तुम्ही अनेकदा चित्रपटांच्या कथांमध्ये पाहिले असेल की, बऱ्याच वर्षांनंतर दोन भावांची भेट होते. त्यानंतर सर्वांच्या डोळ्यात पाणी येते. मात्र अशी घटना प्रत्यक्षात बुलढाण्यातील खामगावमध्ये घडली आहे. बुलढाण्यात दोन भाऊ तब्बल 55 वर्षांनी एकमेकांना भेटले आहेत. या घटनेनंतर नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी आल्याचे पहायला मिळाले. ही घटना नेमकी काय आहे? हे दोन भाऊ नेमके कसे भेटले याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
वयाच्या 15 व्या वर्षी घर सोडून गेलेला व्यक्ती परतला
जर एखादा व्यक्ती 55 पूर्वी घर सोडून गेलेला असेल तर तो पुन्हा सापडण्याची शक्यता जवळपास नसतेच. मात्र बुलढाण्यातील खामगावमध्ये अशी घटने घडली आहे. ही घटना म्हणजे एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी खरी कहाणी आहे. केरळ राज्यातील त्रिचूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला हा व्यक्ती वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी घरातील वादामुळे रागाच्या भरात घर सोडून निघून गेला होता. त्यानंतर तो केरळमध्ये मिळेल ते काम करत राहिला.
केरळमध्ये 55 वर्षे केले काम
तब्बल 55 वर्षे केरळमध्ये काम केले, विशेष म्हणजे, आपल्या कष्टाची कमाई तो स्वतःसाठी न वापरता अनाथाश्रमाला दान करत होता. आयुष्यभर परक्यांसाठी जगणारा हा माणूस मात्र स्वतःच्या नात्यांपासून दूर राहिला. वय वाढत गेले, शरीर थकत गेले आणि आपल्याला सांभाळणारा कोणीच नाही, ही जाणीव बोचू लागली. त्याच भावनेतून तो केरळहून रेल्वेने मुंबईच्या दिशेने निघाला. आता आपले नातेवाईक आपल्याला भेटणारच नाही, या विवांचनेत प्रवासादरम्यान नांदुरा रेल्वे स्टेशनच्या पुढे गाडी निघाल्यानंतर त्याने गाडीतून अचानक उडी मारली. या घटनेत तो रेल्वे ट्रॅकवर पडला आणि गंभीर जखमी झाला.
नातेवाईकांच्या डोळ्यात अश्रु
या घटनेची माहिकी मिळाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याला सामान्य रुग्णालयात भरती केले. पाच दिवसांनंतर हा व्यक्ती शुद्धीवर आला. त्यानंतर रमेश अवचार या कर्मचाऱ्याने या व्यक्तीची विचारपूस केली. अधिक माहिती काढल्यानंतर या व्यक्तीच्या नातेवाईकांचा फोन नंबर मिळवला. त्यानंतर नातेवाईकांना रुग्णालयात बोलावले आणि त्यांची भेट घालून दिली. यावेळी रुग्णाच्या भावाच्या आणि नातेवाईकांच्या डोळ्यात यावेळी अश्रू तरळले होते. तब्बल 55 वर्षांनंतर आपला भाऊ पुन्हा भेटेल असं या दोघांनाही वाटलं नव्हतं. मात्र आता हे दोघे पुन्हा एकमेकांना भेटले आहेत.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




