11 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

आपल्या आजूबाजूचे जग बहुतांश नेत्यांच्या अपेक्षेपेक्षाकितीतरी वेगाने बदलत आहे. पाच वर्षांपूर्वी अस्तित्वातही नसलेले तंत्रज्ञान आज संपूर्ण उद्योगांचे स्वरूप बदलत आहेत. व्यवसाय मॉडेल्स उभारण्यासाठी दशके लागली. ती काही महिन्यांतच डळमळीत होत आहेत. अशा परिस्थितीत एखाद्या नेत्याकडे असलेला सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे अनुभव नव्हे, तरसातत्याने शिकत राहण्याची तयारी.
सहा दशकांत मी जगभरातील अनेक नेत्यांसोबत कामकेले. काही नेते दीर्घकाळ टिकतात, मजबूत संस्थाउभ्या करतात व अनेक दशकांपर्यंत सुसंगत राहतात.त्यांच्यात एक समान सवय आढळते. ते आपलीजिज्ञासा कधीच संपुष्टात येऊ देत नाहीत. त्यांना आपण सर्व काही जाणतो, असा कधीच भ्रम होत नाही. कारण नेतृत्व हे एखादे अंतिम ध्येय नसून अखंड प्रवास आहे. अलीकडच्या काळात तरुण नेत्यांसोबत चर्चा करतानाएक महत्त्वाचा प्रश्न वारंवार समोर आला आहे—भरपूर संसाधने असूनही अनेक कंपन्या अपयशी का ठरतात? याचे उत्तर जवळपास नेहमी एकच असते. एखाद्या टप्प्यावर नेतृत्वाने शिकणे थांबवलेले असते.त्यांनी प्रश्न विचारणे सोडून दिलेले असते. काल यशस्वी ठरलेले सूत्र उद्याही तितकेच परिणामकारक ठरेल, असात्यांचा समज झालेला असतो. पण प्रत्यक्षात तसे कधीचघडत नाही. डिजिटल परिवर्तनाचे उदाहरण घ्या. अनेकमोठ्या कंपन्यांनी तंत्रज्ञान प्रकल्पांवर प्रचंड गुंतवणूककेली तरी त्या अपयशी ठरल्या. त्यामागची कारणेक्वचितच तांत्रिक असतात; ती मानवी असतात. बदलस्वीकारण्याची क्षमता नसते. मुख्य कार्यकारीअधिकाऱ्यांची बांधिलकी दिसून येत नाही. संस्थेनेभावनिक व व्यावहारिक पातळीवर बदल स्वीकारलेलानसतो. केवळ तंत्रज्ञान कंपनी बदलू शकत नाही; ते कामनेतृत्व करते. एलअँडटीसारख्या कंपन्यांचे यश दाखवतेकी नेतृत्व पूर्णपणे कटिबद्ध असेल, बदल स्वीकारणेसंस्थेच्या संस्कृतीचा भाग बनला असेल आणि संपूर्णसंस्था एकत्र पुढे सरकली, तर मोठे परिवर्तन शक्य होते.नेतृत्व म्हणजे ऊर्जाही आहे. एखाद्या एकट्या प्रतिभावानव्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण संघात निर्माण होणाऱ्याऊर्जेची. मी पाहिलेले सर्वोत्तम नेते केवळ वर्चस्वगाजवत नाहीत; तर ते त्या वातावरणात ऊर्जा निर्माणकरतात. ते आपल्या सहकाऱ्यांमधील सर्वोत्तम विचारबाहेर आणतात. कल्पना कुठूनही समोर येऊ शकतील,असे वातावरण ते तयार करतात. याच ठिकाणी मी अशाशिकवणीकडे येतो. माझा आता दृढ विश्वास आहे—बोलण्यापेक्षा ऐकणे अधिक प्रभावी असते. बहुतांश नेतेइतरांवर प्रभाव पाडण्यात बराच वेळ घालवतात; पणसमजून घेण्याचा प्रयत्न कमी करतात. प्रत्यक्षात खरीताकद ऐकण्यात असते. आपण ऐकतो, तेव्हा ग्राहकांनानेमके काय हवे आहे. कर्मचारी कोणत्या अनुभवातूनजात आहेत आणि बाजार कोणते संकेत देत आहे, हेसमजते. पण आपण सतत बोलत राहिलो, तरआपल्यालाच फक्त स्वतःचा आवाज ऐकू येतो. आधीस्वतः समजून घ्या. मग इतरांनी आपल्याला समजूनघ्यावे, अशी अपेक्षा ठेवा. व्यवसायविश्वात आयुष्य हेअनेक क्षणांची साखळी असते. काही क्षण छोटेअसतात, तर काही आयुष्य बदलणारे ठरतात. मात्रत्यांच्यात एक समान गोष्ट असते— ते कोणाची वाटपाहत नाहीत. संकोच करणारा, पूर्ण खात्री झाल्याशिवायपाऊल टाकत नाही, त्याला उशिरा का होईना हे जाणवतेकी संधी हातातून निसटून गेली आहे.
मी हे अनेकदा घडताना पाहिले आहे. नोकियाच्याअध्यक्षांनी आयफोनचे आगमन पाहिले होते.त्यांच्याकडे संसाधने होती. क्षमता होती आणि बाजारातमजबूत स्थानही होते. तरी काहीतरी त्यांना त्याबदलाच्या लाटेवर स्वार होण्यापासून रोखून धरत होते.प्रत्येक नेत्याने स्वतःला एवढेच विचारू नये की त्यालासंधी दिसते का; तर त्याने त्या संधीचा लाभ घेण्यासाठीआवश्यक सवयी, विचारसरणी व धाडस स्वतःमध्येविकसित केले आहे का, हेदेखील तपासावे. याच गोष्टीमहान नेत्यांना चांगल्या नेत्यांपेक्षा वेगळे ठरवतात.तुम्हाला ऊर्जा देणारी गोष्ट ओळखा व शिस्तबद्धपणेतिचा पाठपुरावा करा. बोलण्यापेक्षा जास्त ऐका. इतरांनाविचारण्याची भीती वाटते असे प्रश्न विचारा. संधी समोरआली, तर परवानगीची वाट पाहू नका. पुढे व्हा. कारणकधीही शिकणे थांबवत नाहीत अशाच नेत्यांचे हे जगआहे. (हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत.)

तुम्हाला ऊर्जा देणारी गोष्ट ओळखा आणि शिस्तीने तिचा पाठपुरावा करा. बोलण्यापेक्षाअधिक ऐका. इतरांना विचारण्याची भीतीवाटते असे प्रश्न विचारा. आणि संधी समोरआली, तर परवानगीची वाट पाहू नका— पुढेव्हा.

This post was originally published on this site.
शहर
- नवी दिल्ली: प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेला तरुण सकाळी मृतावस्थेत! गूढ मृत्यूमागचं कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू
- सिंधुदुर्ग: श्रीराम मंदिर दानपेटी प्रकरणी दोडामार्गात ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह; काँग्रेसकडून निषेध
- छत्रपती संभाजीनगर: लग्नानंतर नववधूचे जुने फोटो व्हायरल, कुटुंबाला धमक्या; सायबर छळ प्रकरणाची चौकशी सुरू
- रुग्णांसाठी आनंदाची बातमी! महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोठा बदल, आता 'पीईटी स्कॅन' होणार मोफत
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: लग्नानंतर नववधूचे जुने फोटो व्हायरल, कुटुंबाला धमक्या; सायबर छळ प्रकरणाची चौकशी सुरू
- रुग्णांसाठी आनंदाची बातमी! महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोठा बदल, आता 'पीईटी स्कॅन' होणार मोफत
- ऐतिहासिक साटवली गढीचे बदलणार भाग्य! राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा
- पुणे: गोठ्यातील दूध काढण्याचे मशीन ठरलं जीवघेणं! विजेच्या धक्क्याने आंबेगावातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
गुन्हा
- कोल्हापूर: अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आईसह तिघे अटकेत; हतकणंगलेतील संतापजनक घटना
- मुंबई: तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएची धडक कारवाई; दहिसरमध्ये एक जण अटकेत
- मुंबई: "आता ती कुठे गेली?" पावसाळ्यातील दुर्दैवी घटनांवरून राज ठाकरेंचा आरजे मलिष्कावर सवाल!
- पुणे: बारामती पोलीस भरतीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
मनोरंजन
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेला तरुण सकाळी मृतावस्थेत! गूढ मृत्यूमागचं कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू
- पालघरमध्ये रात्रीची धावपळ! दुर्वेस गावात घरात शिरला १५ किलो वजनाचा १० फुटांचा अजगर; वनविभागाकडून सुखरूप सुटका
- रायसेनमध्ये भीषण थरार! तरुणाने केली तरुणीची हत्या आणि त्यानंतर स्वतः संपवले आयुष्य; पोलीस तपास सुरू
- कर्नाटक: ₹20 च्या दंडाची मोठी किंमत! गृहपाठ न केल्याने आठवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न


























Subscribe to my channel


