उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या अपघाताबाबत आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले आहे. हा केवळ अपघात नसून एक मोठा घातपात असू शकतो, असा खळबळजनक संशय नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची मागणी केली आहे.
नाना पटोले यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी या घटनेतील तांत्रिक बाबींवर बोट ठेवले आहे. विमानाचा अपघात झाला की घातपात, हे स्पष्ट करण्यासाठी ब्लॅक बॉक्सची सखोल चौकशी होणे अनिवार्य आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा की, ऐनवेळी विमानाचा पायलट का बदलला गेला? कोणाच्या सांगण्यावरून हा बदल झाला आणि नवीन पायलटची पार्श्वभूमी काय होती? याची पारदर्शक चौकशी झाल्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.
केंद्र सरकारची ही परंपराच झाली
संबंधित विमान कंपनीचा मालक रोहित सिंग हा अपघातानंतर लगेच परदेशात पळाला आहे. जर काहीच लपवण्यासारखे नसेल, तर तो देश सोडून का गेला? त्याला तातडीने भारतात खेचून आणून त्याची कडक चौकशी झाली पाहिजे. केंद्र सरकारची ही परंपराच झाली आहे की, मोठ्या गुन्ह्यातील आरोपींना परदेशात पळू द्यायचे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला अभय द्यायचे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावर बोलतानाही नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्रातील तपास यंत्रणांवर आता कोणाचाही विश्वास उरलेला नाही. गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या विमान अपघाताचा तपास अजूनही जनतेसमोर आलेला नाही. गोव्यातील क्लबमधील स्फोटाचा मालकही परदेशात पळाला, पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असा दावाही नाना पटोले यांनी केला आहे.
राजकीय स्वार्थासाठी त्यांना विलग ठेवलं जातंय
यावेळी नाना पटोले यांनी पवार कुटुंबातील अंतर्गत वादावर भाष्य करताना एक महत्त्वपूर्ण विधान केले. पवार कुटुंब एकत्र आले पाहिजे, ही आमची आणि काँग्रेसची कायमची भूमिका आहे. परंतु, दिल्लीत बसलेले सत्ताधारी नेते या कुटुंबाला एकत्र येऊ देत नाहीत. त्यांच्यात जाणीवपूर्वक फूट पाडली जात आहे. कुटुंबात वाद नसावा हीच संस्कृती आहे, पण राजकीय स्वार्थासाठी त्यांना विलग ठेवले जात आहे, असे नाना पटोले म्हणाले.
हे सरकार विशिष्ट समाजाप्रती द्वेष दाखवतंय
हे सरकार पूर्णपणे द्वेषपूर्ण भावनेतून चालवले जात आहे. घटनात्मक पदावर बसताना कोणाबाबतही ममत्व किंवा द्वेष ठेवणार नाही अशी शपथ घेतली जाते. मात्र, मुस्लिम आरक्षणासारख्या मुद्द्यांवरून हे सरकार विशिष्ट समाजाप्रती द्वेष दाखवत आहे, हे दुर्दैवी आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितलं.
[embedded content]
शहर
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
महाराष्ट्र
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


