पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:हरल्यावर काय करावे, हेही जे शिकवते ते खरे नेतृत्व

पूर्वी शिकण्याचे आणि शिकवण्याचे मार्ग वेगळे होते. आंघोळ करताना पाणी उडवणे, उशा मारणे, चादरी पांघरून एकमेकांना घाबरवणे या खेळांमागे एक मानसशास्त्र होते. कसे वार करावे, स्वतःचा बचाव कसा करावा आणि नेतृत्व कसे करावे, यात आपलेपणा होता. खेळता-खेळता आपण खूप काही शिकलो. आता तर शिकण्यालाही एक खेळ बनवले जात आहे, कारण यंत्रांचा प्रभाव वाढत आहे. हल्ली बहुतांश पालक आपल्या मुलांना एक गोष्ट शिकवू इच्छितात-नेतृत्व. पण नेतृत्वाचा अर्थ फक्त पुढे राहणे किंवा सतत वर चढणे असा नाही. खरे नेतृत्व हेही शिकवते - हरल्यावर काय करावे? आयुष्यातील आव्हानांमध्येही आपण उत्साही राहिलो, तर मोठी संकटेही सहज दूर होतील आणि आपण असे नेतृत्व करू, ज्यात जिंकलो तरी अहंकार बाळगणार नाही आणि हरलो तरी नैराश्य जवळ करणार नाही. खेळता-खेळता नेतृत्वाचे धडे श्रीरामांनी दिले होते. ते लहान भावांसोबत चेंडू खेळताना नेहमी भरताला जिंकू द्यायचे. संतांनुसार नेतृत्व म्हणजे जय आणि पराजय या दोन्हीत एकसमान राहणे.

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *