नवनीत गुर्जर यांचा स्तंभ:बंगाल विजयानंतर यूपीवरील अवलंबित्व कमी होईल

‎‎‎‎‎‎‎‎‎‎असे म्हणतात की, वाळवंटात चमकणारी वाळू पाहून‎ज्यांना तिथे पाणी असल्याचा भास होत नाही, त्यांच्या‎तहानेतच काहीतरी कमतरता असावी! भाजपसाठी‎पश्चिम बंगाल हे वर्षानुवर्षे एका राजकीय‎वाळवंटासारखे होते, पण त्यांच्या जिद्दीत कोणतीही‎कमतरता नव्हती. दूरदृष्टी आणि चोख रणनीतीमुळे‎अखेर भाजपने तिथे विजय मिळवलाच. आता‎गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत भारत "भाजपमय'''' झाला‎आहे.‎ पश्चिम बंगालमधील या विजयाने 2029 च्या‎लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा मार्ग सुकर केला‎आहे. पूर्वी असे म्हटले जायचे की, भारतीय‎राजकारणाची हवा गंगेतूनच वाहते. म्हणजेच ज्याचा‎उत्तर प्रदेश, त्याचाच देश. मग तो नेहरूंचा काळ असो‎किंवा इंदिरा गांधी आणि राजीव गांधींचा. पण‎तेव्हापासून आतापर्यंत गंगा नदीतून बरेच पाणी वाहून‎गेले आहे.‎ 2024 च्या निकालांकडे पाहिल्यास, उत्तर‎प्रदेशातील नुकसानीमुळे भाजप बहुमतापासून दूर‎राहिला होता. मात्र, आता बिहार आणि बंगालमधील ‎‎ताकदीमुळे उत्तर प्रदेशवरील भार कमी होईल. याची ‎‎कारणे स्पष्ट आहेत. ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय‎आणि त्यांचा पक्ष आता सत्तेत नसल्यामुळे विखुरला ‎‎जाईल. आर्थिक रसद कमी होईल आणि ज्या बळावर‎15 वर्षे सत्ता चालवली, ते बाहुबलही उरणार नाही. ‎‎तृणमूलची हीच कमजोरी आगामी निवडणुकीत‎भाजपला मोठ्या जागा मिळवून देईल.‎ बिहारमध्येही परिस्थिती साधारण अशीच असेल. ‎‎नितीश कुमार राज्यसभेत गेल्यावर राज्यात संयुक्त‎जनता दल (जदयू) कमकुवत होईल, ज्याचा थेट‎फायदा भाजपला मिळेल. कारण गंगा तर बिहार आणि ‎‎बंगालमध्येही वाहतेच!‎ बंगालमधील विजयामागे दीर्घकाळाची मेहनत‎आहे. रणनीती आखणे, पराभव स्वीकारणे आणि‎पुन्हा नव्या जोमाने उभे राहणे या जिद्दीमुळे हे शक्य‎झाले. गेल्या 15 वर्षांत संघ आणि भाजपच्या अनेक ‎‎कार्यकर्त्यांना हिंसेचा सामना करावा लागला, काहींना ‎‎जीवही गमवावा लागला, पण कुणीही हार मानली‎नाही. पूर्वी कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण होते, पण‎या वेळी गृहमंत्री अमित शाह यांनी पाच महिने आधीच ‎‎तयारी करून कार्यकर्त्यांमधील भीती घालवली.‎ ममता बॅनर्जींच्या दक्षिण बंगालमधील‎बालेकिल्ल्यात तृणमूलला धक्का देणे सोपे नव्हते.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎खुद्द ममता बॅनर्जींचा भवानीपूरमधून झालेला पराभव‎हा आश्चर्यापेक्षा कमी नाही. "मा, माटी, मानुष'' या‎ज्या घोषणा देऊन ममता सत्तेत आल्या होत्या, त्याच‎जनतेपासून त्या दूर गेल्या. विकास आणि लोकांच्या‎हिताऐजी कार्यकर्त्यांना मिळालेली मारहाणीची‎मोकळीक त्यांना महागात पडली.‎ भाजपच्या रणनीतीत मोठा बदल म्हणजे त्यांनी‎ममतांवर वैयक्तिक टीका टाळली. अमित शाह यांनी‎प्रशासनातील त्रुटींवर बोट ठेवले, तर पंतप्रधान नरेंद्र‎मोदींनी बंगाली संस्कृती आणि स्थानिक मुद्द्यांवर लक्ष‎केंद्रित केले.‎ हेच कारण आहे की, आज सगळीकडे झालमुरीची‎चर्चा आहे. आपल्या दणदणीत विजयाच्या आनंदातही‎भाजपने मिठाईऐवजी झालमुरी वाटली. ही झालमुरी‎म्हणजे इंदूरच्या "लाई-शेव''''चाच एक प्रकार आहे.‎उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही झालमुरी खाल्ली‎जाते, पण पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींनी एका‎दुकानावर दहा रुपये देऊन झालमुरी काय खाल्ली, ती‎संपूर्ण निवडणूक राजकारणाचे "स्टेटस सिम्बॉल''‎बनली.‎ बिहार आणि बंगालमध्ये मजबुती‎2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर‎प्रदेशात भाजपचे मोठे नुकसान झाले होते,‎त्यामुळे पक्षाला बहुमताचा आकडा गाठता‎आला नाही. मात्र, आता बिहार आणि‎बंगालमध्ये पाय घट्ट रोवल्यामुळे भाजपचे‎केवळ उत्तर प्रदेशावरील अवलंबित्व‎लक्षणीयरीत्या कमी होईल.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *