उत्तर प्रदेश: केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे आणि उपचारांनंतरही फरक न पडल्याने १५ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन!

उत्तर प्रदेश: सुलतानपूर जिल्ह्यातील रामनगर कोट गावातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. केस गळण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या एका १५ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, केस गळण्याच्या समस्येचा सामना करत होती आणि उपचार करूनही तिला काही फायदा होत नव्हता. केस पूर्णपणे गळाल्यामुळे ती प्रचंड मानसिक तणावाखाली राहायची आणि लोकांमध्ये जाण्यास तिला संकोच वाटायचा. घटनेच्या दिवशी ती घरातून निघाली, पण उशिरापर्यंत परतली नाही. त्यानंतर गावातील एका बागेत तिचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.

सुलतानपूर जिल्ह्यातील कोतवाली नगर क्षेत्रातील रामनगर कोट गावात ही घटना घडली आहे. मोनी उर्फ प्रिया निषाद असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिया रोजच्याप्रमाणे घरातून बाहेर पडली होती. जेव्हा ती बराच वेळ परतली नाही, तेव्हा घरच्यांनी तिचा शोध सुरू केला. शोधाशोध करताना गावातील एका बागेत तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळला.

 

 

केस गळण्याच्या समस्येने होती त्रस्त
प्रियाचे वडील उदयराज निषाद यांनी सांगितलं की, त्यांची मुलगी बऱ्याच काळापासून केस गळण्याच्या गंभीर समस्येने त्रस्त होती. केस पूर्णपणे गळाल्यामुळे ती डिप्रेशनमध्ये होती. लोकांसमोर जाण्यास तिला संकोच वाटायचा आणि याच कारणामुळे ती नेहमी टोपी घालून राहायची. कुटुंबाने तिच्यावर वैद्यकीय उपचारही केले, पण काही फायदा झाला नाही.

प्रियाच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का
प्रियाला पाच भावंडं आहेत. तिने गावातील प्राथमिक शाळेत पाचवीपर्यंतचं शिक्षण घेतलं होतं. वडील उदयराज मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. हे कुटुंब आधीच आर्थिक आणि आरोग्याच्या समस्यांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत प्रियाच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *