शीला भट्ट यांचा कॉलम:आईच्या हाताची जेवणाची चव‎कधीही विसरता येत नाही!‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎मला माझ्यासाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी स्वतः‎स्वयंपाक करण्याची वेळ क्वचित आली आहे. भारतीय‎समाजात महिलेसाठी ही अत्यंत दुर्मीळ बाब मानली‎जाईल. त्या अर्थाने मी विशेषाधिकार लाभलेली आहे.‎माझे दिवंगत पती व प्रसिद्ध पत्रकार-लेखक कांती भट्ट‎यांना स्वयंपाक करता येत असे. त्यांना त्यांच्या‎आवडीचे ‘कच्चा-पक्का जेवण’ खायचे असे, तेव्हा ते‎स्वतःसाठी स्वयंपाक करत. त्यांच्या हातची दुधी‎भोपळ्याची भाजी चांगली झाल्यास त्या आनंदाला ‎‎वाचकांना सांगितल्याशिवाय त्यांना राहवत नसे. दुसऱ्या ‎‎दिवशीच्या त्यांच्या दैनिक स्तंभात त्याचा उल्लेख‎हमखास असे. ते अन्नाकडे नेहमी व्यापक दृष्टिकोनातून ‎‎पाहत असत.‎ हे थोडे विचित्र वाटू शकते. पण रोजचे जेवण मेहनत न ‎‎करता ताटात मिळणे म्हणजे समाधानाची हमी नाही. ‎‎विशेषतः ऑनलाइन अन्न मागवून देणारे ॲप्स‎आल्यापासून मला अधिक जाणवू लागले आहे की‎स्वतः स्वयंपाक करण्यात किंवा प्रियजनांसाठी जेवण ‎‎बनवण्यात एक विलक्षण सौंदर्य असते. मी या ॲप्सचा‎वापर करते, तितकी घरच्या जेवणाची किंमत अधिक‎जाणवते. आणि अर्थातच आपण सर्वजण आपल्या‎आईच्या हातच्या जेवणाचे चाहते असतो. माझ्याही‎मनात आईच्या हातच्या जेवणाच्या असंख्य‎अविस्मरणीय आठवणी आहेत. गेल्या चार दशकांत मी‎माझ्या जेवणाबाबत कधीच पूर्णपणे समाधानी राहिले‎नाही. याचे मोठे कारण म्हणजे माझी आई अप्रतिम‎स्वयंपाकी होती. लग्नानंतर तिच्या हातच्या चविष्ट‎पदार्थांना मी कधीच विसरू शकले नाही. 1979 मध्ये‎म्हणजे तब्बल 47 वर्षांपूर्वी मी आईचे घर सोडले. पण‎तिच्या हातच्या अन्नाची चव आजही जिभेवर रेंगाळते.‎या भावनेचे शास्त्रीय विश्लेषण करण्याइतकी माझ्याकडे‎क्षमता नाही. पण त्या चवीची आठवण आजही डोळे‎पाणावून का टाकते, हे मला माहीत आहे. माझा ठाम‎विश्वास आहे की आई स्वयंपाक करताना त्यात आपले‎संपूर्ण मन ओतते. तिचे मन सतत विचार करत असे‎आणि तिचे हात असे काहीतरी बनवत असत की कठीण‎प्रसंगातही मनाला दिलासा मिळे. मी खट्टू झाले की आई‎माझ्या आवडीचे दहीवडे बनवत. हसऱ्या चेहऱ्याने‎माझ्यासमोर वाढत असे. आयुष्याच्या अशा टप्प्यावर मी‎आहे. येथे मला आवडती कार किंवा कपडे विकत न‎घेतल्याची खंत नाही. पण आईला ‘मेथी नुं वेषण’ कसे‎बनवायचे, हे मी कधी विचारले नाही, याची खोल खंत‎आहे. आई ताजी मेथीची पाने बेसनाच्या पिठासोबत‎शिजवत असे. कधी ती कोरडी भाजी बनवत असे, तर‎कधी त्यात ताक घालत असे. हिंग आणि मोहरीच्या‎बारीक फोडणीने ती मेथीची चव अप्रतिम संतुलित करत‎असे. एकदा माझ्या पतींनी एक खंत व्यक्त केली होती.‎ माझे व आईचे नाते परिपक्व आहे. तितके आम्हा‎पती-पत्नीचे होऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले होते.‎मी त्यांना विचारले, ‘का?’ त्यावर कांती म्हणाले,‎‘कारण तिच्या हातच्या जेवणाने तुला तिच्याशी घट्ट‎बांधून ठेवले आहे.’ आईच्या हातच्या पोळ्यांचे वर्णन‎करायचे झाले तर तिने गुजराती रोटली बनवण्याच्या‎कलेत पूर्ण प्रावीण्य मिळवले होते. ती नेहमी गव्हाची‎पोळी बनवत असे. मऊसर कणकेचा गोळा तिच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎लाटण्याखाली एका ठरावीक लयीत गोल फिरत असे.‎तिचे ते भांडे नेहमी चुलीजवळच ठेवलेले असे.‎मुंबईतील तिच्या स्वयंपाकघरात तब्बल ५५ वर्षांत त्या‎पात्राची जागा कधी बदलली नाही. तव्यावर भाजली की‎पोळी अगदी परिपूर्ण गोल आकारात फुलत असे.‎ रेशमासारखी मऊ, तोंडात टाकताच विरघळणारी.‎तिच्या पोळ्या कागदाइतक्या पातळ असत. आईच्या‎हाताच्या स्पर्शाशिवाय कोणतेही जेवण माझ्यासाठी‎दहापैकी दहा गुणांचे ठरले नाही. लग्नानंतर मी रोज‎तिच्या हातच्या जेवणापासून दूर असल्याचे दुःख तिला‎पूर्णपणे समजत होते. तिच्या पोळ्यांनी माझे खूप लाड‎केले होते. एकदा तिने मला सल्ला दिला की माझ्या‎पंजाबी घरमालकीणीला तिच्यासारख्या पोळ्या‎बनवायला सांग. त्यावर मी आईला म्हणाले, ‘मी त्यांना‎कसे सांगू की मला पोळी खायला आवडते. जाडसर‎पोळी नाही!‎ (हे लेखिकेचे वैयक्तिक विचार आहेत.)‎ लग्नानंतरही मी आईने बनवलेले गुजराती‎पदार्थ, त्यांची चव व तिच्या हातची पोळी‎कधीच विसरू शकले नाही. आईच्या‎हातच्या अन्नाची ही ओढ भारतात काही‎असामान्य नाही. बहुतांश मुलांसाठी‎आईचे जेवण हेच पाककलेचे सर्वोच्च‎मापदंड असते.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *