अजित पवार विमान अपघातImage Credit source: social media
राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे अख्खा महाराष्ट्र शोकाकूल झाला. 28 जानेवारी रोजी अजित पवार हे मुंबईहून बारामतीला येत होते, मात्र बारामती एअरपोर्टजवळ आल्यानंतर त्याचं प्लेन अचानक क्रॅश झालं आणि मोठ्ठा स्फोट होऊन आग लागली. यात अजित पवार यांचा मृत्यू झाला. तसेच विमानातील आणखी चौघंही ठार झाले. त्यांच्या जाण्याने अख्खी बारामतीच नव्हे तर राज्य हळहळलं. मात्र त्यांच्या मृत्यूला काही दिवस उलटल्यानंतर त्यांच्या निधनाबद्दल अनेक शंका-कुशंका व्यक्त होत आहेत.
अजित पवार यांचे पुतणे, शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीही या अपघातावर शंका व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी मुंबईव दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन त्यांचा अपघात की घातपात अशी शंका व्यक्त केली. तसेच अजित पवार गाटातील काही नेत्यांनीही या मुद्याला दुजोरा दिला आहे. आता अजित पवार यांच्या प्लेन क्रॅशबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. अजित दादांच्या अपघाताचा खासगी गुप्तेर संस्थेकडून पास होण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर आली आहे. रोहित पवार हे खासगी गुप्तहेर संस्थेकडून अपघाताबाबत तपास करून घेणार आहेत.
राजधानीत काय घडलं ?
गेल्या आठवड्यात ते दिल्लीला गेले होते. राजधानीत असताना रोहित पवार यांनी दोन खासगी गुप्तहेर संस्थांची भेट घेतली असेही समजते. या दोन्हीपैकी एका गुप्तहेर संस्थेला या अपघाताच्या तपासाचं काम दिलं जाणार आहे. सरकारी तपास यंत्रणांवर रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला होता. त्यानंतर रोहित पवार हे खासगी गुप्तहेर संस्थांकडून या अपघाताचा तपास करून घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वीच रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्याचा घटनाक्रम त्यांनी संपूर्ण मांडला होता. मेन पायलट कपूरची चौकशी झाली पाहिजे. ते दारू का पित होते? त्यांना मेंटल ट्रेस होता का? फायनान्शियल कारण होतं का? पैशासाठी त्यांच्यावर दबाव होता का? त्यामुळे त्यांनी अपघात केला का? याची चौकशी झाली पाहिजे. कंपनीच्या व्हॉटसअप ग्रुपची चौकशी झाली पाहिजे. चॅट डीलिट झाल्या तरी ती माहिती मिळते. अॅरो नावाच्या कंपनीच्या चॅटचीही चौकशी केली पाहिजे. हँडलरने ओके का म्हटलं? व्हिजीबिलीटी नसताना टेक ऑफ का झालं आणि लँड का झालं याचीही चौकशी झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं.
अजित दादांचा हा अपघात नव्हे तर घातपात आहे, असा संशयही रोहित पवार यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे सरकारी तपास यंत्रणेवर संशय व्यक्त केला. किंवा हा तपास करण्यासाठी तपास यंत्रणेला दिरंगाई होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे रोहित पवार हे दोनपैकी एका संस्थेकडून या अपघाताचा तपास करून घेणार असल्याचे समजते. गेल्या आठवड्यात जेव्हा ते दिल्ली दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी काही खाजगी गुप्तहेर संस्थांच्या प्रमुखांची देखील भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी अजित पवार यांच्या अपघाताची संपूर्ण माहिती त्या गुप्तहेर संस्थांना दिली. याचा तपास देखील या संस्थाकडून करून घेतला जाणार असल्याचे समजते.
रोहित पवार यांचं महत्वाचं ट्विट
याचदरम्यान रोहित पवार यांनी महत्वाचं ट्विट केलं आहे. ” स्व.दादांच्या दुर्दैवी अपघाताचा आज विसावा दिवस असून अद्यापही DGCA कडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही, तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणाऱ्या VSR कंपनीविरोधात देखील काहीही कारवाई अद्यापर्यंत झालेली नाही, परिणामी शंका अधिक बळावत चालल्या आहेत. त्यामुळे DGCA ने लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा तसेच VSR वर योग्य ती कारवाई करावी !” , अशी मागणी त्यांनी केली आहे.
स्व.दादांच्या दुर्दैवी अपघाताचा आज विसावा दिवस असून अद्यापही DGCA कडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही, तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणाऱ्या VSR कंपनीविरोधात देखील काहीही कारवाई अद्यापर्यंत झालेली नाही, परिणामी शंका अधिक बळावत चालल्या आहेत. त्यामुळे DGCA ने लवकरात…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 16, 2026
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



