डॉ. राम चरण यांचा कॉलम:शिकणे कधी थांबवत नाहीत ‎अशाच नेत्यांचे जग असते‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎आपल्या आजूबाजूचे जग बहुतांश नेत्यांच्या अपेक्षेपेक्षा‎कितीतरी वेगाने बदलत आहे. पाच वर्षांपूर्वी ‎अस्तित्वातही नसलेले तंत्रज्ञान आज संपूर्ण उद्योगांचे‎ स्वरूप बदलत आहेत. व्यवसाय मॉडेल्स उभारण्यासाठी ‎दशके लागली. ती काही महिन्यांतच डळमळीत होत‎ आहेत. अशा परिस्थितीत एखाद्या नेत्याकडे असलेला‎ सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे अनुभव नव्हे, तर‎सातत्याने शिकत राहण्याची तयारी.‎ सहा दशकांत मी जगभरातील अनेक नेत्यांसोबत काम‎केले. काही नेते दीर्घकाळ टिकतात, मजबूत संस्था‎उभ्या करतात व अनेक दशकांपर्यंत सुसंगत राहतात.‎त्यांच्यात एक समान सवय आढळते. ते आपली‎जिज्ञासा कधीच संपुष्टात येऊ देत नाहीत. त्यांना आपण ‎‎सर्व काही जाणतो, असा कधीच भ्रम होत नाही. कारण ‎‎नेतृत्व हे एखादे अंतिम ध्येय नसून अखंड प्रवास आहे. ‎‎अलीकडच्या काळात तरुण नेत्यांसोबत चर्चा करताना‎एक महत्त्वाचा प्रश्न वारंवार समोर आला आहे—‎भरपूर संसाधने असूनही अनेक कंपन्या अपयशी का ‎‎ठरतात? याचे उत्तर जवळपास नेहमी एकच असते. ‎‎एखाद्या टप्प्यावर नेतृत्वाने शिकणे थांबवलेले असते.‎त्यांनी प्रश्न विचारणे सोडून दिलेले असते. काल यशस्वी ‎‎ठरलेले सूत्र उद्याही तितकेच परिणामकारक ठरेल, असा‎त्यांचा समज झालेला असतो. पण प्रत्यक्षात तसे कधीच‎घडत नाही. डिजिटल परिवर्तनाचे उदाहरण घ्या. अनेक‎मोठ्या कंपन्यांनी तंत्रज्ञान प्रकल्पांवर प्रचंड गुंतवणूक‎केली तरी त्या अपयशी ठरल्या. त्यामागची कारणे‎क्वचितच तांत्रिक असतात; ती मानवी असतात. बदल‎स्वीकारण्याची क्षमता नसते. मुख्य कार्यकारी‎अधिकाऱ्यांची बांधिलकी दिसून येत नाही. संस्थेने‎भावनिक व व्यावहारिक पातळीवर बदल स्वीकारलेला‎नसतो. केवळ तंत्रज्ञान कंपनी बदलू शकत नाही; ते काम‎नेतृत्व करते. एलअँडटीसारख्या कंपन्यांचे यश दाखवते‎की नेतृत्व पूर्णपणे कटिबद्ध असेल, बदल स्वीकारणे‎संस्थेच्या संस्कृतीचा भाग बनला असेल आणि संपूर्ण‎संस्था एकत्र पुढे सरकली, तर मोठे परिवर्तन शक्य होते.‎नेतृत्व म्हणजे ऊर्जाही आहे. एखाद्या एकट्या प्रतिभावान‎व्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण संघात निर्माण होणाऱ्या‎ऊर्जेची. मी पाहिलेले सर्वोत्तम नेते केवळ वर्चस्व‎गाजवत नाहीत; तर ते त्या वातावरणात ऊर्जा निर्माण‎करतात. ते आपल्या सहकाऱ्यांमधील सर्वोत्तम विचार‎बाहेर आणतात. कल्पना कुठूनही समोर येऊ शकतील,‎असे वातावरण ते तयार करतात. याच ठिकाणी मी अशा‎शिकवणीकडे येतो. माझा आता दृढ विश्वास आहे—‎बोलण्यापेक्षा ऐकणे अधिक प्रभावी असते. बहुतांश नेते‎इतरांवर प्रभाव पाडण्यात बराच वेळ घालवतात; पण‎समजून घेण्याचा प्रयत्न कमी करतात. प्रत्यक्षात खरी‎ताकद ऐकण्यात असते. आपण ऐकतो, तेव्हा ग्राहकांना‎नेमके काय हवे आहे. कर्मचारी कोणत्या अनुभवातून‎जात आहेत आणि बाजार कोणते संकेत देत आहे, हे‎समजते. पण आपण सतत बोलत राहिलो, तर‎आपल्यालाच फक्त स्वतःचा आवाज ऐकू येतो. आधी‎स्वतः समजून घ्या. मग इतरांनी आपल्याला समजून‎घ्यावे, अशी अपेक्षा ठेवा. व्यवसायविश्वात आयुष्य हे‎अनेक क्षणांची साखळी असते. काही क्षण छोटे‎असतात, तर काही आयुष्य बदलणारे ठरतात. मात्र‎त्यांच्यात एक समान गोष्ट असते— ते कोणाची वाट‎पाहत नाहीत. संकोच करणारा, पूर्ण खात्री झाल्याशिवाय‎पाऊल टाकत नाही, त्याला उशिरा का होईना हे जाणवते‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎की संधी हातातून निसटून गेली आहे.‎ मी हे अनेकदा घडताना पाहिले आहे. नोकियाच्या‎अध्यक्षांनी आयफोनचे आगमन पाहिले होते.‎त्यांच्याकडे संसाधने होती. क्षमता होती आणि बाजारात‎मजबूत स्थानही होते. तरी काहीतरी त्यांना त्या‎बदलाच्या लाटेवर स्वार होण्यापासून रोखून धरत होते.‎प्रत्येक नेत्याने स्वतःला एवढेच विचारू नये की त्याला‎संधी दिसते का; तर त्याने त्या संधीचा लाभ घेण्यासाठी‎आवश्यक सवयी, विचारसरणी व धाडस स्वतःमध्ये‎विकसित केले आहे का, हेदेखील तपासावे. याच गोष्टी‎महान नेत्यांना चांगल्या नेत्यांपेक्षा वेगळे ठरवतात.‎तुम्हाला ऊर्जा देणारी गोष्ट ओळखा व शिस्तबद्धपणे‎तिचा पाठपुरावा करा. बोलण्यापेक्षा जास्त ऐका. इतरांना‎विचारण्याची भीती वाटते असे प्रश्न विचारा. संधी समोर‎आली, तर परवानगीची वाट पाहू नका. पुढे व्हा. कारण‎कधीही शिकणे थांबवत नाहीत अशाच नेत्यांचे हे जग‎आहे.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत.)‎ तुम्हाला ऊर्जा देणारी गोष्ट ओळखा आणि ‎शिस्तीने तिचा पाठपुरावा करा. बोलण्यापेक्षा‎अधिक ऐका. इतरांना विचारण्याची भीती‎वाटते असे प्रश्न विचारा. आणि संधी समोर‎आली, तर परवानगीची वाट पाहू नका— पुढे‎व्हा.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *