चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जे विचार मांडले आहेत. ते आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूंवर आपल्या या ग्रंथामध्ये लिखाण केलं आहे. व्यक्ती आपल्या आयुष्यात दु:खी का असतो? हे सांगताना चाणक्य म्हणतात इतर कोणामुळेही नाही तर स्वत:मध्ये असलेल्या काही गोष्टींमुळे व्यक्तीच्या वाट्याला दु:ख येते. चाणक्य म्हणतात अनेकांना त्यांच्या आयुष्यात येणार्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्याची सवय असते, असे लोक समस्या सोडवण्याऐवजी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे ही समस्या सुटत नाही, व्यक्ती त्यामध्ये खोलवर गुंतला जातो आणि एक दिवस मोठ्या संकटात सापडतो. त्यामुळे चाणक्य म्हणतात समस्या कोणतीही असो, ती मुळापासून सोडवा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. तसेच आयुष्यात अशा काही गोष्टी असतात, ज्याकडे दुर्लक्ष करू नका, असंही चाणक्य यांनी म्हटलं आहे, जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?
कर्ज – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमच्यावर कर्ज असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, त्यातून पूर्णपणे मुक्त व्हा, तुम्ही जर कर्जाकडे दुर्लक्ष केलं तर ते कर्ज वाढतच जाणार आहे, एक दिवस असा येईल की तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जाल, त्यामुळे कर्जाकडे कधीही दुर्लक्ष करू नका.
रोग – चाणक्य म्हणतात माणसानं आयुष्यात कधीही रोगाकडे दुर्लक्ष करू नये, कारण रोग जेव्हा नियंत्रणात असतो, तेव्हाच त्यावर डॉक्टरांकडून उपचार केले तर तुमचा जीव वाचू शकतो, अन्यथा तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता.
शत्रू – चाणक्य म्हणतात तुम्ही शत्रूकडे कधीही दुर्लक्ष करण्याची चूक करू नका, ही चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. तुम्ही बेसावध असाल तर तुमचा शत्रू कधीही तुमचा घात करू शकतो, त्यामुळे शत्रूकडे दुर्लक्ष करू नका.
वाईट संगत – चाणक्य म्हणतात तुम्हाला जेव्हा जाणीव होईल की तुम्ही कोणच्या तरी वाईट संगतीमध्ये आहात, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका, त्यातून हातात वेळ असेपर्यंतच बाहेर पडा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




