शुक्रवारी बहुतांश आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर अव्वल मानांकित जानिक सिनरचा फोटो छापून आला होता, ज्याला फ्रेंच ओपन जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानले जात होते. पण याचे कारण त्याने आदल्या दिवशी कोणताही सामना जिंकला होता असे नव्हते, तर तो जागतिक क्रमवारीत 56 व्या स्थानावर असलेल्या हुआन मॅन्युएल सेरुंडोलोकडून हरला होता, हे होते. बहुतांश वृत्तपत्रांनी त्याच्या पराभवाचे कारण असे सांगितले की, “कडक उन्हाने फिलिप-शात्रिये कोर्टला एका मोठ्या भट्टीमध्ये बदलले होते आणि सिनरची अवस्था इतकी बिघडली होती की त्याला ओळखणेही कठीण झाले होते.’ सामन्यानंतर सिनर म्हणाला, “मला आठवत नाही की शेवटच्या वेळी मला कधी इतका अशक्तपणा जाणवला होता. मी पूर्णपणे थकून गेलो होतो- माझे संपूर्ण शरीर साथ सोडत होते.’ बहुतांश वृत्तपत्रे आणि क्रीडा पत्रकारांनी त्याच्या पराभवाला भीषण उकाड्यालाच जबाबदार धरले. वास्तविक, जगातील नंबर एक खेळाडू तिसऱ्या सेटमध्ये विजयापासून केवळ एक गेम दूर होता व नेमक्या त्याच वेळी उष्णतेने त्याची सर्व ऊर्जा शोषून घेतली. हे वाचताच मला काही विद्यापीठातील प्राध्यापिका व शाळेतील शिक्षिकांची आठवण आली, ज्या सतत सांगत असतात की दिवसभराचे व्यावसायिक काम पूर्ण करून जेव्हा त्या आपली “सेकंड शिफ्ट’ करण्यासाठी घरी परततात, तेव्हा उकाडा व थकवा त्यांची सर्व ऊर्जा शोषून घेतो. हे असे काम आहे, ज्यामध्ये कोणतीही सुट्टी मिळत नाही. त्यांचे म्हणणे होते की त्या रोज या दबावाखाली गलितगात्र होतात. त्यांचा थकवा समजून घेणारे किंवा वाटून घेणारे कुणीही नसते. आणि त्या अगदी बरोबर होत्या. अनेक सनातनी किंवा पारंपरिक कुटुंबे अभिमानाने नोकरदार सुनेचा स्वीकार तर करतात, परंतु त्याचे प्रमुख कारण बहुधा तिच्याकडून मिळणारा आर्थिक लाभ किंवा सामाजिक प्रतिष्ठा असते. पण ही स्वीकृती अनेकदा अटींसह येते. मूळ धारणा हीच कायम राहते की तिच्या नोकरीमुळे पारंपरिक घरगुती रचना किंवा कुटुंबाच्या सोयी-सुविधांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये. समाज आणि मीडियाने निर्माण केलेल्या सुपरवुमनच्या मिथकाने आदर्श भारतीय महिलेचा एक अवास्तव निकष प्रस्थापित केला आहे, जी जणूकाही कोणत्याही अडचणीशिवाय सर्वकाही साध्य करू शकते. जर त्यांनी मदत मागितली, घरगुती काम कोणाशी तरी वाटून घेण्याचा प्रयत्न केला किंवा आपला थकवा व्यक्त केला, तर बहुधा याकडे त्यांचे अपयश किंवा कुटुंबाप्रति समर्पणाचा अभाव म्हणून पाहिले जाते. ज्याप्रमाणे एखादा जगातील नंबर एक खेळाडू भीषण उकाड्यात नेहमीच जिंकू शकत नाही, त्याचप्रमाणे या तरुण महिलांकडून ही अपेक्षा करणेही अवास्तव आहे की त्यांनी एका आधुनिक व्यावसायिकाप्रमाणे कमवावे आणि एका पारंपरिक गृहिणीप्रमाणे सेवाही करावी. जेव्हा या नोकरदार महिला स्वयंपाकी, स्वच्छता कर्मचारी किंवा आया यांसारख्या घरगुती मदतनीसांची नियुक्ती करून वेळेअभावी निर्माण होणाऱ्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना अनेकदा विरोध किंवा टीकेचा सामना करावा लागतो. कुटुंबातील सदस्य बाहेरील मदतनीसांनी केलेल्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करू शकतात, त्यात अतिरिक्त हस्तक्षेप करू शकतात किंवा नोकरदार महिलांना अप्रत्यक्षपणे असे संकेत देऊन त्यांच्यात अपराधीपणाची भावना निर्माण करू शकतात की त्यांच्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत आहे किंवा कुटुंब परक्यांच्या हातचे अन्न खात आहे. दुसरीकडे- विशेषतः विकसित होणाऱ्या शहरांच्या टाऊनशिपमध्ये राहणारे काही ज्येष्ठ सदस्य- जे लिंगभेदाच्या कठोर भूमिका असलेल्या युगात लहानाचे मोठे झाले आहेत, ते अनेकदा त्याच पद्धती पुढे चालवतात, ज्या त्यांनी स्वतः सहन केल्या होत्या. जर सासूने तिच्या काळात संपूर्ण घर एकटीने सांभाळले असेल, तर अशा कुटुंबांमध्ये नवीन सुनांनी केलेल्या कामाच्या वाटणीच्या मागणीला काही वेळा अधिकाराची जाणीव किंवा आळस म्हणून पाहिले जाते. याशिवाय, कुटुंबाच्या सत्ता-रचना देखील एखाद्या नवीन सुनेसाठी घरगुती कामाच्या जबाबदाऱ्या सांभाळणे खूप कठीण बनवतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून पुरेशा विश्रांती किंवा सहकार्याशिवाय दोन फुल-टाइम भूमिकांमध्ये सलग उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा केली जाते, तेव्हा त्याचा परिणाम मानसिक व भावनिक थकव्याच्या स्वरूपात समोर येतो. अशा महिला एका निरंतर “ऑलवेज-ऑन’ अवस्थेत जगतात, जिथे त्यांना खऱ्या अर्थाने विश्रांती घेण्याची फारच कमी संधी मिळते. त्यांचे मन सतत एका मानसिक चेकलिस्टचे व्यवस्थापन करत असते- ऑफिसच्या डेडलाइन्ससोबतच घराच्या गरजा- जसे की किराणा सामान, मुलांची काळजी व जेवणाचे नियोजन. हळूहळू ही स्थिती एका टाइम-डिसीजचे रूप धारण करते, जी वास्तविक या मानसिक जाणिवेला दर्शवते की वेळ कधीही पुरेशी नसते. याचा परिणाम सततची धावपळ, अतिरिक्त सतर्कता व फावल्या वेळातही विश्रांती न घेऊ शकण्याच्या स्वरूपात समोर येतो. नोकरदार महिलांवर पडणारे हे दुहेरी ओझे कमी करण्यासाठी घरगुती स्तरावर तातडीचे बदल, जोडीदाराचे सहकार्य व कुटुंबांच्या संवाद साधण्याच्या पद्धतीत बदल - या तिन्हींची आवश्यकता आहे. फंडा हा आहे की जसे क्रीडा विश्व आपल्या चॅम्पियनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते, तसेच आपणही आपल्या सुनांच्या पाठीशी उभे राहायला हवे- कारण त्याही आपल्या मुलीच आहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




