सोलापूर:शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. वाहतूक शाखेच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी पोलिस उपायुक्त (वाहतूक) वृष्टी जैन यांनी ट्रॅफिक पोलिसांना ड्युटीदरम्यान नेमून दिलेल्या ठिकाणीच उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. याचबरोबर HSRP(High Security Registration Plate) नसलेल्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (RTO) कठोर कारवाई करण्यात येणार असून रिक्षाचालकांसाठी ड्रेसकोडही सक्तीचा करण्यात आला आहे.
१८ ब्लॅकस्पॉटवर विशेष लक्ष सोलापूर शहरात अपघातप्रवण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १८ ब्लॅकस्पॉटची ओळख पटविण्यात आली आहे. या ठिकाणी कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेत अपघात अधिक होतात, त्यामागील कारणांचा सखोल अभ्यास सुरू आहे. या अभ्यासाच्या आधारे अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासाठी आयआयटी मद्रासच्या तज्ज्ञांच्या सहकार्याने वाहतूक पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे, जेणेकरून अपघातांचे प्रमाण आणखी कमी करता येईल.
अपघातांमध्ये घट
मागील वर्षी जून महिन्यात नऊ गंभीर अपघातांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र यावर्षी जून महिन्यात गंभीर अपघात आणि अपघाती मृत्यूंच्या संख्येत चारने घट झाल्याची माहिती पोलिस उपायुक्त वृष्टी जैन यांनी दिली.यापुढे बेशिस्त वाहनचालकांवर अधिक प्रभावी कारवाई करण्यासाठी शहरात स्पीड डिटेक्शन कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करण्यात आली आहे.
वाहतूक नियमांबाबत जनजागृती
वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे यासाठी पोलिस विभाग जनजागृती मोहीमही राबविणार आहे.पोलिस विभागातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले असून, सर्वसामान्य दुचाकीस्वारांनीही स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
HSRP नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर RTO ची कारवाई
वाहतूक नियमांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी HSRP (High Security Registration Plate) नसलेल्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई केली जाणार आहे.
वाहनमालकांनी नियमानुसार HSRP नंबरप्लेट बसवून घ्यावी, अन्यथा तपासणीदरम्यान दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
रिक्षाचालकांसाठी ड्रेसकोड अनिवार्य
सोलापूर शहरात सार्वजनिक वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर रिक्षांचा वापर केला जातो. त्यामुळे प्रत्येक रिक्षाचालकाने निर्धारित गणवेश परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
याशिवाय शहरातील काही रिक्षा स्टँडवर जागेची कमतरता असल्याने त्या ठिकाणी जागा वाढवून देण्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहितीही पोलिस उपायुक्तांनी दिली.
प्रशासनाचा उद्देश
वाहतूक कोंडी कमी करणे, अपघातांचे प्रमाण घटविणे, वाहतूक व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध करणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ करणे हा या उपाययोजनांचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शहर
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
महाराष्ट्र
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!


























Subscribe to my channel


