
Pune : पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमेला लागून असलेली गहुंजे, जांबे, मारुंजी, हिंजवडी, माण, नेरे, सांगवडे ही सात गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मागील दहा वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहे. या गावांना कचरा, पाणी, सांडपाणी वाहिनी, वाहतूक कोंडीसह इतर समस्या भेडसावत आहेत. या भागाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी राज्य शासनाने याबाबत तत्काळ निर्णय घेण्याची मागणी महापालिकेची आहे. परंतु, अद्यापही निर्णय झाला नाही. सात गावांचा समावेश नेमका कशामुळे रखडला असा सवाल उपस्थित होत आहे.
पिंपरी-चिंचवडची वाटचाल गाव ते महानगर अशी झाली आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, आकुर्डी ही गावे मिळून १९७० मध्ये नगरपालिका अस्तित्वात आली. लगतची काही गावे समाविष्ट करून १९८२ मध्ये महापालिका अस्तित्वात आली. १९९७ मध्ये आणखी १८ गावे समाविष्ट केली. २००८-०९ मध्ये ताथवडे गावाचा समावेश केला. त्यानंतर राज्यात भाजपचे सरकार असताना शहराला लागून असलेल्या हिंजवडीसह सात गावांचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या सभेत फेब्रुवारी २०१५ मध्ये मंजूर करण्यात आला. त्यानंतर तो मंजुरीसाठी जून २०१५ मध्ये शासनाकडे पाठविण्यात आला. मात्र, अद्यापपर्यंत निर्णय झाला नाही. त्याबाबतचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे आहे. सन २०२० मध्ये पुणे महापालिकेची हद्दवाढ झाली. मात्र, पिंपरी-चिंचवडचा प्रस्ताव प्रलंबितच आहे. त्याबाबत निर्णयाची प्रतीक्षा आहे.
|
|
महापालिकेत समाविष्ट होण्यावरून या गावांमधील नागरिकांचे एकमत होत नाही. दुसरीकडे वाढत्या लोकसंख्येला मूलभूत सुविधा पुरविण्यात ग्रामपंचायतीवर ताण येत आहे. महापालिकेत गावे समाविष्ट केली जात नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अस्ताव्यस्तपणे बांधकामे वाढत आहेत. नागरीवस्ती वाढत असल्याने घनकचरा व्यवस्थापनावर ताण वाढला आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कडेला व महापालिका हद्दीत कचरा फेकला जात आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. सक्षम सांडपाणी व्यवस्था नसल्याने अनेक ठिकाणी सांडपाणी साचून दुर्गंधी सुटते. रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली आहे. त्याचा ताण अप्रत्यक्षरीत्या महापालिकेवर पडत आहे. सीमेवरील भागातील विद्रुपीकरण थांबविण्यासाठी तसेच, नियोजनबद्ध विकासासाठी महापालिकेची यंत्रणा असणे आवश्यक असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे. त्यामुळे ही गावे तत्काळ समाविष्ट होणे गरजेचे असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. याबाबत सातत्याने राज्य शासनाला स्मरण पत्र पाठविण्यात येते.
देहू, आळंदीचा समावेश वगळला
पिंपरी-चिंचवड महापालिकेत देहू व आळंदी हे तीर्थक्षेत्र तसेच, चाकण एमआयडीसीचा काही भाग समाविष्ट करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. मात्र आळंदी व चाकणमध्ये नगरपरिषद असल्याने समावेश झाला नाही. त्यानंतर देहू ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. त्यामुळे देहूगावही वगळण्यात आले. सुधारित प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे पाठविला आहे. तसेच, चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे ही गावेही वगळण्यात आली आहेत.
शहराचे १८१ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ
पिंपरी-चिंचवड शहराचे सध्याचे क्षेत्रफळ १८१ चौरस किलोमीटर आहे. गहुंजे ५.०५ चौरस किलोमीटर, जांबे ६.३७ चौरस किमी, मारुंजी ६.५५ चौरस किमी, हिंजवडी ८.३३ चौरस किमी, माण १९.०५ चौरस किमी, नेरे ५.३२ चौरस किमी आणि सांगवडे ३.४४ चौरस किमी असे एकूण ५४.११ चौरस किलोमीटर या गावांचे क्षेत्रफळ आहे. या गावांचा समावेश झाल्यानंतर शहराचे क्षेत्रफळ २३५.११ चौरस किलोमीटर होईल.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



