आपल्यापैकी अनेकांनी वैद्यकीय परिस्थितीवर आधारित एखादा चित्रपट किंवा मालिका नक्कीच पाहिली असेल. यात बाळंतपणानंतर स्त्रीला अचानक ‘पोस्टपार्टम हॅमरेज’ (पीपीएच) होतो. म्हणजेच प्रचंड रक्तस्राव सुरू होतो. ही स्थिती जीवघेणी ठरू शकते. ‘ग्राम चिकित्सालय’ ही अशीच एक मालिका आहे. या मालिकेत प्रभात नावाचा एक तरुण, हुशार व ध्येयवादी डॉक्टर झारखंडमधील ‘भटकंडी’ या दुर्गम उपेक्षित प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी स्वीकारतो. तेथे गरजेचे बदल घडवून आणण्यासाठी तो ठाम असतो. पण इतर काही बदलण्यापूर्वी त्याला आधी स्वतःमध्येच बदल करावा लागेल याची जाणीव त्याला तिथे होते. अशा मालिकांमध्ये कलाकार दिग्दर्शकाने सांगितलेली भूमिका वठवतात आणि लेखकाने लिहून दिलेले संवाद बोलतात. आपल्यासमोर अशी काही परिस्थिती आली तर आपणही तसेच वागू, अशी आपलीही इच्छा असते. पण महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील ‘घोडनकप्पी’ या दूरवरच्या आदिवासी पाड्यातील तुळशीराम गेडाम या रहिवाशाने केलेल्या गोष्टीचा विचार कोणत्याही लेखकाने किंवा दिग्दर्शकाने कधी पडद्यावर दाखवण्यासाठी केला नसेल. यालाच एका तरुण बापाचे ‘खरे शहाणपण’ म्हणतात. शहाणपण ही नेहमी वयानुसारच येते असे नाही, हेच त्यांनी सिद्ध केले. अनेकदा ही परिपक्वता खोल आघात झाल्यावर येते. यातून माणसाचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. 14 जून रोजी गरोदरपणाच्या 33 व्या आठवड्यात (सामान्यपणे बाळंतपण 40 व्या आठवड्यात होते) तुळशीराम यांच्या 25 वर्षांच्या पत्नी संगीता यांनी घरीच एका बाळाला जन्म दिला. त्यानंतर त्यांना पीपीएचचा त्रास सुरू झाला. कुटुंबाने तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधला. जिथपर्यंत पोहोचणे शक्य होते तिथपर्यंत म्हणजेच गावाजवळील टेकडीपर्यंत तातडीने रुग्णवाहिका पाठवण्यात आली. नातेवाईक त्या महिलेला घेऊन खडतर रस्त्यांवरून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचण्यासाठी धडपडत राहिले. या संघर्षात वैद्यकीय भाषेत ज्याला ‘गोल्डन अवर’ म्हणतात, तो अत्यंत महत्त्वाचा वेळ निघून गेला. संगीता यांच्यावर उपचार सुरू होण्यापूर्वीच प्रचंड रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. सुमारे 2.2 किलो वजनाच्या नवजात बाळाची प्रकृती मात्र स्थिर असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रसंगी अनेक लोक तिथेच थांबले असते. काहींनी सरकारला दोष दिला असता. काहींनी विरोध केला असता, काहींनी भरपाई मागितली असती. काही जण स्वाभाविकपणे दुःखात बुडून घरी निघून गेले असते. पण तुळशीराम यांनी एक वेगळा आणि अत्यंत कठीण मार्ग निवडला. आपल्या कुटुंबावर आलेली वेळ इतर कोणत्याही कुटुंबावर येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो, असा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला. हा विचार अत्यंत खोल आहे. आपले वैयक्तिक दुःख समाजाच्या भल्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी एका विशेष परिपक्वतेची गरज असते. जेव्हा हे दुःख सहन करणारी व्यक्ती खूप तरुण असते तेव्हा ही गोष्ट अधिक कौतुकास्पद ठरते. तुळशीराम यांच्याकडे वेळेची अनुकूलता नाही. आरामदायी आयुष्य नव्हते. त्यांना दोन लहान मुलांचा सांभाळ करायचा आहे. शिवाय अशी जबाबदारी वाटून घेणाऱ्या जोडीदाराला त्यांनी गमावले आहे. दुःखात बुडून राहण्यासाठी त्यांच्याकडे प्रत्येक कारण उपलब्ध आहे. पण असे असूनही त्यांनी इतर कोणाच्या तरी पत्नीचा, कोणाच्या तरी बाळाचा आणि कोणाच्या तरी आपत्कालीन परिस्थितीचा विचार करण्यास सुरुवात केली. खरे शहाणपण इथूनच सुरू होते. रस्ता हा केवळ एक रस्ता नसतो हे तुळशीराम यांच्या लक्षात आले. घोडनकप्पी येथील 20 कुटुंबांसाठी हा रस्ता रुग्णालयापर्यंत पोहोचण्याचे एक माध्यम आहे. हा रस्ता एखाद्या गरोदर महिलेची सुरक्षा आहे. एखाद्या मुलाचा शाळेचा मार्ग आहे आणि एखाद्या वृद्धाचा स्वाभिमान आहे. आपत्कालीन परिस्थिती आणि दुर्दैवी अपघात यातील फरक म्हणजे हा रस्ता आहे. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने मुख्य रस्त्यापर्यंत 1.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम सुरू केले. स्वेच्छेने केलेल्या श्रमदानातून 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून हे काम सुरू झाले. आता रस्त्याचे निम्मे काम पूर्ण झाले आहे. फंडा असा की- आपण अनेकदा शहाणपणाचा संबंध पांढरे झालेले केस, अनेक वर्षांचा अनुभव आणि आयुष्याबद्दलची भाषणे यांच्याशी जोडतो. पण कदाचित शहाणपण यापेक्षा खूप सोपे असते. स्वतःच्या दुःखातून शिकणे आणि तेच दुःख दुसऱ्या कुणाच्या नशिबी येऊ नये याची काळजी घेणे म्हणजेच खरे शहाणपण होय.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- मुंबई: तुमची समाजाला गरज आहे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रुग्णालयात जाऊन अण्णा हजारेंची भेट, तब्येतीची केली विचारपूस
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
महाराष्ट्र
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- मुंबई: तुमची समाजाला गरज आहे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रुग्णालयात जाऊन अण्णा हजारेंची भेट, तब्येतीची केली विचारपूस
- बीड: चोरीसाठी थेट १९०० किमीचा प्रवास! बीडच्या आष्टी पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई, हरियाणामधील कुख्यात जनावरे चोरांची टोळी जेरबंद!
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
गुन्हा
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा
- गोवा: देशातील ड्रग्ज नेटवर्कचा समूळ नायनाट करणार; गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा, तीन वर्षांचा रोडमॅप जाहीर
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
























Subscribe to my channel



