प्रवास: व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आणि आयुष्यभरातील कर्म हे ठरवतात की मृत्यूनंतर आत्म्याला काय गती मिळेल. अंतिम क्षणी मन शांत आणि इच्छामुक्त असेल तर मोक्ष मिळतो, अन्यथा आत्मा मोह-मायेत अडकतो. अशा धार्मिक पौराणिक संकल्पना आहेत. मृत्यूचे व्यक्तिमत्त्व (Personification): पौराणिक कथांमध्ये मृत्यूचे चित्रण 'ग्रिम रीपर' (Grim Reaper) किंवा काळाच्या रूपात केले जाते, जो आत्मा गोळा करण्यासाठी येतो.
हे एका निर्दयी पण अपरिहार्य नियमाचे प्रतीक आहे, ज्यापासून कोणीही वाचू शकत नाही. मानसशास्त्रज्ञ 'गॉर्डन ऑल्पोर्ट' (Gordon Allport) यांच्या मते: “व्यक्तिमत्त्व म्हणजे व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण आचार-विचार तथा वर्तनव्यवहार निर्धारित करणाऱ्या, तिच्या मनोदैहिक (Mind-Body) संस्थांचे गतिशील संघटन होय.” व्यक्तिमत्त्व : व्यक्तिमत्त्व म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या विचार, भावना आणि वर्तनाची अद्वितीय आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धत होय. यामध्ये व्यक्तीचे शारीरिक गुण, मानसिक क्षमता, सवयी, दृष्टिकोन आणि सामाजिक वर्तन यांचा समावेश होतो. वरील संपूर्ण विश्लेषणावरून अशा एका निर्णयापर्यंत यायला हरकत नाही की मृत्यू अटळ आहे. परंतु जगलेले जीवन जरी संपुष्टात आलेले असले तरी ते कसे जगले आहे हे मात्र नक्कीच शिल्लक उरते तेच त्याचे व्यक्तिमत्व. सदेहरुपी मनुष्य पृथ्वीवरून नाहीसा झाला,परत दिसला नाही किंवा त्याला मृत्यू आला तरी मात्र त्याच्या व्यक्तिमत्त्वाची चर्चा शिल्लक राहते ती केवळ त्याच्या जीवन जगण्यातील आदर्शांवरूनच. म्हणूनच या ठिकाणी निर्णय स्वरूपात असं म्हणता येऊ शकतं की मृत्यू हा खरोखरच अंत नाही तर व्यक्तिमत्त्वाच्या स्वरूपात व्यक्ती अमर राहतो. (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: पासपोर्ट अर्जदारांसाठी सुवर्णसंधी ८ जुलैला प्रादेशिक कार्यालयात विशेष जनसंवाद सत्र
- रत्नागिरी: रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यांत पहिले उड्डाण होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: मंचरमध्ये बनावट दुधाचा गोरखधंदा उघड; १३ जणांना अटक, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुणे: पासपोर्ट अर्जदारांसाठी सुवर्णसंधी ८ जुलैला प्रादेशिक कार्यालयात विशेष जनसंवाद सत्र
- रत्नागिरी: रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यांत पहिले उड्डाण होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
गुन्हा
- पुणे: शिक्रापूरमध्ये माजी महिला सरपंचाच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावले
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- दैनिक राशिभविष्य: आज या राशींचे नशीब फळफळणार; आर्थिक प्रगती आणि नोकरीत बढतीचे योग!
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!


























Subscribe to my channel

