सातारा: साहित्यिक हा समाजाचा आरसा असतो आणि त्याचे समाजाप्रती काहीतरी उत्तरदायित्व असते, या विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड देत 'पानिपत'कार आणि ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, साहित्यिक राजीव श्रीखंडे आणि त्यांच्या काही साहित्यिक मित्रांनी एक अत्यंत स्तुत्य आणि आदर्श असा उपक्रम हाती घेतला आहे. फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना संशयास्पद मृत्यू झालेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या दुःखी कुटुंबाला या साहित्यिकांनी मदतीचा मोठा हातभार लावला आहे. डॉ. संपदा मुंडे यांच्या वडिलांनी त्यांच्या उच्च शिक्षणासाठी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची संपूर्ण रक्कम या साहित्यिकांनी एकत्र येऊन भरली आहे, ज्यामुळे वृद्ध वडिलांच्या डोक्यावरील मोठा आर्थिक ताण दूर झाला आहे.
काही महिन्यांपूर्वी फलटण येथे घडलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. या दुर्दैवी घटनेनंतर राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप झाले आणि मोठी चर्चा रंगली. मूळच्या बीड जिल्ह्यातील असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या वडिलांनी अत्यंत हलाकीच्या आणि कष्टमय परिस्थितीमध्ये आपल्या मुलीला वैद्यकीय शिक्षण दिले होते. यासाठी त्यांनी एका बँकेतून मोठे शैक्षणिक कर्ज काढले होते. मात्र, अचानक ओढवलेल्या या आघातामुळे आणि तरुण मुलगी गमावल्यामुळे दुःखात असलेल्या तिच्या वडिलांसमोर हे मोठे बँक कर्ज कसे फेडायचे, असा अत्यंत गंभीर व पेसाचा प्रश्न उभा ठाकला होता.
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील हे एका व्याख्यानाच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात गेले होते. त्या दौऱ्यादरम्यान त्यांनी मृत डॉ. संपदा मुंडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि सांत्वन केले. या भेटीत त्यांनी कुटुंबाच्या परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली, तेव्हा मुलीच्या शिक्षणासाठी वडिलांनी काढलेले कर्ज तसेच असल्याचे आणि ते फेडण्यासाठी त्यांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या गोष्टीची गंभीर दखल घेऊन लेखक विश्वास पाटील यांनी साहित्यिक राजीव श्रीखंडे यांच्यासह इतर काही सुहृद साहित्यिक मित्रांशी सविस्तर चर्चा केली. या सर्व सहकाऱ्यांनी मिळून स्वेच्छेने मदतीचा हात पुढे करण्याचे ठरवले आणि इतर मित्र-परिवारालाही मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला सर्वच स्तरातून आणि साहित्यिकांकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या सर्व १० ते १२ साहित्यिकांनी मिळून केलेल्या सामूहिक आर्थिक सहकार्यातून १७ ऑगस्ट रोजी बँकेच्या संबंधित शाखेत जाऊन कर्जाच्या संपूर्ण रकमेचा भरणा करण्यात आला व ते कर्ज पूर्णपणे फेडण्यात आले. विशेष म्हणजे, ही मदत केल्यानंतर कोणतीही प्रसिद्धी न घेता अत्यंत निस्वार्थ भावनेने हा सामाजिक ओलावा जपण्यात आला आहे, ज्यामुळे साहित्य वर्तुळात आणि सर्वसामान्यांमध्ये या निर्णयाचे अत्यंत कौतुक होत आहे.
शहर
- मुंबई: "पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नाही, असे कसे?"; कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात थेट सवाल.
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा सलग १७ दिवसांचा खंड; खरीप पिके करपण्याच्या वाटेवर, शेतकरी चिंतेत!
- पुणे: फुटपाथ नाही, प्रचंड वाहतूक कोंडी; राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण-हिंजवडीकडे लक्ष द्यावे, आदित्य ठाकरेंची मागणी
- नागपूर: ८६ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची कंत्राटदारांची देयके रखडली; १८ आणि १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे व तीव्र आंदोलन
महाराष्ट्र
- मुंबई: "पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नाही, असे कसे?"; कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात थेट सवाल.
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा सलग १७ दिवसांचा खंड; खरीप पिके करपण्याच्या वाटेवर, शेतकरी चिंतेत!
- पुणे: फुटपाथ नाही, प्रचंड वाहतूक कोंडी; राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण-हिंजवडीकडे लक्ष द्यावे, आदित्य ठाकरेंची मागणी
- नागपूर: ८६ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची कंत्राटदारांची देयके रखडली; १८ आणि १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे व तीव्र आंदोलन
गुन्हा
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
- अयोध्या: राम मंदिर दान चोरी प्रकरण एसआयटीचा अंतिम अहवाल सादर, माजी पदाधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- बिहार: गर्दीत अडकलेल्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणासाठी AK-47 मधून गोळ्या झाडल्या; सिवान गोळीबार प्रकरणात बिहार सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

























Subscribe to my channel



